शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अपघात रोखण्यासाठी सरसावले पोलीस दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST

सुनील पाटील जळगाव : महामार्गावरील वाढते अपघात चिंताजनक असून हे अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने स्वखर्चातून अपघातस्थळ व महामार्गावर ...

सुनील पाटील

जळगाव : महामार्गावरील वाढते अपघात चिंताजनक असून हे अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने स्वखर्चातून अपघातस्थळ व महामार्गावर कठड्यांची दुरुस्ती, सूचना फलक व रिप्लेक्टर बसविण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. कन्नड घाटापासून त्याची सुरुवात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली.

शहरातून जाणाऱ्या महामार्गावर गेल्या महिन्यात गुजराल पेट्राल पंपाजवळ बापलेक ठार झाल्याची घटना घडली होती. महामार्ग प्राधिकरण किंवा मनपाने काही उपाययोजना केलेल्या असत्या तर या बापलेकाचा जीव वाचला असता, या घटनेची पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गंभीर दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी न्हाईचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, कंत्राटदार व वाहतूक शाखा व महामार्ग पोलीस अधिकारी यांना सोबत घेऊन डॉ.मुंढे यांनी महामार्गावरील अपघातस्थळांना भेटी देऊन अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचे नियोजन केले होते. त्याच दिवशी सायंकाळी दोन्ही अपर पोलीस अधीक्षक, आठ विभागांचे पोलीस उपअधीक्षक व सर्व प्रभारी अधिकारी यांना अपघातस्थळांना भेटी देऊन जेथे गरज आहे तेथे दुभाजक तयार करणे, गतिरोधक, वळण रस्ता, धोकेदायक ठिकाण यासह वाहतूक नियमांचे तातडीने फलक लावण्याचे आदेश दिले होते. पोलीस दलाच्या निधीतून हा खर्च करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी सुरु झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात पाच जणांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर डॉ.मुंढे यांनी तेथे भेट दिली व कन्नड घाटातील ख‌ड्डे, रस्त्याच्याकडेचे संरक्षण कठडे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

सहा महिन्यात २४२ जण ठार

जानेवारी ते जून या सहा महिन्यात जिल्ह्यात रस्ता अपघातात ६४२ जण ठार झाले आहेत. सर्वाधिक अपघात मे व जून महिन्यात झालेले आहेत. गेल्या काही दिवसापासून पाळधी ते नशिराबाद या दरम्यान महामार्गावर अपघाताची संख्या वाढली. गुजराल पेट्रोल पंपाजवळ बापलेक ठार झाले तर त्याआधी दूरदर्शन टॉवरजवळ दीड महिन्यापूर्वी लग्न झालेला तरुण ठार झाला होता. आता दोन दिवसापूर्वीच साखरपुडा झालेला व सहा महिन्यापूर्वी लग्न झालेला असे दोन तरुण अपघातात ठार झाले. महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने पक्का रस्ता संपल्यानंतर कच्च्या रस्त्यावर हा अपघात झाला.

असे आहेत सहा महिन्यातील अपघात

महिना ठार

जानेवारी ३७

फेब्रुवारी ३५

मार्च ३५

एप्रिल ३१

मे ५१

जून ५३

कोट...

तातडीने जेथे आवश्यक आहे, तेथे पोलीस दलाच्या निधीतून हा खर्च केला जात आहे, उर्वरित ठिकाणी महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभागाने खर्च करावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. पोलीस दलाने कामाला सुरुवात केली आहे. लोकांचा जीव वाचवा हीच त्यामागची भावना आहे.

-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक