शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात प्रथमच मान्सूनपूर्व कापूस लागवडीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 12:43 IST

जिल्ह्यात बियाणे बोगस असण्याची शक्यता

ठळक मुद्देचोपडा तालुक्यात मध्यप्रदेशातील बियाण्याची लागवड२३ लाखांवर पाकिटे येणार

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये यंदा प्रथमच जिल्ह्यात मान्सूनपूर्व कापसाची लागवड वेळेत होऊ शकली नाही. अनधिकृत बियाणे विक्री आणि लागवड हा गुन्हा असताना चोपडा तालुक्यात काही ठिकाणी मध्य प्रदेशातील बियाणे आणून लागवड करण्यात आली आहे. दरम्यान यापैकी काही बियाणे बोगस असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.गेल्या वेळी कापसावर मोठ्या प्रमाणावर पडलेल्या रोगामुळे शासनाने बोगस बियाण्यांना पायबंद बसविण्यासाठी कडक कायदा केला आहे. तसेच मान्सूनपूर्व कापूस लागवडीत उन्हामुळे कापूस लाल पडून रोग पडण्याची शक्यता अधिक असते. यामुळे यंदा राज्य सरकारतर्फे कापूस बियाणे बाजारात उशिरा आणले जात असल्याने मान्सूनपूर्व लागवड आता तब्बल १५ दिवस उशिराने होणार आहे.शेतकऱ्यांची घाई अडचणीची ठरू ठकतेचोपडा तालुक्यात गेल्या सप्ताहातच काही शेतकºयांनी कापूस लागवड केली आहे. मध्य प्रदेशातून बियाणे येथे आणले जात आहे. यासोबत काही बोगस बियाणे येत असल्याचीही भीती आहे. असे आढळल्यास बोगस बियाणे लागवड करणाºया शेतकºयासही शिक्षेचा दणका बसू शकतो.बोगस बियाणे नसले तरी उद्या कोणतीही नुकसान भरपाईची वेळ आल्यास मध्य प्रदेशचे बियाणे असल्याने राज्य सरकार भरपाई देणार नाही, परिणामी या शेतकºयांना ही घाई अडचणीची ठरू शकते.बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकºयांची अडचणजिल्ह्यात मान्सूनपूर्व लागवड मेच्या पहिल्या आठवड्यात नेहमी व्हायची. ज्यांच्याजवळ पाणी उपलब्ध आहे, असे शेतकरी लागवड करून मोकळे व्हायचे. जेणे करून इतर शेतकºयांच्या तुलनेत कापूस आधी हाती यायचा. हे प्रमाण कमी असल्याने मजूरही सहज व कमी पैशात उपलब्ध होत असतो. पुढे रब्बीसाठीही शेत लवकर मोकळे होते, ही बाब लक्षात घेवून या लागवडीसाठी शेतकºयांची धावपळ असायची, परंतु शासनाने बोगस बियाणे व रोगराई टाळण्यासाठी २० मे दरम्यान लागवड करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर १५ तारखेनंतरच बियाणे बाजारात आणले जाणार आहे. यामुळे यंदा मे महिन्याच्या सुरुवातीस होणारी लागवड जवळपास झालीच नाही.बोगस बियाणे रोखण्यासाठी १६ पथकेजिल्ह्यात बोगस बियाणे रोखण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर १ आणि जिल्हा स्तरावरील १ अशी एकूण १६ पथके नेमण्यात आली आहेत. या पथकात तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, वजन व मापे निरीक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.२३ लाखांवर पाकिटे येणारजिल्ह्यात कापूस बियाण्यांची १७ ते १८ लाख पाकिटे लागतात. परंतु कृषी विभागाने दुबार पेरणी वगैरे हिशेब धरून २३ लाख २० हजार कापूस बियाणे पाकिटांची मागणी केली आहे. हे बियाणे १५ ते २० मे दरम्यान बाजारात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात बोगस बियाणे कोठेही नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

टॅग्स :cottonकापूसJalgaonजळगाव