शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पोलिसांवर राजकारणी ठरले वरचढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 12:48 IST

असे एकही क्षेत्र नाही, की त्यात राजकीय हस्तक्षेप किंवा राजकारण झालेले नाही. प्रत्येक विभागात कार्यकारी पदावर (एक्झीकेटिव्ह पोस्टींग) नियुक्ती करायची असेल तर राजकीय शक्तीचा वापर आलाच. काही अधिकारी स्वत:हून राजकिय व्यक्तींची मदत घेतात तर कधी राजकीय व्यक्तीच विशिष्ट अधिका-यासाठी आग्रही असतात. असे जिल्ह्यात अनेक उदाहरणे आहेत

ठळक मुद्देविश्लेषणपोलीस अधीक्षक पालकत्व विसरले पोलीस दलात धोक्याची घंटा

सुनील पाटीलजळगाव : असे एकही क्षेत्र नाही, की त्यात राजकीय हस्तक्षेप किंवा राजकारण झालेले नाही. प्रत्येक विभागात कार्यकारी पदावर (एक्झीकेटिव्ह पोस्टींग) नियुक्ती करायची असेल तर राजकीय शक्तीचा वापर आलाच. काही अधिकारी स्वत:हून राजकिय व्यक्तींची मदत घेतात तर कधी राजकीय व्यक्तीच विशिष्ट अधिका-यासाठी आग्रही असतात. असे जिल्ह्यात अनेक उदाहरणे आहेत. सरळमार्गी काम करणा-या अधिका-याला राजकीय शिफारशीची गरजच भासत नाही. त्यांना कर्तत्वाच्या जोरावर नियुक्ती मिळते नाही तर अकार्यकारी पदावर (साईड पोस्टींग) त्यांना काम करावे लागते. चोपडा शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले किसन नजन पाटील यांच्याबाबतीत असाच प्रकार घडला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया भाजप पदाधिका-याची गाडी अडविल्याने वादाची ठिणगी पडली. त्यानंतर नजन पाटील यांची कॉलर पकडण्यापर्यंत भाजप पदाधिकाºयाची मजल गेली. हा वाद चिघळल्याने पाटील यांनी भाजपाच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली. खरे तर या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी पालक या नात्याने नजन पाटील यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहणे अपेक्षित होते. परंतु, झाले उलटेच. अवैध धंद्याचे कारण देऊन नजन पाटील यांची उचलबांगडी करुन त्यांना कंट्रोल जमा केले. या कारवाईतून जिल्हा पोलीस दलात चुकीचा संदेश गेला. याआधी देखील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक संदीप पाटील पाटील यांचीही बदली अशीच राजकीय दबावातून झाली होती. या दोन्ही अधिका-यांमध्ये एका गोष्टीचे साम्य होते, ते म्हणजे दोघांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली होती. राजकीय व्यक्ती गुन्हेगारी करुन पोलिसांवर वरचढ ठरत असतील व अशा वेळी वरिष्ठ अधिकारी खात्यातील अधिकारी व कर्मचा-यांच्या पाठीशी राहण्याऐवजी गुंडगिरी करणा-या राजकीय नेत्यांना व त्यांना आश्रय देणा-या पुढाºयांचे ऐकून कारवाई करायला लागले तर पोलिसांनी काम तरी कसे करावे. प्रत्येक ठिकाणी अवैध धंदे हेच कारण पुढे करुन पोलिसांना संशयाच्या नजरेने पाहणे चुकीचे आहे. जिल्ह्यातील वस्तुस्थिती पाहिली तर अनेक अवैध धंद्यांमध्ये राजकीय व्यक्तींची भागीदारी आहे. व्हाईट कॉलर गुन्हेगार म्हणून ते वावरत आहेत. एका तत्कालिन पोलीस अधीक्षकांच्या कार्यकाळात तर अवैध धंद्यातून पक्षाचे पदाधिकारी असलेल्या काही पुढा-यांना दरमहा लाखोचा मलिदा मिळत होता, म्हणूनच दंगली व प्रतिस्पर्धी पुढा-यांवर हल्ला होऊनही निरीक्षकांची बदली झालेली नव्हती. सत्तेचा माज चढल्यामुळेच ‘खादी’तील काही गुन्हेगार ‘खाकी’वर वरचढ ठरले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनाच मदत करुन आपल्या अधिकारी व कर्मचाºयांचा बळी घेणे हे पोलीस दलाला घातक ठरणार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी