शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना ‘नवचैतन्य कोर्स’ची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 11:40 IST

पोलीस दलात विशेष दबदबा असलेल्या ८० पोलिसांना पोलीस अधीक्षकांनी एक महिन्याच्या ‘नवचैतन्य कोर्स’ ला मुख्यालयात जमा केले आहे. पहाटे पाच ते सायंकाळी साडे सात असा नित्याचा हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या सर्व कर्मचाºयांनी दिवसातून तीन वेळा बायोमेट्रीक पध्दतीने हजेरी सुरु केल्याने या कर्मचा-यांची फार मोठी गोची झालेली आहे.

ठळक मुद्दे विश्लेषण९० टक्के कर्मचारी सुखावलेआता जनतेला वेळ द्यावा

सुनील पाटीलजळगाव : पोलीस दलात विशेष दबदबा असलेल्या ८० पोलिसांना पोलीस अधीक्षकांनी एक महिन्याच्या ‘नवचैतन्य कोर्स’ ला मुख्यालयात जमा केले आहे. पहाटे पाच ते सायंकाळी साडे सात असा नित्याचा हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या सर्व कर्मचा-यांनी दिवसातून तीन वेळा बायोमेट्रीक पध्दतीने हजेरी सुरु केल्याने या कर्मचा-यांची फार मोठी गोची झालेली आहे. प्रत्येक पोलिसांसाठी वर्षातून एक वेळा पंधरा दिवसाचा चैतन्य कोर्स तसा आवश्यकच आहे. मात्र या पोलिसांना त्याव्यतिरिक्त हा अतिरिक्त व त्यातही एक महिन्याचा कालावधी आहे. पंधरा दिवसाच्या कोर्सला असणारे बहुतांश पोलीस हजेरी मास्तरशी सेटींग करुन कोर्सला फक्त कागदोपत्री हजर रहायचे. यावेळी मात्र राखीव निरीक्षकांनाच तंबी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक पोलिसाला हजर रहावेच लागत आहे. प्रभारी अधिका-यांच्या मर्जीतले समजले जाणारे हे पोलीस पोलीस स्टेशनला कोणतेच काम करीत नव्हते. त्यांच्या कामाची जबाबदारी दुसºया कर्मचा-यावर ढकलली जायची.ही बाबही पोलीस अधीक्षकांनी हेरली आहे. एक महिन्याचा कोर्स झाल्यानंतर पुढे भविष्य काय असेल याचीच चिंता आता हे पोलीस करीत आहेत. पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ती होते कि उचलबांगडी होते हे कोणालाच माहित नाही, परंतु त्या विचारांचे भूत कर्मचा-यांना मनात कायम आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी विशेष दर्जा असलेल्या पोलिसांना तसेच काही अधिका-यांना वठणीवर आणल्याने पोलीस दलातील ९० टक्के कर्मचारी सुखावले आहेत. तर अवैध धंद्यांशी संबंधित कर्मचारी धास्तावले आहेत.अवैध धंदे बंद झाल्याने जिल्ह्यातील जनतेतही समाधान व्यक्त होत आहे. आता अपेक्षा इतकीच आहे की, पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यापर्यंत आलेल्या नागरिकांना वेळ व न्याय द्यावा ही अपेक्षा आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी