शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

पोलिसांचा वावर भाजपा पदाधिकाऱ्यांसारखा : राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:20 IST

सध्या पोलीस भाजपाचे कार्यकर्ते तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भाजपाच्या पदाधिका-यांसारखे वावरत आहे. भाजपा सरकार विरोधी पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. एक वर्ष थांबा आमचे सरकार येत आहे असा सज्जड दम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी मेळाव्यात आपल्या भाषणा दरम्यान प्रशासनाला दिला.

ठळक मुद्देखोटे गुन्हे दाखल करून अडविण्याचा प्रयत्नजळगाव जिल्ह्यात झाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावाभाजपा सरकार शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप

जळगाव : सरकार आमचे पण होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने कधी पैशांची मस्ती येऊ दिली नाही व शासकीय अधिका-यांचा गैरवापर देखील केला नाही. सध्या पोलीस भाजपाचे कार्यकर्ते तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भाजपाच्या पदाधिका-यांसारखे वावरत आहे. भाजपा सरकार विरोधी पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. एक वर्ष थांबा आमचे सरकार येत आहे असा सज्जड दम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी मेळाव्यात आपल्या भाषणा दरम्यान प्रशासनाला दिला.राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा ‘ वन बुथ १५ युथ’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी सकाळी ११.३० वाजता मेळावा झाला. व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँक संचालक अ‍ॅड.रवींद्र पाटील, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, संदीप पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्याची कदरआपल्या भाषणात संग्राम कोते-पाटील म्हणाले की, गेल्या निवडणुकीत पराभवामुळे पक्ष संघटनेचे मोठे काम आमच्या समोर होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटन वाढविले. त्यामुळे पक्षाने कदर केली. माझा तालुकाध्यक्ष होण्यासाठी संघर्ष सुरु असताना पक्षाने युवकचे प्रदेशाध्यक्षपद दिल्याचे सांगत राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्याची कदर होत असल्याचे सांगितले.विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नसध्याचे सरकार हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशाच खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांचे नेहमी धमकीचे फोनसंघटना चालवित असताना पोलिसांकडून नेहमी धमकीचे फोन येत असतात. मात्र आपण घाबरणाºयांमधले नाहीत. भाजपा सरकार कडे सत्ता आहे म्हणून रडीचा डाव खेळला जात आहे. भाजपाकडे सत्तेची मस्ती आहे. त्यातूनच शेतकरी, विद्यार्थी यांच्याबाबत असंवेदशनीलता निर्माण होते.मुख्यमंत्र्यांचे खोटे बोल पण रेटून बोलमुख्यमंत्री व पंतप्रधान हे सतत परदेश दौºयावर राहतात. मात्र त्यातून किती उद्योग आणले, किती लोकांना रोजगार मिळाला याची माहिती जनतेला द्यावी. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात रोज खून, दरोडे व गुन्हेगारी कारवाया होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस