शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

लोकसंख्या दिन विशेष : वाढत्या शहरीकरणामुळे सुविधांवर पडतोय ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 12:53 IST

साक्षरतेचे प्रमाण ८० टक्केच्या आतच

जळगाव : दिवसेंदिवस लोकसंख्या वाढीसह शहरीकरणातही वाढ होत असल्याने शहरी भागात सुविधांवर ताण पडत असल्याचे चित्र रोजगाराच्या शोधामुळे तयार झाले आहे. यास ग्रामीण भागातील दुष्काळी स्थिती कारणीभूत ठरत असल्याने शहरांमध्ये लोकसंख्या अधिक वाढत आहे. २००१ च्या तुलनेत २०११ च्या जनगणनेत जिल्ह्याच्या लोकसंख्येत ५ लाख ४७ हजार २२१ने वाढ झाली आहे. मात्र २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण हे ७८.२ टक्केच आहे. अजूनही हा आकडा ८० टक्क्यांवरही पोहचलेला नाही. लोकसंख्या वाढीचा दर पाहिला तर ०.६२ टक्क्यांनी कमी झाला आहे.शहरी भागात लोकसंख्या अधिकजिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ११.६४ लाख हेक्टर आहे. लागवडी खालील क्षेत्र ८.९३ लाख हेक्टर एवढे आहे. एकूण क्षेत्रफळाच्या ७७ टक्के क्षेत्र हे दरवर्षी लागवडीखाली येत असते. त्यामुळे पूर्वी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त दिसून येत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने शेतीवर मोठा परिणाम होत आहे. परिणामी रोजगाराच्या शोधात शहराकडे तरुण वर्ग धाव घेत आहे. गेल्या काही वर्षात रोजगाराच्या संधीमुळे जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ यासारख्या शहरांमध्ये झपाट्याने वाढ होत असून लोकांचा ओढा शहराकडे दिसून येत आहे. १९६१ मध्ये शहरी भागात राहणाºया लोकसंख्येची टक्केवारी २७.५३ टक्के होती ती आता ३१.८० टक्क्यांवर पोहोचली आहे. जळगाव शहराची लोकसंख्या ही जिल्ह्याच्या लोकसंख्येपैकी १० टक्क्यांच्यावर अर्थात चार लाख ६० हजार २२८ वर गेली आहे.महिला साक्षरतेवर भर आवश्यकजळगाव शहरात २०११च्या जनगणनेनुसार ४ लाख ६० हजार २२८ एकूण लोकसंख्या असून त्यात स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने कमी म्हणजे ८३.३७ टक्के आहे.त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या साक्षरतेसोबतच महिला साक्षरतेसाठी अधिक भर देण्याची गरज आहे.जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख २९ हजार ९१७२००१ मध्ये जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ८२ हजार ६९० होती. ही लोकसंख्या २०११ च्या जनगणनेअखेर ४२ लाख २९ हजार ९१७ झाली आहे. लोकसंख्या ५ लाख ४७ हजार २२१ने वाढली आहे. मात्र दशवार्षिक लोकसंख्या वाढ किंवा घटीचे प्रमाण लक्षात घेतले असता लोकसंख्या वाढीत ०.६२ टक्के घट असल्याचे लक्षात येते.घनतेत ४६ ने वाढघनतेचे प्रमाण पाहिले तर ज्या ठिकाणी पूर्वी (२००१) ३१३ व्यक्ती असत तेथे आता ३५४ व्यक्ती रहातात. त्यामुळे घनतेमध्ये ४६ ने वाढ झाल्याचे दिसून येते. हजारी स्त्री-पुरुष प्रमाणातही घट आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव