शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जळगाव जिल्ह्यात प्रथमच मान्सूनपूर्व कापूस लागवडीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 12:43 IST

जिल्ह्यात बियाणे बोगस असण्याची शक्यता

ठळक मुद्देचोपडा तालुक्यात मध्यप्रदेशातील बियाण्याची लागवड२३ लाखांवर पाकिटे येणार

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये यंदा प्रथमच जिल्ह्यात मान्सूनपूर्व कापसाची लागवड वेळेत होऊ शकली नाही. अनधिकृत बियाणे विक्री आणि लागवड हा गुन्हा असताना चोपडा तालुक्यात काही ठिकाणी मध्य प्रदेशातील बियाणे आणून लागवड करण्यात आली आहे. दरम्यान यापैकी काही बियाणे बोगस असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.गेल्या वेळी कापसावर मोठ्या प्रमाणावर पडलेल्या रोगामुळे शासनाने बोगस बियाण्यांना पायबंद बसविण्यासाठी कडक कायदा केला आहे. तसेच मान्सूनपूर्व कापूस लागवडीत उन्हामुळे कापूस लाल पडून रोग पडण्याची शक्यता अधिक असते. यामुळे यंदा राज्य सरकारतर्फे कापूस बियाणे बाजारात उशिरा आणले जात असल्याने मान्सूनपूर्व लागवड आता तब्बल १५ दिवस उशिराने होणार आहे.शेतकऱ्यांची घाई अडचणीची ठरू ठकतेचोपडा तालुक्यात गेल्या सप्ताहातच काही शेतकºयांनी कापूस लागवड केली आहे. मध्य प्रदेशातून बियाणे येथे आणले जात आहे. यासोबत काही बोगस बियाणे येत असल्याचीही भीती आहे. असे आढळल्यास बोगस बियाणे लागवड करणाºया शेतकºयासही शिक्षेचा दणका बसू शकतो.बोगस बियाणे नसले तरी उद्या कोणतीही नुकसान भरपाईची वेळ आल्यास मध्य प्रदेशचे बियाणे असल्याने राज्य सरकार भरपाई देणार नाही, परिणामी या शेतकºयांना ही घाई अडचणीची ठरू शकते.बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकºयांची अडचणजिल्ह्यात मान्सूनपूर्व लागवड मेच्या पहिल्या आठवड्यात नेहमी व्हायची. ज्यांच्याजवळ पाणी उपलब्ध आहे, असे शेतकरी लागवड करून मोकळे व्हायचे. जेणे करून इतर शेतकºयांच्या तुलनेत कापूस आधी हाती यायचा. हे प्रमाण कमी असल्याने मजूरही सहज व कमी पैशात उपलब्ध होत असतो. पुढे रब्बीसाठीही शेत लवकर मोकळे होते, ही बाब लक्षात घेवून या लागवडीसाठी शेतकºयांची धावपळ असायची, परंतु शासनाने बोगस बियाणे व रोगराई टाळण्यासाठी २० मे दरम्यान लागवड करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर १५ तारखेनंतरच बियाणे बाजारात आणले जाणार आहे. यामुळे यंदा मे महिन्याच्या सुरुवातीस होणारी लागवड जवळपास झालीच नाही.बोगस बियाणे रोखण्यासाठी १६ पथकेजिल्ह्यात बोगस बियाणे रोखण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर १ आणि जिल्हा स्तरावरील १ अशी एकूण १६ पथके नेमण्यात आली आहेत. या पथकात तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, वजन व मापे निरीक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.२३ लाखांवर पाकिटे येणारजिल्ह्यात कापूस बियाण्यांची १७ ते १८ लाख पाकिटे लागतात. परंतु कृषी विभागाने दुबार पेरणी वगैरे हिशेब धरून २३ लाख २० हजार कापूस बियाणे पाकिटांची मागणी केली आहे. हे बियाणे १५ ते २० मे दरम्यान बाजारात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात बोगस बियाणे कोठेही नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

टॅग्स :cottonकापूसJalgaonजळगाव