शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

कांदा लागवडीला वीज वितरणचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बिडगाव ता. चोपडा : परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कांदा लागवडीला वीज वितरणच्या भारनियमनाचा खोडा ठरत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बिडगाव ता. चोपडा : परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कांदा लागवडीला वीज वितरणच्या भारनियमनाचा खोडा ठरत आहे. आठवड्यातून फक्त तीनच दिवस दिवसा वीज मिळत आहे.म्हणून कांदा लागवड करावी तरी अशी?असे संकट परिसरातील शेतकऱ्यांसमोर ठाकले आहे.

बिडगाव येथील सरपंच विजया देविदास पाटील यांनी परिसरात होणाऱ्या भारनियमनाच्या वेळेत बदल करून शेतकऱ्यांची कांदा लागवडीची समस्या सोडवावी, अशी मागणी लेखी स्वरूपात वीज वितरणकडे केली आहे.

बिडगावसह परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी महागडी हजारो रुपयांची कांद्याची बियाणे विकत घेऊन मोठ्या प्रमाणात कांदा रोपांच्या नर्सरी टाकून लागवडीचे नियोजन केले आहे. अनेक शेतकऱ्यांची रोपेही आता तयार झाली आहेत, तर काही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवडही सुरू केली आहे. ही लागवड आता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.

कांद्याची लागवड ही वाहत्या पाण्यात केली जाते व पाण्यासाठी विजेची आवश्यकता असते. मात्र, वीजवितरणचे भारनियम या कांदा लागवडीला अडथळा ठरत असून, लागवडी रेंगाळत आहेत. बिडगांव व कुंड्यापाणी या शेतशिवारात वीजपुरवठा करणाऱ्या फिडरला गेल्या चार वर्षांपासून आठवड्यातून फक्त शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीनच दिवस सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दिवसा वीज पुरवठा केला जातो व चार दिवस रात्री वीज मिळते, ती दिवस उगविण्याआधीच बंद होत असते. त्यामुळे तीन दिवसांत लागवड करणे शक्य होत नाही. नर्सरीवर हजारो रुपये खर्च करून रोपे तयार करूनही विजेअभावी लागवड बंद पडते व पुन्हा लागवडसाठी दिवसाच्या वीजपुरवठ्याची चार दिवस प्रतिक्षा करावी लागते. तशात पाऊस आला तर रोपेही खराब होतात व मोठे आर्थिक नुकसान होते. परिणामी शेतकरी डबघाईस जातात आणि तीनच दिवस दिवसा विजेमुळे मजुरांचीही धांदल उडते व चार दिवस घरीच बसावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांसह त्यांचेही नुकसान होते. आधी रात्र व दिवस असे रोटेशन‌नुसार हे भारनियम बदलत होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून वीजवितरणकडून त्याच्यात बदलच केला नाही. मागील वर्षी लागवड कमी होती व रात्री येणारी वीज सकाळी नऊ वाजेपर्यंत मिळत होती. त्यामुळे अडचण भासली नव्हती. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणावर लागवड आहे व रात्री मिळणारी वीज सकाळी पाच वाजताच बंद होते.

भारनियमनाच्या वेळेत बदल करण्याची मागणी

विजेअभावी कांदा उत्पादक शेतकरी लागवडीआधीच वीज वितरणच्या सुलतानी संकटात सापडले आहेत. तरी महावितरणने याची वेळीच दखल घेऊन भारनियमच्या वेळेत बदल करून आठवड्यातून दिवसा तिन दिवसच होणारा वीजपुरवठा चार दिवस करावा व रात्री मिळणारा वीजपुरवठा सकाळी १० वाजेपर्यंत करावा अशी मागणी बिडगांव येथील महिला सरपंच विजया पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे.

चोपडा तालुक्यात कांद्याची लागवड सुरू असताना. (छाया : रावसाहेब पाटील,बिडगाव)