शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
4
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
5
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
6
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
7
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
8
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
9
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
10
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
11
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
12
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
13
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
14
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
15
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
16
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
17
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
18
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
19
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
Daily Top 2Weekly Top 5

तयारी विजयी जल्लोषाची : फटाके, फुलांना वाढली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:38 IST

पेढे, मिठाई, गुलालाचीही सज्जता

जळगाव : लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ रोजी जाहीर होणार असल्याने मतमोजणीसाठी उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते सज्ज झाले असून त्यांच्याकडून विजयी जल्लोषाची तयारीदेखील केली जात आहे. या पार्श्वभूमीवर फटाक्यांना मागणी वाढली असून फूल विक्रेत्यांनी फुलांचीही वाढीव मागणी पाहता त्याची उपलब्धता करून ठेवली आहे. या सोबतच पेढे, मिठाई, गुलालची अधिक विक्री होण्याच्या अंदाजाने दुकानदार सज्ज आहेत.२३ एप्रिल रोजी जिल्ह्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाल्यानंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागलेली आहे. ही उत्सुकता शिगेला पोहचली असताना उमेदवार, कार्यकर्ते यांच्याकडून विजयी जल्लोषाची तयारी केली जात असल्याचे विविध वस्तूंच्या मागणीवरून लक्षात येते. त्यात फटाक्यांना अधिक मागणी असून गेल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात तालुकास्तरावरील विक्रेत्यांनी फटाक्यांची उपलब्धता करून ठेवण्यासह कार्यकर्त्यांनीही फटाके खरेदी करून ठेवले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या सोबतच २३ रोजी आणखी विक्री होण्यात अंदाज आहे.या सोबतच विजयी उमेदवारांचे हार, फूल, बुके देऊन स्वागत करण्यासाठीदेखील तयारी केली जात आहे. यासाठी फूल विक्रेत्यांकडे फुलांची नोंदणी करून ठेवली जात आहे. निकालाच्या दिवशी ५० टक्क्याने विक्री वाढण्याचा अंदाज असल्याने फुलांचा अधिकचा साठा मागवून ठेवण्यात आला आहे. एरव्ही शहरात २५ क्विंटल फुलांची विक्री होते. निकालाच्या दिवशी ही विक्री १२ ते १३ क्विंटलने वाढण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.विजयी उमेदवाराचे तोंड गोड करण्यासाठी तसेच विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी समर्थकांकडून पेढे व इतर मिठाईची मागणी वाढण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी उपलब्धता ठेवली आहे.निवडणूक निकालामध्ये ग्रामपंचायत, न.पा. निवडणुकांच्या निकालानंतर गुलालाचा अधिक वापर होतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालात याचा जास्त वापर होत नसल्याने विक्रेत्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी मागणीनुसार गुलालाची उपलब्धता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.गेल्या आठवड्यापासून फटाक्यांना मागणी असून तालुकापातळीवर विक्रेत्यांनीही त्याची खरेदी केलेली आहे.- युसुफ मकरा, फटाके विक्रेते.निकालाच्या पार्श्वभूमीवर फुलांना मागणी वाढणार असल्याच्या अंदाजाने तशी उपलब्धता करून ठेवली आहे.- मंगला बारी, फूल-हार विक्रेत्या.निवडणूक निकालासाठी पेढे, मिठाईला मागणी असते. अद्यापपर्यंत मागणी नसली तरी ऐनवेळी मागणी झाल्यास तशी उपलब्धता आहे.- भाविक मदाणी, मिठाई विक्रेते.ग्रामपंचायत निवडणुकीवेळी गुलालला मागणी असते. लोकसभा निवडणुकाच्या निकालानंतरही मागणीवाढलीतरउपलब्धताआहे.- कमलेश सुरतवाला,गुलालविक्रेते.

टॅग्स :Jalgaonजळगाव