शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पॉलिस्टर वापरामुळे कापसाच्या मागणीवर परिणामाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 07:26 IST

अतुल गणत्रा यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अमेरिकेत दुष्काळ व पाकिस्तानमध्ये आलेल्या महापुरामुळे या दोन्ही देशांमधील कापसाच्या उत्पादनात घट होणार असल्याने, भारतीय कापसाला मागणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळे कापसाचे दर खूप वाढतील अशीही शक्यता नाही. कारण कापसाचे दर वाढल्यामुळे देशातील अनेक स्पिनींग मिल उद्योजकांनी कापसाऐवजी पॉलीस्टरचा वापर वाढवला आहे. त्यामुळे देशातंर्गत मागणीत घट होईल. हे दर हमीभावापेक्षा जास्तच असले तरी ते खूप असण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणत्रा यांनी दिली आहे. 

यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची स्थिती कशी राहील, याबाबत मंथन करण्यासाठी रविवारी जैन हिल्सवरील सभागृहात ऑल इंडिया कॉटन ट्रेड मिटचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी समारोपीय भाषणात गणत्रा बोलत होते. या कार्यक्रमात बजाज स्टिलचे ललित कलंत्री,  महाराष्ट्र जिनींग असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग राजपाल, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, टेक्साईल्स कमीश्नर उषा पोळ, सीसीआयचे अर्जुन दवे, खान्देश जिनिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैन यांच्यासह देशभरातील जिनर्स, व्यापारी व काही शेतकरीदेखील उपस्थित होते.

देशात ३.६५ कोटी गाठींचे उत्पादन शक्यभारतात एकूण ३ कोटी ६५ लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता गणत्रा यांनी व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे उत्पन्नात २० ते २५ लाख गाठींचे उत्पादन घटण्याचा अंदाजही व्यक्त केला. सरकीचीही मागणी घटली आहे.

बांगलादेशात निर्यात करताना काळजी घ्या अमेरिकेत दुष्काळ, पाकिस्तानात महापूर यामुळे या दोन्ही देशांमधील कापसाचे उत्पादन कमी होणार असल्याने भारताच्या कापसाला मागणी वाढेल. मुख्य निर्यातदार देशांमध्ये बांगलादेशाचा समावेश आहे. मात्र, बांगलादेशात आर्थिक मंदी असल्याने या देशात निर्यात करताना काळजी घ्या, असे आवाहन वक्त्यांनी जिनर्स व व्यापाऱ्यांना केले. 

टॅग्स :cottonकापूसJalgaonजळगाव