शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

गाळ्यांच्या विषयात पुन्हा राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:17 IST

वार्तापत्र महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत गेल्या आठ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहेत. एकीकडे गाळेधारकांनाही न्याय दिला जात नाही; ...

वार्तापत्र

महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत गेल्या आठ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहेत. एकीकडे गाळेधारकांनाही न्याय दिला जात नाही; तर दुसरीकडे महापालिकेला ढासळत जात असलेल्या आर्थिक गर्तेतूनही बाहेर काढले जात नाही. गाळेधारकांबाबत शहरातील लोकप्रतिनिधींना केवळ राजकारण करायचे असून, हा विषय मार्गी न लावता केवळ चघळत ठेवावा अशीच भूमिका महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी व शहरातील लोकप्रतिनिधींनी घेतलेली दिसून येत आहे. २३ मार्केटमधील गाळेधारकांची मुदत २०१२ मध्ये संपली आहे. महापालिकेने मुदत संपल्यानंतर गाळेधारकांना गाळे खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्या ठिकाणी न्यायालयाने महापालिकेच्या प्रशासनाच्या बाजूने निर्णय देत गाळे ताब्यात घेण्याचे व थकीत भाडे पट्टीची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही गाळेधारकांबाबत सहानुभूतीने निर्णय व्हावा, तोडगा काढण्यात यावा यासाठी तब्बल आठ वर्षांपासून या विषयावर मंथन सुरू आहे. मात्र, तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे, आठ वर्षांपासून महापालिकेला या २३ मार्केटमधील गाळेधारकांकडून भाड्याची रक्कमही मिळालेली नाही. मध्यंतरी फुले मार्केटमधील गाळेधारकांनी १०० कोटींची रक्कम भरली होती. मात्र, इतरांनी अजूनही रक्कम भरलेली नाही. ही रक्कम आजच्या घडीस २५० कोटींपर्यंत गेली आहे. शहरात रस्त्यांची गैरसोय सुरूच आहे. नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना सोयी-सुविधा मिळण्यास अडचणी होत आहे; तर दुसरीकडे शहरातील लोकप्रतिनिधी केवळ मतांच्या राजकारणामुळे हा विषय मार्गीच लावण्याचा मन:स्थितीत नाहीत. अख्खे शहर आज खड्ड्यात आहे. धुळीने नागरिक बेहाल आहेत. शासनाकडून निधी नाही, तरीही सत्ताधाऱ्यांना हा विषय सोडविण्यास रस नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल. जोपर्यंत महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारू शकत नाही तोपर्यंत महापालिकेच्या फंडातून कोट्यवधींचे रस्त्यांचे कितीही ठराव केले तरी ही कामे मार्गी लागणे कठीणच आहे. केवळ खड्ड्यांनी त्रस्त असलेल्या जळगावकरांना गाजर दाखविण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. महापालिका प्रशासनाने गाळेधारकांबाबत धोरण निश्चितीसाठी भला मोठा प्रस्ताव तयार केला. तसेच महासभेत हा प्रस्ताव मांडून हा विषय मार्गी लावण्याची तयारी दाखविली होती. मात्र, आता सत्ताधाऱ्यांनी पुन्हा या विषयात खोडा घालत, हा विषय महासभेपुढे येऊ दिलेला नाही. जर गाळेप्रश्नी राजकारण करायचे असेल तर गाळेधारकांना न्यायदेखील मिळणार नाही व महापालिकेची आर्थिक परिस्थितीदेखील सुधारू शकणार नाही. जळगावकरांना केवळ आश्वासनांचे गाजर दिले जाईल आणि त्यांना खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागेल. कारण, जळगावकरांचे व गाळेधारकांचे भले इच्छिणाऱ्या लोकप्रतिनिधींचा जळगाव शहरात एक प्रकारे दुष्काळच पडला. लोकप्रतिनिधी या विषयाकडे केवळ मतांच्या राजकारणाच्याच कोनातून पाहत आहेत. जोपर्यंत लोकप्रतिनिधींचा हा दृष्टिकोन बदलणार नाही, तोपर्यंत जळगावकरांचे समस्यांचे ग्रहणदेखील सुटणार नाहीं.