शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा वावर भाजपा पदाधिकाऱ्यांसारखा : राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:20 IST

सध्या पोलीस भाजपाचे कार्यकर्ते तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भाजपाच्या पदाधिका-यांसारखे वावरत आहे. भाजपा सरकार विरोधी पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. एक वर्ष थांबा आमचे सरकार येत आहे असा सज्जड दम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी मेळाव्यात आपल्या भाषणा दरम्यान प्रशासनाला दिला.

ठळक मुद्देखोटे गुन्हे दाखल करून अडविण्याचा प्रयत्नजळगाव जिल्ह्यात झाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावाभाजपा सरकार शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप

जळगाव : सरकार आमचे पण होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने कधी पैशांची मस्ती येऊ दिली नाही व शासकीय अधिका-यांचा गैरवापर देखील केला नाही. सध्या पोलीस भाजपाचे कार्यकर्ते तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भाजपाच्या पदाधिका-यांसारखे वावरत आहे. भाजपा सरकार विरोधी पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. एक वर्ष थांबा आमचे सरकार येत आहे असा सज्जड दम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी मेळाव्यात आपल्या भाषणा दरम्यान प्रशासनाला दिला.राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा ‘ वन बुथ १५ युथ’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी सकाळी ११.३० वाजता मेळावा झाला. व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँक संचालक अ‍ॅड.रवींद्र पाटील, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, संदीप पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्याची कदरआपल्या भाषणात संग्राम कोते-पाटील म्हणाले की, गेल्या निवडणुकीत पराभवामुळे पक्ष संघटनेचे मोठे काम आमच्या समोर होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटन वाढविले. त्यामुळे पक्षाने कदर केली. माझा तालुकाध्यक्ष होण्यासाठी संघर्ष सुरु असताना पक्षाने युवकचे प्रदेशाध्यक्षपद दिल्याचे सांगत राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्याची कदर होत असल्याचे सांगितले.विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नसध्याचे सरकार हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशाच खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांचे नेहमी धमकीचे फोनसंघटना चालवित असताना पोलिसांकडून नेहमी धमकीचे फोन येत असतात. मात्र आपण घाबरणाºयांमधले नाहीत. भाजपा सरकार कडे सत्ता आहे म्हणून रडीचा डाव खेळला जात आहे. भाजपाकडे सत्तेची मस्ती आहे. त्यातूनच शेतकरी, विद्यार्थी यांच्याबाबत असंवेदशनीलता निर्माण होते.मुख्यमंत्र्यांचे खोटे बोल पण रेटून बोलमुख्यमंत्री व पंतप्रधान हे सतत परदेश दौºयावर राहतात. मात्र त्यातून किती उद्योग आणले, किती लोकांना रोजगार मिळाला याची माहिती जनतेला द्यावी. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात रोज खून, दरोडे व गुन्हेगारी कारवाया होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस