शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठा खंडित झाल्याने उद्योगांना करोडो रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 23:26 IST

४०० उद्योगांची चाके थांबली :  प्लॅस्टिक उद्योगांना पोहचली अधिक झळ जळगाव : शुक्रवारी संध्याकाळी औद्योगिक वसाहत परिसरामध्ये  १३२ केव्हीच्या ...

४०० उद्योगांची चाके थांबली :  प्लॅस्टिक उद्योगांना पोहचली अधिक झळ

जळगाव : शुक्रवारी संध्याकाळी औद्योगिक वसाहत परिसरामध्ये  १३२ केव्हीच्या मुख्य वाहिनीवर वीज कोसळून वी पुरवठा खंडित झाल्याने उद्योगांची चाके थांबली व ४०० उद्योगांना करोडो रुपयांचा फटका बसला आहे. आठ ते नऊ तास उद्योग बंद राहिल्याने ते पूर्ववत सुरू होईपर्यंत उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी संध्याकाळी जळगाव शहर व परिसरात अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली. यावेळी जोरदार वादळ देखील झाले व विजाही कडाडल्या. यादरम्यान, औद्योगिक वसाहत परिसरामध्ये १३२ केव्हीच्या मुख्य वीज वाहिनीवर वीज कोसळून सात तास वीज पुरवठा खंडित झाला. मुख्य वीजवाहिनी वरच वीज कोसळल्याने तारा तुटून जमिनीवर पडल्या होत्या तर मुख्य वाहिनीवर असलेल्या काही उप वाहिन्याही तुटल्या होत्या. यामुळे शहरातील विविध भागासह औद्योगिक वसाहतमध्ये देखील वीज पुरवठा खंडित झाल्याने जवळपास ४०० उद्योग चार ते पाच तास तास बंद होते. त्यानंतर ते पुन्हा सुरू होण्यास तीन चे चार तास लागल्याने आठ ते नऊ तास उत्पादन थांबले होते.

दुरुस्तीसाठी इतर ठिकाणचाही वीज पुरवठा बंदवादळामुळे औद्योगिक वसाहत परिसरातील वेगवेगळ्या सेक्‍टरमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर ठिकाणचा देखील वीज पुरवठा बंद करावा लागत होता. त्यामुळे जवळपास सर्वच सेक्टरमधील उद्योगांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने बंद होता.

प्लॅस्टिक उद्योग पुन्हा सुरू होण्यास लागतो वेळजळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॅस्टिक उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शुक्रवारी वीज कोसळल्यानंतर जे व के सेक्टरमधील अनेक उद्योगांचा वीजपुरवठा खंडित झाला. या भागात प्लॅस्टिक उद्योगांची संख्या अधिक आहे. प्लॅस्टिक उद्योगांमधील मशिनरी एकदा बंद पडली तर ती पुन्हा सुरू होण्यास चार ते पाच तास लागतात. त्यात शुक्रवारी जवळपास चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित होता व त्यानंतर तो सुरू झाल्यानंतर देखील पुन्हा उद्योग पूर्ववत सुरू होण्यास चार ते पाच तास गेले. यामुळे उद्योगांना करोडो रुपयांचा फटका बसला असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या वादळामुळे वीज पुरवठा खंडित होऊन उद्योग बंद पडले. यामध्ये प्लॅस्टिक उद्योगांची संख्या अधिक होती. वीज पुरवठा खंडित झाल्याने उद्योजकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.- रवींद्र लढ्ढा, उद्योजक

शुक्रवारी औद्योगिक वसाहत परिसरामध्ये वेगवेगळ्या सेक्‍टरमध्ये वीज पुरवठा खंडित झाला‌. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर सेक्टरमधील देखील वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे अनेक उद्योग बंद होते, रात्री ते पूर्ववत सुरू झाले.- रवींद्र फालक, उद्योजक.

टॅग्स :Jalgaonजळगाव