शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

जळगाव जिल्ह्यात प्रथमच मान्सूनपूर्व कापूस लागवडीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 12:43 IST

जिल्ह्यात बियाणे बोगस असण्याची शक्यता

ठळक मुद्देचोपडा तालुक्यात मध्यप्रदेशातील बियाण्याची लागवड२३ लाखांवर पाकिटे येणार

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये यंदा प्रथमच जिल्ह्यात मान्सूनपूर्व कापसाची लागवड वेळेत होऊ शकली नाही. अनधिकृत बियाणे विक्री आणि लागवड हा गुन्हा असताना चोपडा तालुक्यात काही ठिकाणी मध्य प्रदेशातील बियाणे आणून लागवड करण्यात आली आहे. दरम्यान यापैकी काही बियाणे बोगस असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.गेल्या वेळी कापसावर मोठ्या प्रमाणावर पडलेल्या रोगामुळे शासनाने बोगस बियाण्यांना पायबंद बसविण्यासाठी कडक कायदा केला आहे. तसेच मान्सूनपूर्व कापूस लागवडीत उन्हामुळे कापूस लाल पडून रोग पडण्याची शक्यता अधिक असते. यामुळे यंदा राज्य सरकारतर्फे कापूस बियाणे बाजारात उशिरा आणले जात असल्याने मान्सूनपूर्व लागवड आता तब्बल १५ दिवस उशिराने होणार आहे.शेतकऱ्यांची घाई अडचणीची ठरू ठकतेचोपडा तालुक्यात गेल्या सप्ताहातच काही शेतकºयांनी कापूस लागवड केली आहे. मध्य प्रदेशातून बियाणे येथे आणले जात आहे. यासोबत काही बोगस बियाणे येत असल्याचीही भीती आहे. असे आढळल्यास बोगस बियाणे लागवड करणाºया शेतकºयासही शिक्षेचा दणका बसू शकतो.बोगस बियाणे नसले तरी उद्या कोणतीही नुकसान भरपाईची वेळ आल्यास मध्य प्रदेशचे बियाणे असल्याने राज्य सरकार भरपाई देणार नाही, परिणामी या शेतकºयांना ही घाई अडचणीची ठरू शकते.बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकºयांची अडचणजिल्ह्यात मान्सूनपूर्व लागवड मेच्या पहिल्या आठवड्यात नेहमी व्हायची. ज्यांच्याजवळ पाणी उपलब्ध आहे, असे शेतकरी लागवड करून मोकळे व्हायचे. जेणे करून इतर शेतकºयांच्या तुलनेत कापूस आधी हाती यायचा. हे प्रमाण कमी असल्याने मजूरही सहज व कमी पैशात उपलब्ध होत असतो. पुढे रब्बीसाठीही शेत लवकर मोकळे होते, ही बाब लक्षात घेवून या लागवडीसाठी शेतकºयांची धावपळ असायची, परंतु शासनाने बोगस बियाणे व रोगराई टाळण्यासाठी २० मे दरम्यान लागवड करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर १५ तारखेनंतरच बियाणे बाजारात आणले जाणार आहे. यामुळे यंदा मे महिन्याच्या सुरुवातीस होणारी लागवड जवळपास झालीच नाही.बोगस बियाणे रोखण्यासाठी १६ पथकेजिल्ह्यात बोगस बियाणे रोखण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर १ आणि जिल्हा स्तरावरील १ अशी एकूण १६ पथके नेमण्यात आली आहेत. या पथकात तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, वजन व मापे निरीक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.२३ लाखांवर पाकिटे येणारजिल्ह्यात कापूस बियाण्यांची १७ ते १८ लाख पाकिटे लागतात. परंतु कृषी विभागाने दुबार पेरणी वगैरे हिशेब धरून २३ लाख २० हजार कापूस बियाणे पाकिटांची मागणी केली आहे. हे बियाणे १५ ते २० मे दरम्यान बाजारात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात बोगस बियाणे कोठेही नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

टॅग्स :cottonकापूसJalgaonजळगाव