शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राजकीय खेळींना आता मर्यादा येणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 12:41 IST

जि़प.अध्यक्षपद : महिला राखीवमुळे अनेकांचा हिरमोड, पक्षाचा निर्णय मान्य करण्यातच धन्यता?

आनंद सुरवाडे ।जळगाव : जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाचे आरक्षण महिला (खुले) निश्चित झाल्याने जिल्हा परिषदेत वेगळ्या सत्तासमीकरणाच्या आशा धुसर झाल्याचे चित्र आहे़ अध्यक्षपद खुले निश्चत झाले असते तर स्पर्धा वाढून राजकीय खेळींना उत आला असता आता मात्र, पक्षाकडून दिलेल्या उमेदवारांना पक्षाचा आदेश माणून स्वीकारले जाईल, असे सदस्यांच्या एकंदरीत हालचालींवरून स्पष्ट होत आहे़जिल्हा परिषदेत निधीच्या मुद्दयावरून नाराज गटाची भूमिका महत्त्वाची ठरेल असे संकेत होते, मात्र, या सदस्यांचा पक्षांना नव्हे अध्यक्ष, उपाध्यक्षांना अधिक विरोध दिसून येत आहे़ त्यामुळे पक्षाने दुसरा उमेदवार दिल्यास हा गट बाहेर पडण्याची शक्यता मावळण्यात जमा आहे़ शिवाय अशा स्थितीत राष्ट्रीय व सेना काही राजकीय खेळी खेळेल का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे़ आकड्यांची जुळवाजुळव सोपी नसल्याने सेना, राष्ट्रवादी यात कितपत रस घेईल? हे बघावे लागणार आहे़ असा सूर जि़प़च्या राजकीय वर्तुळात उमटत आहे़भाजपकडून यांची नावे चर्चेतभाजपकडून बांधकाम सभापती रजनी चव्हाण, विद्या खोडपे, नंदा पाटील, माधुरी अत्तरदे आदी नावे चर्चेत आहेत़ यातही रजनी चव्हाण यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे़चर्चेतील नावांना विरोधचर्चेतील एका नावाला काही सदस्यांचा विरोध असून हा विरोध स्पष्ट दर्शवून काँग्रेस- शिवसेना- राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन वेगळी सत्ता बसू शकते, असे संकेत काही सदस्यांनी दिले आहेत़ यात सेना किंवा राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद देऊन त्यांचा पाठिंबा मिळविला जाईल व एका गटाला सत्तेपासून दूर ठेवले जाईल, या समिकरणावरही अभ्यास सुरू असल्याचे समजते़ मात्र, जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष भाजपचाच होईल, असा दावा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केला आहे़ यासह काँग्रेसचे आरोग्य सभापती दिलीप पाटील यांचे बंधू आधिच भाजपात गेल्याने त्यांची भूमिका अजुनतरी अस्पष्ट आहे़ त्यामुळे काँग्रेस पाठिंबा काढून घेण्याचे संकेतही धुसर दिसत आहे़ चाळीस सदस्यांना अन्य सदस्यांपेक्षा अधिक निधी दिल्याचा दावा अध्यक्षांनी केला आहे, बहुमतासाठी आवश्यक ३४चा आकडा गाठणे भाजपला तेवढे कठीण नसल्याचे यावरून दिसते, त्यामुळे काँग्रेस, भाजपला पाठिंबा देणारे राष्ट्रवादीच्या सदस्यांची भूमिका आता महत्त्वाची ठरेल़ अध्यक्ष निवडीनंतर काहीच दिवसात उपाध्यक्ष व समिती सभापतींची निवडही होणार आहे़महाशिवआघाडीचे समीकरण अंधारातशिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस या तिघांनी मिळून सत्ता स्थापन करण्याचे ठरविले तरी त्यांच्याकडे ३२ सदस्य होतात़ बहुमताचा आकडा त्यांना गाठता येत नाही़ निधीच्या मुद्दयावरून भाजपचा एक गट बाहेर पडल्यास हे शक्य होईल, नाराज सदस्य अध्यक्षनिवडीच्या वेळी गैरहजर राहिल्यास हे समिकरण शक्य आहे़ मात्र, हा गटही पदाच्या अपेक्षेत असेल, जर गैरहजर राहून महाशिवआघाडीला पाठिंबा या गटाने दिला तर त्यांना पद मिळण्याची शक्यता नाही, भाजपमध्येच राहुन किमान समिती सभापतीपद पदरात पाडून घेत हा गट फूटण्याची शक्यता कमी आहे़ शिवाय आरक्षण महिला राखीव असल्याने राजकीय खेळ्यांना ब्रेक बसेल़ यामुळे सध्याच्या समीकरणांवरून व्हीप न बजावताच अध्यक्ष निवड पार पडण्याचे संकेत अधिक असून महाशिवआघाडीचे समीकरण अंधारात असल्याचे चित्र आहे़ शिवाय निधीवरून नाराज सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे कुणी नाही, त्यामुळे ते सत्तेतून बाहेर पडण्याी शक्यता कमी आहे़जर महाशिवआघाडी झालीच तर काय?शिवसेनेच्या रेखा राजपूत, राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील, सरोजनी गरूड, डॉ़ निलम पाटील यांची नावे चर्चेत राहतील़ यात गेल्या निववडणुकीत राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील यांचा अध्यक्षपदाच्या शर्यतीत दहा मतांनी पराभव झाला होता़ काँग्रेसने भाजपला मतदान केले होते तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य गैरहजर राहिले होते़

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव