शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

राजकीय खेळींना आता मर्यादा येणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 12:41 IST

जि़प.अध्यक्षपद : महिला राखीवमुळे अनेकांचा हिरमोड, पक्षाचा निर्णय मान्य करण्यातच धन्यता?

आनंद सुरवाडे ।जळगाव : जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाचे आरक्षण महिला (खुले) निश्चित झाल्याने जिल्हा परिषदेत वेगळ्या सत्तासमीकरणाच्या आशा धुसर झाल्याचे चित्र आहे़ अध्यक्षपद खुले निश्चत झाले असते तर स्पर्धा वाढून राजकीय खेळींना उत आला असता आता मात्र, पक्षाकडून दिलेल्या उमेदवारांना पक्षाचा आदेश माणून स्वीकारले जाईल, असे सदस्यांच्या एकंदरीत हालचालींवरून स्पष्ट होत आहे़जिल्हा परिषदेत निधीच्या मुद्दयावरून नाराज गटाची भूमिका महत्त्वाची ठरेल असे संकेत होते, मात्र, या सदस्यांचा पक्षांना नव्हे अध्यक्ष, उपाध्यक्षांना अधिक विरोध दिसून येत आहे़ त्यामुळे पक्षाने दुसरा उमेदवार दिल्यास हा गट बाहेर पडण्याची शक्यता मावळण्यात जमा आहे़ शिवाय अशा स्थितीत राष्ट्रीय व सेना काही राजकीय खेळी खेळेल का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे़ आकड्यांची जुळवाजुळव सोपी नसल्याने सेना, राष्ट्रवादी यात कितपत रस घेईल? हे बघावे लागणार आहे़ असा सूर जि़प़च्या राजकीय वर्तुळात उमटत आहे़भाजपकडून यांची नावे चर्चेतभाजपकडून बांधकाम सभापती रजनी चव्हाण, विद्या खोडपे, नंदा पाटील, माधुरी अत्तरदे आदी नावे चर्चेत आहेत़ यातही रजनी चव्हाण यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे़चर्चेतील नावांना विरोधचर्चेतील एका नावाला काही सदस्यांचा विरोध असून हा विरोध स्पष्ट दर्शवून काँग्रेस- शिवसेना- राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन वेगळी सत्ता बसू शकते, असे संकेत काही सदस्यांनी दिले आहेत़ यात सेना किंवा राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद देऊन त्यांचा पाठिंबा मिळविला जाईल व एका गटाला सत्तेपासून दूर ठेवले जाईल, या समिकरणावरही अभ्यास सुरू असल्याचे समजते़ मात्र, जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष भाजपचाच होईल, असा दावा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केला आहे़ यासह काँग्रेसचे आरोग्य सभापती दिलीप पाटील यांचे बंधू आधिच भाजपात गेल्याने त्यांची भूमिका अजुनतरी अस्पष्ट आहे़ त्यामुळे काँग्रेस पाठिंबा काढून घेण्याचे संकेतही धुसर दिसत आहे़ चाळीस सदस्यांना अन्य सदस्यांपेक्षा अधिक निधी दिल्याचा दावा अध्यक्षांनी केला आहे, बहुमतासाठी आवश्यक ३४चा आकडा गाठणे भाजपला तेवढे कठीण नसल्याचे यावरून दिसते, त्यामुळे काँग्रेस, भाजपला पाठिंबा देणारे राष्ट्रवादीच्या सदस्यांची भूमिका आता महत्त्वाची ठरेल़ अध्यक्ष निवडीनंतर काहीच दिवसात उपाध्यक्ष व समिती सभापतींची निवडही होणार आहे़महाशिवआघाडीचे समीकरण अंधारातशिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस या तिघांनी मिळून सत्ता स्थापन करण्याचे ठरविले तरी त्यांच्याकडे ३२ सदस्य होतात़ बहुमताचा आकडा त्यांना गाठता येत नाही़ निधीच्या मुद्दयावरून भाजपचा एक गट बाहेर पडल्यास हे शक्य होईल, नाराज सदस्य अध्यक्षनिवडीच्या वेळी गैरहजर राहिल्यास हे समिकरण शक्य आहे़ मात्र, हा गटही पदाच्या अपेक्षेत असेल, जर गैरहजर राहून महाशिवआघाडीला पाठिंबा या गटाने दिला तर त्यांना पद मिळण्याची शक्यता नाही, भाजपमध्येच राहुन किमान समिती सभापतीपद पदरात पाडून घेत हा गट फूटण्याची शक्यता कमी आहे़ शिवाय आरक्षण महिला राखीव असल्याने राजकीय खेळ्यांना ब्रेक बसेल़ यामुळे सध्याच्या समीकरणांवरून व्हीप न बजावताच अध्यक्ष निवड पार पडण्याचे संकेत अधिक असून महाशिवआघाडीचे समीकरण अंधारात असल्याचे चित्र आहे़ शिवाय निधीवरून नाराज सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे कुणी नाही, त्यामुळे ते सत्तेतून बाहेर पडण्याी शक्यता कमी आहे़जर महाशिवआघाडी झालीच तर काय?शिवसेनेच्या रेखा राजपूत, राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील, सरोजनी गरूड, डॉ़ निलम पाटील यांची नावे चर्चेत राहतील़ यात गेल्या निववडणुकीत राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील यांचा अध्यक्षपदाच्या शर्यतीत दहा मतांनी पराभव झाला होता़ काँग्रेसने भाजपला मतदान केले होते तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य गैरहजर राहिले होते़

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव