शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अपघात रोखण्यासाठी सरसावले पोलीस दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST

सुनील पाटील जळगाव : महामार्गावरील वाढते अपघात चिंताजनक असून हे अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने स्वखर्चातून अपघातस्थळ व महामार्गावर ...

सुनील पाटील

जळगाव : महामार्गावरील वाढते अपघात चिंताजनक असून हे अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने स्वखर्चातून अपघातस्थळ व महामार्गावर कठड्यांची दुरुस्ती, सूचना फलक व रिप्लेक्टर बसविण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. कन्नड घाटापासून त्याची सुरुवात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली.

शहरातून जाणाऱ्या महामार्गावर गेल्या महिन्यात गुजराल पेट्राल पंपाजवळ बापलेक ठार झाल्याची घटना घडली होती. महामार्ग प्राधिकरण किंवा मनपाने काही उपाययोजना केलेल्या असत्या तर या बापलेकाचा जीव वाचला असता, या घटनेची पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गंभीर दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी न्हाईचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, कंत्राटदार व वाहतूक शाखा व महामार्ग पोलीस अधिकारी यांना सोबत घेऊन डॉ.मुंढे यांनी महामार्गावरील अपघातस्थळांना भेटी देऊन अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचे नियोजन केले होते. त्याच दिवशी सायंकाळी दोन्ही अपर पोलीस अधीक्षक, आठ विभागांचे पोलीस उपअधीक्षक व सर्व प्रभारी अधिकारी यांना अपघातस्थळांना भेटी देऊन जेथे गरज आहे तेथे दुभाजक तयार करणे, गतिरोधक, वळण रस्ता, धोकेदायक ठिकाण यासह वाहतूक नियमांचे तातडीने फलक लावण्याचे आदेश दिले होते. पोलीस दलाच्या निधीतून हा खर्च करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी सुरु झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात पाच जणांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर डॉ.मुंढे यांनी तेथे भेट दिली व कन्नड घाटातील ख‌ड्डे, रस्त्याच्याकडेचे संरक्षण कठडे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

सहा महिन्यात २४२ जण ठार

जानेवारी ते जून या सहा महिन्यात जिल्ह्यात रस्ता अपघातात ६४२ जण ठार झाले आहेत. सर्वाधिक अपघात मे व जून महिन्यात झालेले आहेत. गेल्या काही दिवसापासून पाळधी ते नशिराबाद या दरम्यान महामार्गावर अपघाताची संख्या वाढली. गुजराल पेट्रोल पंपाजवळ बापलेक ठार झाले तर त्याआधी दूरदर्शन टॉवरजवळ दीड महिन्यापूर्वी लग्न झालेला तरुण ठार झाला होता. आता दोन दिवसापूर्वीच साखरपुडा झालेला व सहा महिन्यापूर्वी लग्न झालेला असे दोन तरुण अपघातात ठार झाले. महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने पक्का रस्ता संपल्यानंतर कच्च्या रस्त्यावर हा अपघात झाला.

असे आहेत सहा महिन्यातील अपघात

महिना ठार

जानेवारी ३७

फेब्रुवारी ३५

मार्च ३५

एप्रिल ३१

मे ५१

जून ५३

कोट...

तातडीने जेथे आवश्यक आहे, तेथे पोलीस दलाच्या निधीतून हा खर्च केला जात आहे, उर्वरित ठिकाणी महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभागाने खर्च करावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. पोलीस दलाने कामाला सुरुवात केली आहे. लोकांचा जीव वाचवा हीच त्यामागची भावना आहे.

-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक