शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

गाळ्यांच्या विषयात पुन्हा राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:17 IST

वार्तापत्र महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत गेल्या आठ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहेत. एकीकडे गाळेधारकांनाही न्याय दिला जात नाही; ...

वार्तापत्र

महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत गेल्या आठ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहेत. एकीकडे गाळेधारकांनाही न्याय दिला जात नाही; तर दुसरीकडे महापालिकेला ढासळत जात असलेल्या आर्थिक गर्तेतूनही बाहेर काढले जात नाही. गाळेधारकांबाबत शहरातील लोकप्रतिनिधींना केवळ राजकारण करायचे असून, हा विषय मार्गी न लावता केवळ चघळत ठेवावा अशीच भूमिका महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी व शहरातील लोकप्रतिनिधींनी घेतलेली दिसून येत आहे. २३ मार्केटमधील गाळेधारकांची मुदत २०१२ मध्ये संपली आहे. महापालिकेने मुदत संपल्यानंतर गाळेधारकांना गाळे खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्या ठिकाणी न्यायालयाने महापालिकेच्या प्रशासनाच्या बाजूने निर्णय देत गाळे ताब्यात घेण्याचे व थकीत भाडे पट्टीची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही गाळेधारकांबाबत सहानुभूतीने निर्णय व्हावा, तोडगा काढण्यात यावा यासाठी तब्बल आठ वर्षांपासून या विषयावर मंथन सुरू आहे. मात्र, तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे, आठ वर्षांपासून महापालिकेला या २३ मार्केटमधील गाळेधारकांकडून भाड्याची रक्कमही मिळालेली नाही. मध्यंतरी फुले मार्केटमधील गाळेधारकांनी १०० कोटींची रक्कम भरली होती. मात्र, इतरांनी अजूनही रक्कम भरलेली नाही. ही रक्कम आजच्या घडीस २५० कोटींपर्यंत गेली आहे. शहरात रस्त्यांची गैरसोय सुरूच आहे. नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना सोयी-सुविधा मिळण्यास अडचणी होत आहे; तर दुसरीकडे शहरातील लोकप्रतिनिधी केवळ मतांच्या राजकारणामुळे हा विषय मार्गीच लावण्याचा मन:स्थितीत नाहीत. अख्खे शहर आज खड्ड्यात आहे. धुळीने नागरिक बेहाल आहेत. शासनाकडून निधी नाही, तरीही सत्ताधाऱ्यांना हा विषय सोडविण्यास रस नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल. जोपर्यंत महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारू शकत नाही तोपर्यंत महापालिकेच्या फंडातून कोट्यवधींचे रस्त्यांचे कितीही ठराव केले तरी ही कामे मार्गी लागणे कठीणच आहे. केवळ खड्ड्यांनी त्रस्त असलेल्या जळगावकरांना गाजर दाखविण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. महापालिका प्रशासनाने गाळेधारकांबाबत धोरण निश्चितीसाठी भला मोठा प्रस्ताव तयार केला. तसेच महासभेत हा प्रस्ताव मांडून हा विषय मार्गी लावण्याची तयारी दाखविली होती. मात्र, आता सत्ताधाऱ्यांनी पुन्हा या विषयात खोडा घालत, हा विषय महासभेपुढे येऊ दिलेला नाही. जर गाळेप्रश्नी राजकारण करायचे असेल तर गाळेधारकांना न्यायदेखील मिळणार नाही व महापालिकेची आर्थिक परिस्थितीदेखील सुधारू शकणार नाही. जळगावकरांना केवळ आश्वासनांचे गाजर दिले जाईल आणि त्यांना खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागेल. कारण, जळगावकरांचे व गाळेधारकांचे भले इच्छिणाऱ्या लोकप्रतिनिधींचा जळगाव शहरात एक प्रकारे दुष्काळच पडला. लोकप्रतिनिधी या विषयाकडे केवळ मतांच्या राजकारणाच्याच कोनातून पाहत आहेत. जोपर्यंत लोकप्रतिनिधींचा हा दृष्टिकोन बदलणार नाही, तोपर्यंत जळगावकरांचे समस्यांचे ग्रहणदेखील सुटणार नाहीं.