शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

‘संवेदना अभियाना’च्या माध्यमातून तीन शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत म्हणून भरारी फाउंडेशनने ...

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत म्हणून भरारी फाउंडेशनने शेतकरी संवेदना अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत तीन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यात फाउंडेशनला यश आले आहे, तसेच अनेकांचे समुपदेशन केले जात आहे.

अलीकडच्या काळात देशभरात विविध अडचणींमुळे शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. शेतकरी बांधवांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारावर मोठा संकटांचा डोंगर कोसळतो. कुटुंबाने काय करावे, हे त्यांना सुचत नाही. शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी भरारी फाउंडेशनने शेतकरी संवेदना अभियान सुरू केले आहे. अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. मुला-मुलींचे लग्न, शिक्षण, सावकारी कर्ज, दुष्काळी परिस्थिती, लहरी निसर्गाचा फटका, अशा अनेक अडचणींमुळे शेतकरी डबघाईला आलेला आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण होते आणि शेतकरी आत्महत्या करतो.

११४ गावांतील ३० हजार शेतकऱ्यांचा सर्व्हे

भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून पारोळा तालुक्यातील ११४ गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तीस हजार शेतकऱ्यांना भेटून हा सर्व्हे करण्यात आला. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य करणे, बी-बियाणे उपलब्ध करून देणे, तणावात असलेल्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करणे, विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, मुला-मुलींचे लग्न व शिक्षणासाठी मदत करणे, अशा प्रकारे आधार देण्याचे काम संस्था करत आहे.

समुपदेशनासह जोडधंद्यासाठी सहकार्य

पारोळा तालुक्यातील विटनेर येथील आनंदा मंजा अहिरे यांना भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतीला जोड व्यवसाय म्हणून ३५ हजार रुपये किमतींच्या सहा शेळ्या देण्यात आल्या, तसेच जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील राहुल निकम हे शेतकरी आर्थिक अडचणीत असून, शेतातील पिकांना खते व कीटकनाशके घेण्यासाठी पैसे नसून त्यांना खते, बी-बियाणे व कीटकनाशके देण्यात आली.

...यांनी घेतले परिश्रम

कोरोनाकाळात घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी निराधार महिलांना स्वयंरोजगाराला चालना देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने कविता अनिल मराठे व सुरेखा अनिल चव्हाण यांना भरारी फाउंडेशनतर्फे शिलाई मशीन देण्यात आली. या अभियानासाठी सचिन महाजन, दीपक परदेशी, विनोद ढगे, जयदीप पाटील, डॉ. स्वप्नील पाटील, सुदर्शन पाटील, रितेश लिमडा, दीपक विधाते व नीलेश जैन हे परिश्रम घेत आहेत. संपूर्ण अभियानाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा निवासी अधिकारी राहुल पाटील, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, रजनीकांत कोठारी, रवींद्र लढ्ढा, मुकेश हसवाणी, अमर कुकरेजा, संध्या सूर्यवंशी, रत्नाकर पाटील, अपर्णा भट, अनिल कांकरिया, अनिकेत पाटील, किशोर ढाके, सपन झुनझुनवाला, योगेश पाटील, नीलेश झोपे उपस्थित होते.