शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

कांदा लागवडीला वीज वितरणचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बिडगाव ता. चोपडा : परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कांदा लागवडीला वीज वितरणच्या भारनियमनाचा खोडा ठरत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बिडगाव ता. चोपडा : परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कांदा लागवडीला वीज वितरणच्या भारनियमनाचा खोडा ठरत आहे. आठवड्यातून फक्त तीनच दिवस दिवसा वीज मिळत आहे.म्हणून कांदा लागवड करावी तरी अशी?असे संकट परिसरातील शेतकऱ्यांसमोर ठाकले आहे.

बिडगाव येथील सरपंच विजया देविदास पाटील यांनी परिसरात होणाऱ्या भारनियमनाच्या वेळेत बदल करून शेतकऱ्यांची कांदा लागवडीची समस्या सोडवावी, अशी मागणी लेखी स्वरूपात वीज वितरणकडे केली आहे.

बिडगावसह परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी महागडी हजारो रुपयांची कांद्याची बियाणे विकत घेऊन मोठ्या प्रमाणात कांदा रोपांच्या नर्सरी टाकून लागवडीचे नियोजन केले आहे. अनेक शेतकऱ्यांची रोपेही आता तयार झाली आहेत, तर काही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवडही सुरू केली आहे. ही लागवड आता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.

कांद्याची लागवड ही वाहत्या पाण्यात केली जाते व पाण्यासाठी विजेची आवश्यकता असते. मात्र, वीजवितरणचे भारनियम या कांदा लागवडीला अडथळा ठरत असून, लागवडी रेंगाळत आहेत. बिडगांव व कुंड्यापाणी या शेतशिवारात वीजपुरवठा करणाऱ्या फिडरला गेल्या चार वर्षांपासून आठवड्यातून फक्त शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीनच दिवस सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दिवसा वीज पुरवठा केला जातो व चार दिवस रात्री वीज मिळते, ती दिवस उगविण्याआधीच बंद होत असते. त्यामुळे तीन दिवसांत लागवड करणे शक्य होत नाही. नर्सरीवर हजारो रुपये खर्च करून रोपे तयार करूनही विजेअभावी लागवड बंद पडते व पुन्हा लागवडसाठी दिवसाच्या वीजपुरवठ्याची चार दिवस प्रतिक्षा करावी लागते. तशात पाऊस आला तर रोपेही खराब होतात व मोठे आर्थिक नुकसान होते. परिणामी शेतकरी डबघाईस जातात आणि तीनच दिवस दिवसा विजेमुळे मजुरांचीही धांदल उडते व चार दिवस घरीच बसावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांसह त्यांचेही नुकसान होते. आधी रात्र व दिवस असे रोटेशन‌नुसार हे भारनियम बदलत होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून वीजवितरणकडून त्याच्यात बदलच केला नाही. मागील वर्षी लागवड कमी होती व रात्री येणारी वीज सकाळी नऊ वाजेपर्यंत मिळत होती. त्यामुळे अडचण भासली नव्हती. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणावर लागवड आहे व रात्री मिळणारी वीज सकाळी पाच वाजताच बंद होते.

भारनियमनाच्या वेळेत बदल करण्याची मागणी

विजेअभावी कांदा उत्पादक शेतकरी लागवडीआधीच वीज वितरणच्या सुलतानी संकटात सापडले आहेत. तरी महावितरणने याची वेळीच दखल घेऊन भारनियमच्या वेळेत बदल करून आठवड्यातून दिवसा तिन दिवसच होणारा वीजपुरवठा चार दिवस करावा व रात्री मिळणारा वीजपुरवठा सकाळी १० वाजेपर्यंत करावा अशी मागणी बिडगांव येथील महिला सरपंच विजया पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे.

चोपडा तालुक्यात कांद्याची लागवड सुरू असताना. (छाया : रावसाहेब पाटील,बिडगाव)