शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
4
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
5
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
6
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
7
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
8
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
9
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
10
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
11
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
12
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
13
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
14
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
15
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
16
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
17
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
18
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
19
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
20
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर

कांदा लागवडीला वीज वितरणचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बिडगाव ता. चोपडा : परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कांदा लागवडीला वीज वितरणच्या भारनियमनाचा खोडा ठरत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बिडगाव ता. चोपडा : परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कांदा लागवडीला वीज वितरणच्या भारनियमनाचा खोडा ठरत आहे. आठवड्यातून फक्त तीनच दिवस दिवसा वीज मिळत आहे.म्हणून कांदा लागवड करावी तरी अशी?असे संकट परिसरातील शेतकऱ्यांसमोर ठाकले आहे.

बिडगाव येथील सरपंच विजया देविदास पाटील यांनी परिसरात होणाऱ्या भारनियमनाच्या वेळेत बदल करून शेतकऱ्यांची कांदा लागवडीची समस्या सोडवावी, अशी मागणी लेखी स्वरूपात वीज वितरणकडे केली आहे.

बिडगावसह परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी महागडी हजारो रुपयांची कांद्याची बियाणे विकत घेऊन मोठ्या प्रमाणात कांदा रोपांच्या नर्सरी टाकून लागवडीचे नियोजन केले आहे. अनेक शेतकऱ्यांची रोपेही आता तयार झाली आहेत, तर काही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवडही सुरू केली आहे. ही लागवड आता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.

कांद्याची लागवड ही वाहत्या पाण्यात केली जाते व पाण्यासाठी विजेची आवश्यकता असते. मात्र, वीजवितरणचे भारनियम या कांदा लागवडीला अडथळा ठरत असून, लागवडी रेंगाळत आहेत. बिडगांव व कुंड्यापाणी या शेतशिवारात वीजपुरवठा करणाऱ्या फिडरला गेल्या चार वर्षांपासून आठवड्यातून फक्त शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीनच दिवस सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दिवसा वीज पुरवठा केला जातो व चार दिवस रात्री वीज मिळते, ती दिवस उगविण्याआधीच बंद होत असते. त्यामुळे तीन दिवसांत लागवड करणे शक्य होत नाही. नर्सरीवर हजारो रुपये खर्च करून रोपे तयार करूनही विजेअभावी लागवड बंद पडते व पुन्हा लागवडसाठी दिवसाच्या वीजपुरवठ्याची चार दिवस प्रतिक्षा करावी लागते. तशात पाऊस आला तर रोपेही खराब होतात व मोठे आर्थिक नुकसान होते. परिणामी शेतकरी डबघाईस जातात आणि तीनच दिवस दिवसा विजेमुळे मजुरांचीही धांदल उडते व चार दिवस घरीच बसावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांसह त्यांचेही नुकसान होते. आधी रात्र व दिवस असे रोटेशन‌नुसार हे भारनियम बदलत होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून वीजवितरणकडून त्याच्यात बदलच केला नाही. मागील वर्षी लागवड कमी होती व रात्री येणारी वीज सकाळी नऊ वाजेपर्यंत मिळत होती. त्यामुळे अडचण भासली नव्हती. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणावर लागवड आहे व रात्री मिळणारी वीज सकाळी पाच वाजताच बंद होते.

भारनियमनाच्या वेळेत बदल करण्याची मागणी

विजेअभावी कांदा उत्पादक शेतकरी लागवडीआधीच वीज वितरणच्या सुलतानी संकटात सापडले आहेत. तरी महावितरणने याची वेळीच दखल घेऊन भारनियमच्या वेळेत बदल करून आठवड्यातून दिवसा तिन दिवसच होणारा वीजपुरवठा चार दिवस करावा व रात्री मिळणारा वीजपुरवठा सकाळी १० वाजेपर्यंत करावा अशी मागणी बिडगांव येथील महिला सरपंच विजया पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे.

चोपडा तालुक्यात कांद्याची लागवड सुरू असताना. (छाया : रावसाहेब पाटील,बिडगाव)