शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर राजकारणी ठरले वरचढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 12:48 IST

असे एकही क्षेत्र नाही, की त्यात राजकीय हस्तक्षेप किंवा राजकारण झालेले नाही. प्रत्येक विभागात कार्यकारी पदावर (एक्झीकेटिव्ह पोस्टींग) नियुक्ती करायची असेल तर राजकीय शक्तीचा वापर आलाच. काही अधिकारी स्वत:हून राजकिय व्यक्तींची मदत घेतात तर कधी राजकीय व्यक्तीच विशिष्ट अधिका-यासाठी आग्रही असतात. असे जिल्ह्यात अनेक उदाहरणे आहेत

ठळक मुद्देविश्लेषणपोलीस अधीक्षक पालकत्व विसरले पोलीस दलात धोक्याची घंटा

सुनील पाटीलजळगाव : असे एकही क्षेत्र नाही, की त्यात राजकीय हस्तक्षेप किंवा राजकारण झालेले नाही. प्रत्येक विभागात कार्यकारी पदावर (एक्झीकेटिव्ह पोस्टींग) नियुक्ती करायची असेल तर राजकीय शक्तीचा वापर आलाच. काही अधिकारी स्वत:हून राजकिय व्यक्तींची मदत घेतात तर कधी राजकीय व्यक्तीच विशिष्ट अधिका-यासाठी आग्रही असतात. असे जिल्ह्यात अनेक उदाहरणे आहेत. सरळमार्गी काम करणा-या अधिका-याला राजकीय शिफारशीची गरजच भासत नाही. त्यांना कर्तत्वाच्या जोरावर नियुक्ती मिळते नाही तर अकार्यकारी पदावर (साईड पोस्टींग) त्यांना काम करावे लागते. चोपडा शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले किसन नजन पाटील यांच्याबाबतीत असाच प्रकार घडला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया भाजप पदाधिका-याची गाडी अडविल्याने वादाची ठिणगी पडली. त्यानंतर नजन पाटील यांची कॉलर पकडण्यापर्यंत भाजप पदाधिकाºयाची मजल गेली. हा वाद चिघळल्याने पाटील यांनी भाजपाच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली. खरे तर या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी पालक या नात्याने नजन पाटील यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहणे अपेक्षित होते. परंतु, झाले उलटेच. अवैध धंद्याचे कारण देऊन नजन पाटील यांची उचलबांगडी करुन त्यांना कंट्रोल जमा केले. या कारवाईतून जिल्हा पोलीस दलात चुकीचा संदेश गेला. याआधी देखील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक संदीप पाटील पाटील यांचीही बदली अशीच राजकीय दबावातून झाली होती. या दोन्ही अधिका-यांमध्ये एका गोष्टीचे साम्य होते, ते म्हणजे दोघांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली होती. राजकीय व्यक्ती गुन्हेगारी करुन पोलिसांवर वरचढ ठरत असतील व अशा वेळी वरिष्ठ अधिकारी खात्यातील अधिकारी व कर्मचा-यांच्या पाठीशी राहण्याऐवजी गुंडगिरी करणा-या राजकीय नेत्यांना व त्यांना आश्रय देणा-या पुढाºयांचे ऐकून कारवाई करायला लागले तर पोलिसांनी काम तरी कसे करावे. प्रत्येक ठिकाणी अवैध धंदे हेच कारण पुढे करुन पोलिसांना संशयाच्या नजरेने पाहणे चुकीचे आहे. जिल्ह्यातील वस्तुस्थिती पाहिली तर अनेक अवैध धंद्यांमध्ये राजकीय व्यक्तींची भागीदारी आहे. व्हाईट कॉलर गुन्हेगार म्हणून ते वावरत आहेत. एका तत्कालिन पोलीस अधीक्षकांच्या कार्यकाळात तर अवैध धंद्यातून पक्षाचे पदाधिकारी असलेल्या काही पुढा-यांना दरमहा लाखोचा मलिदा मिळत होता, म्हणूनच दंगली व प्रतिस्पर्धी पुढा-यांवर हल्ला होऊनही निरीक्षकांची बदली झालेली नव्हती. सत्तेचा माज चढल्यामुळेच ‘खादी’तील काही गुन्हेगार ‘खाकी’वर वरचढ ठरले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनाच मदत करुन आपल्या अधिकारी व कर्मचाºयांचा बळी घेणे हे पोलीस दलाला घातक ठरणार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी