शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

जळगाव जिल्ह्यात प्रथमच मान्सूनपूर्व कापूस लागवडीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 12:43 IST

जिल्ह्यात बियाणे बोगस असण्याची शक्यता

ठळक मुद्देचोपडा तालुक्यात मध्यप्रदेशातील बियाण्याची लागवड२३ लाखांवर पाकिटे येणार

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये यंदा प्रथमच जिल्ह्यात मान्सूनपूर्व कापसाची लागवड वेळेत होऊ शकली नाही. अनधिकृत बियाणे विक्री आणि लागवड हा गुन्हा असताना चोपडा तालुक्यात काही ठिकाणी मध्य प्रदेशातील बियाणे आणून लागवड करण्यात आली आहे. दरम्यान यापैकी काही बियाणे बोगस असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.गेल्या वेळी कापसावर मोठ्या प्रमाणावर पडलेल्या रोगामुळे शासनाने बोगस बियाण्यांना पायबंद बसविण्यासाठी कडक कायदा केला आहे. तसेच मान्सूनपूर्व कापूस लागवडीत उन्हामुळे कापूस लाल पडून रोग पडण्याची शक्यता अधिक असते. यामुळे यंदा राज्य सरकारतर्फे कापूस बियाणे बाजारात उशिरा आणले जात असल्याने मान्सूनपूर्व लागवड आता तब्बल १५ दिवस उशिराने होणार आहे.शेतकऱ्यांची घाई अडचणीची ठरू ठकतेचोपडा तालुक्यात गेल्या सप्ताहातच काही शेतकºयांनी कापूस लागवड केली आहे. मध्य प्रदेशातून बियाणे येथे आणले जात आहे. यासोबत काही बोगस बियाणे येत असल्याचीही भीती आहे. असे आढळल्यास बोगस बियाणे लागवड करणाºया शेतकºयासही शिक्षेचा दणका बसू शकतो.बोगस बियाणे नसले तरी उद्या कोणतीही नुकसान भरपाईची वेळ आल्यास मध्य प्रदेशचे बियाणे असल्याने राज्य सरकार भरपाई देणार नाही, परिणामी या शेतकºयांना ही घाई अडचणीची ठरू शकते.बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकºयांची अडचणजिल्ह्यात मान्सूनपूर्व लागवड मेच्या पहिल्या आठवड्यात नेहमी व्हायची. ज्यांच्याजवळ पाणी उपलब्ध आहे, असे शेतकरी लागवड करून मोकळे व्हायचे. जेणे करून इतर शेतकºयांच्या तुलनेत कापूस आधी हाती यायचा. हे प्रमाण कमी असल्याने मजूरही सहज व कमी पैशात उपलब्ध होत असतो. पुढे रब्बीसाठीही शेत लवकर मोकळे होते, ही बाब लक्षात घेवून या लागवडीसाठी शेतकºयांची धावपळ असायची, परंतु शासनाने बोगस बियाणे व रोगराई टाळण्यासाठी २० मे दरम्यान लागवड करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर १५ तारखेनंतरच बियाणे बाजारात आणले जाणार आहे. यामुळे यंदा मे महिन्याच्या सुरुवातीस होणारी लागवड जवळपास झालीच नाही.बोगस बियाणे रोखण्यासाठी १६ पथकेजिल्ह्यात बोगस बियाणे रोखण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर १ आणि जिल्हा स्तरावरील १ अशी एकूण १६ पथके नेमण्यात आली आहेत. या पथकात तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, वजन व मापे निरीक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.२३ लाखांवर पाकिटे येणारजिल्ह्यात कापूस बियाण्यांची १७ ते १८ लाख पाकिटे लागतात. परंतु कृषी विभागाने दुबार पेरणी वगैरे हिशेब धरून २३ लाख २० हजार कापूस बियाणे पाकिटांची मागणी केली आहे. हे बियाणे १५ ते २० मे दरम्यान बाजारात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात बोगस बियाणे कोठेही नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

टॅग्स :cottonकापूसJalgaonजळगाव