शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

लोकसंख्या दिन विशेष : वाढत्या शहरीकरणामुळे सुविधांवर पडतोय ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 12:53 IST

साक्षरतेचे प्रमाण ८० टक्केच्या आतच

जळगाव : दिवसेंदिवस लोकसंख्या वाढीसह शहरीकरणातही वाढ होत असल्याने शहरी भागात सुविधांवर ताण पडत असल्याचे चित्र रोजगाराच्या शोधामुळे तयार झाले आहे. यास ग्रामीण भागातील दुष्काळी स्थिती कारणीभूत ठरत असल्याने शहरांमध्ये लोकसंख्या अधिक वाढत आहे. २००१ च्या तुलनेत २०११ च्या जनगणनेत जिल्ह्याच्या लोकसंख्येत ५ लाख ४७ हजार २२१ने वाढ झाली आहे. मात्र २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण हे ७८.२ टक्केच आहे. अजूनही हा आकडा ८० टक्क्यांवरही पोहचलेला नाही. लोकसंख्या वाढीचा दर पाहिला तर ०.६२ टक्क्यांनी कमी झाला आहे.शहरी भागात लोकसंख्या अधिकजिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ११.६४ लाख हेक्टर आहे. लागवडी खालील क्षेत्र ८.९३ लाख हेक्टर एवढे आहे. एकूण क्षेत्रफळाच्या ७७ टक्के क्षेत्र हे दरवर्षी लागवडीखाली येत असते. त्यामुळे पूर्वी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त दिसून येत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने शेतीवर मोठा परिणाम होत आहे. परिणामी रोजगाराच्या शोधात शहराकडे तरुण वर्ग धाव घेत आहे. गेल्या काही वर्षात रोजगाराच्या संधीमुळे जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ यासारख्या शहरांमध्ये झपाट्याने वाढ होत असून लोकांचा ओढा शहराकडे दिसून येत आहे. १९६१ मध्ये शहरी भागात राहणाºया लोकसंख्येची टक्केवारी २७.५३ टक्के होती ती आता ३१.८० टक्क्यांवर पोहोचली आहे. जळगाव शहराची लोकसंख्या ही जिल्ह्याच्या लोकसंख्येपैकी १० टक्क्यांच्यावर अर्थात चार लाख ६० हजार २२८ वर गेली आहे.महिला साक्षरतेवर भर आवश्यकजळगाव शहरात २०११च्या जनगणनेनुसार ४ लाख ६० हजार २२८ एकूण लोकसंख्या असून त्यात स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने कमी म्हणजे ८३.३७ टक्के आहे.त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या साक्षरतेसोबतच महिला साक्षरतेसाठी अधिक भर देण्याची गरज आहे.जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख २९ हजार ९१७२००१ मध्ये जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ८२ हजार ६९० होती. ही लोकसंख्या २०११ च्या जनगणनेअखेर ४२ लाख २९ हजार ९१७ झाली आहे. लोकसंख्या ५ लाख ४७ हजार २२१ने वाढली आहे. मात्र दशवार्षिक लोकसंख्या वाढ किंवा घटीचे प्रमाण लक्षात घेतले असता लोकसंख्या वाढीत ०.६२ टक्के घट असल्याचे लक्षात येते.घनतेत ४६ ने वाढघनतेचे प्रमाण पाहिले तर ज्या ठिकाणी पूर्वी (२००१) ३१३ व्यक्ती असत तेथे आता ३५४ व्यक्ती रहातात. त्यामुळे घनतेमध्ये ४६ ने वाढ झाल्याचे दिसून येते. हजारी स्त्री-पुरुष प्रमाणातही घट आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव