शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

गाळ्यांच्या विषयात पुन्हा राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:17 IST

वार्तापत्र महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत गेल्या आठ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहेत. एकीकडे गाळेधारकांनाही न्याय दिला जात नाही; ...

वार्तापत्र

महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत गेल्या आठ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहेत. एकीकडे गाळेधारकांनाही न्याय दिला जात नाही; तर दुसरीकडे महापालिकेला ढासळत जात असलेल्या आर्थिक गर्तेतूनही बाहेर काढले जात नाही. गाळेधारकांबाबत शहरातील लोकप्रतिनिधींना केवळ राजकारण करायचे असून, हा विषय मार्गी न लावता केवळ चघळत ठेवावा अशीच भूमिका महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी व शहरातील लोकप्रतिनिधींनी घेतलेली दिसून येत आहे. २३ मार्केटमधील गाळेधारकांची मुदत २०१२ मध्ये संपली आहे. महापालिकेने मुदत संपल्यानंतर गाळेधारकांना गाळे खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्या ठिकाणी न्यायालयाने महापालिकेच्या प्रशासनाच्या बाजूने निर्णय देत गाळे ताब्यात घेण्याचे व थकीत भाडे पट्टीची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही गाळेधारकांबाबत सहानुभूतीने निर्णय व्हावा, तोडगा काढण्यात यावा यासाठी तब्बल आठ वर्षांपासून या विषयावर मंथन सुरू आहे. मात्र, तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे, आठ वर्षांपासून महापालिकेला या २३ मार्केटमधील गाळेधारकांकडून भाड्याची रक्कमही मिळालेली नाही. मध्यंतरी फुले मार्केटमधील गाळेधारकांनी १०० कोटींची रक्कम भरली होती. मात्र, इतरांनी अजूनही रक्कम भरलेली नाही. ही रक्कम आजच्या घडीस २५० कोटींपर्यंत गेली आहे. शहरात रस्त्यांची गैरसोय सुरूच आहे. नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना सोयी-सुविधा मिळण्यास अडचणी होत आहे; तर दुसरीकडे शहरातील लोकप्रतिनिधी केवळ मतांच्या राजकारणामुळे हा विषय मार्गीच लावण्याचा मन:स्थितीत नाहीत. अख्खे शहर आज खड्ड्यात आहे. धुळीने नागरिक बेहाल आहेत. शासनाकडून निधी नाही, तरीही सत्ताधाऱ्यांना हा विषय सोडविण्यास रस नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल. जोपर्यंत महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारू शकत नाही तोपर्यंत महापालिकेच्या फंडातून कोट्यवधींचे रस्त्यांचे कितीही ठराव केले तरी ही कामे मार्गी लागणे कठीणच आहे. केवळ खड्ड्यांनी त्रस्त असलेल्या जळगावकरांना गाजर दाखविण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. महापालिका प्रशासनाने गाळेधारकांबाबत धोरण निश्चितीसाठी भला मोठा प्रस्ताव तयार केला. तसेच महासभेत हा प्रस्ताव मांडून हा विषय मार्गी लावण्याची तयारी दाखविली होती. मात्र, आता सत्ताधाऱ्यांनी पुन्हा या विषयात खोडा घालत, हा विषय महासभेपुढे येऊ दिलेला नाही. जर गाळेप्रश्नी राजकारण करायचे असेल तर गाळेधारकांना न्यायदेखील मिळणार नाही व महापालिकेची आर्थिक परिस्थितीदेखील सुधारू शकणार नाही. जळगावकरांना केवळ आश्वासनांचे गाजर दिले जाईल आणि त्यांना खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागेल. कारण, जळगावकरांचे व गाळेधारकांचे भले इच्छिणाऱ्या लोकप्रतिनिधींचा जळगाव शहरात एक प्रकारे दुष्काळच पडला. लोकप्रतिनिधी या विषयाकडे केवळ मतांच्या राजकारणाच्याच कोनातून पाहत आहेत. जोपर्यंत लोकप्रतिनिधींचा हा दृष्टिकोन बदलणार नाही, तोपर्यंत जळगावकरांचे समस्यांचे ग्रहणदेखील सुटणार नाहीं.