शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

जनतेला मूर्ख ठरविणारा राजकीय तमाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:57 IST

विधानसभा निवडणुकीच्या महिनाभरानंतरही राजकीय अनिश्चितता कायम; नव्या सरकारच्या स्थैर्याविषयी प्रश्नचिन्ह, महाराष्टÑाच्या विकासाची, शेतकऱ्याच्या संकट निवारणाची भाषा करीत राजकीय पक्षांकडून कोलांटउड्या सुरुच

मिलिंद कुलकर्णीविधानसभा निवडणुकांपूर्वी दोन महिने आणि आता निकालानंतर एक महिना महाराष्टÑात राजकीय अस्थिरता आहे. आचारसंहितेचा काळ आणि महिनाभरातील अस्थिरतेने राज्यशकट थांबले आहे. जनादेश मागत असताना महाराष्टÑाचा विकास आम्हीच करु अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना करणारे राजकीय नेते असा अचानक रंग बदलताना पाहून सामान्य जनता चकीत झाली आहे. नैसर्गिक संकटाने पुरत्या मोडून पडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्याची वेळ असताना राजकीय तमाशा भरात आलेला आहे. बळीराजाचा कैवार घेणारी मंडळी आता त्याची चेष्टा करीत आहे.महाराष्टÑातील सत्तासंघर्ष हा आता व्यक्तिगत अहंकार, मानापमान, जिरविणे, कौटुंबिक कलह अशा मानवी भावभावनांच्या पातळीवर येऊन ठेपला आहे. सामान्य माणसाच्या आकलनापलिकडे हे राजकारण जाऊन पोहोचले आहे. प्रत्येक राजकीय पक्षात अनेक ‘चाणक्य’ निर्माण झाले असून दिवसागणिक भूमिका आणि रणनीतीमध्ये बदल झालेला दिसून येत आहे.भाजप आणि शिवसेनेने महाराष्टÑातील जनतेला जनादेश मागितला. पाच वर्षांच्या युती सरकारच्या कार्यकाळाचे मुल्यमापन करीत जनतेने दोन्ही पक्षांना काठावर पास केले. बहुमत मिळाले. काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसला विरोधी बाकावर बसविले. मतदान करुन जनतेची भूमिका संपली. मात्र सत्ता स्थापन करताना मानापमान नाट्य सुरु झाले. मुख्यमंत्रिपदावरुन घोडे अडले. केंद्र सरकार ताब्यात असलेल्या भाजपला नमते घेऊन शिवसेनेचा आग्रह मानणे कमीपणाचे वाटले. भाजपची एकदा जिरवायची ही भूमिका घेत शिवसेनेने सर्व पर्याय खुले करीत काँग्रेस-राष्टÑवादीशी बोलणी सुरु केली. ही बोलणी किती लांबावी की, प्रतिस्पर्धी पक्षाला पुढील चाल मिळावी, असे राजकारण घडले. सत्तास्थापनेसाठी दोन दिवसांचा अवधी वाढवून मिळाला नाही, म्हणून सर्वोच्च न्यायालयात जाणाºया शिवसेनेला दहा दिवस उलटूनही सत्ता स्थापनेचे समीकरण जुळविता आले नाही.हातातील सत्ता जाणार म्हणून भाजपकडून वेगवेगळे हातखंडे वापरले जाणार हे उघड होते. राष्टÑपती राजवट असो की, पहाटे नव्या सरकारचा शपथविधी असो...राजकारणातील मुरब्बी मंडळींना याची कल्पना नसेल असे कसे म्हणावे?आता नितीमत्ता, लोकशाही मुल्यांच्या नावाने सगळे गळा काढत असले तरी सर्वच राजकीय पक्षांनी त्याचे उल्लंघन केलेले आहेच. युती आणि आघाडी असताना मध्येच तीन पक्षांची आघाडी हे कोणत्या नितीमत्तेत बसते? २०१४ मध्ये सर्व चारही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते, तेव्हा असे घडले असते तर ते स्वाभाविक होते. त्यावेळीदेखील राष्टÑवादीने न मागता भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला होता. नंतर सेना सरकारमध्ये सहभागी झाली होती. ही राजकीय तडजोड मानता येते. पण आता? तीन पक्षांनी एकत्र येऊन बहुमत होत असेल तर चर्चेचे गुºहाळ का लांबवले गेले? याचा अर्थ असा की, कोणत्याही पक्षाचा एकमेकांवर विश्वास नाही. ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या पळवापळवीसारखे आमदारांची पळवापळवी हे नाट्य महाराष्टÑाला नवीन आहे.युती करुन सेना ही भाजपला सत्तेपासून रोखत असेल तर उद्या इतर कोणाबाबतही असे घडू शकेल म्हणून दोन्ही काँग्रेस सगळ्या गोष्टी आधीच स्पष्ट करुन घेत आहेत, असे दिसते. या घोळाचा फायदा भाजपने घेतला. हे चातुर्य असले तरी या सरकारच्या वैधतेविषयी संवैधानिक प्रश्न निर्माण झाले असल्याने सरकार बनूनही राज्याला, जनतेला फायदा काहीच नाही. अस्थिरतेची टांगती तलवार महिनाभरानंतरही कायम आहे. कोणतेही सरकार बनले तरी त्याचा पाया ठिसूळ राहणार आहे, हे घडामोडींवरुन स्पष्ट झाले आहे.या परिस्थितीला सर्वच राजकीय पक्ष जबाबदार आहेत. निवडणूकपूर्व युती आणि आघाडी करुन जनादेश मागितला गेला. जनादेशाचा अनादर करीत अंतर्गत करारावरुन वादंग, बंडाळीसारख्या गोष्टी लोकशाहीला काळीमा फासणाºया आहेत. शिवसेनेने निकालानंतर मुख्यमंत्रिपदासाठी हट्ट धरणे असो की, अजित पवार यांनी भाजपशी केलेली हातमिळवणी असो या दोन्ही गोष्टी नैतिकतेच्या कोणत्या कसोटीला उतरतात? मध्यावधी निवडणुकांकडे महाराष्टÑ पुन्हा जाण्याची शक्यता दिसत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव