शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

पोलिसांचा वावर भाजपा पदाधिकाऱ्यांसारखा : राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:20 IST

सध्या पोलीस भाजपाचे कार्यकर्ते तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भाजपाच्या पदाधिका-यांसारखे वावरत आहे. भाजपा सरकार विरोधी पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. एक वर्ष थांबा आमचे सरकार येत आहे असा सज्जड दम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी मेळाव्यात आपल्या भाषणा दरम्यान प्रशासनाला दिला.

ठळक मुद्देखोटे गुन्हे दाखल करून अडविण्याचा प्रयत्नजळगाव जिल्ह्यात झाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावाभाजपा सरकार शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप

जळगाव : सरकार आमचे पण होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने कधी पैशांची मस्ती येऊ दिली नाही व शासकीय अधिका-यांचा गैरवापर देखील केला नाही. सध्या पोलीस भाजपाचे कार्यकर्ते तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भाजपाच्या पदाधिका-यांसारखे वावरत आहे. भाजपा सरकार विरोधी पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. एक वर्ष थांबा आमचे सरकार येत आहे असा सज्जड दम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी मेळाव्यात आपल्या भाषणा दरम्यान प्रशासनाला दिला.राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा ‘ वन बुथ १५ युथ’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी सकाळी ११.३० वाजता मेळावा झाला. व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँक संचालक अ‍ॅड.रवींद्र पाटील, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, संदीप पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्याची कदरआपल्या भाषणात संग्राम कोते-पाटील म्हणाले की, गेल्या निवडणुकीत पराभवामुळे पक्ष संघटनेचे मोठे काम आमच्या समोर होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटन वाढविले. त्यामुळे पक्षाने कदर केली. माझा तालुकाध्यक्ष होण्यासाठी संघर्ष सुरु असताना पक्षाने युवकचे प्रदेशाध्यक्षपद दिल्याचे सांगत राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्याची कदर होत असल्याचे सांगितले.विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नसध्याचे सरकार हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशाच खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांचे नेहमी धमकीचे फोनसंघटना चालवित असताना पोलिसांकडून नेहमी धमकीचे फोन येत असतात. मात्र आपण घाबरणाºयांमधले नाहीत. भाजपा सरकार कडे सत्ता आहे म्हणून रडीचा डाव खेळला जात आहे. भाजपाकडे सत्तेची मस्ती आहे. त्यातूनच शेतकरी, विद्यार्थी यांच्याबाबत असंवेदशनीलता निर्माण होते.मुख्यमंत्र्यांचे खोटे बोल पण रेटून बोलमुख्यमंत्री व पंतप्रधान हे सतत परदेश दौºयावर राहतात. मात्र त्यातून किती उद्योग आणले, किती लोकांना रोजगार मिळाला याची माहिती जनतेला द्यावी. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात रोज खून, दरोडे व गुन्हेगारी कारवाया होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस