शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गुंडगिरी ठेचण्यात पोलीस अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 23:14 IST

पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अवैध धंद्याचा बिमोड करण्यासह ‘खाकी’ला शिस्त लावण्याचे केलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून शहरात विशिष्ट गटाकडून गुंडगिरी वाढत चालली आहे. जातीय तणावाच्या घटनांचा उदय होत आहे. जळगाव शहरातील आर.आर.विद्यालयाच्या दोन शिक्षकांवर एकाच महिन्याच दोन वेळा हल्ले झाले. हल्ला करणारे कोण?, त्यामागे कारण काय? हे स्पष्ट झालेले असतानाही पोलिसांकडून या गुंडगिरी करणा-या टवाळखोरांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

ठळक मुद्देविश्लेषणविशिष्ट गटाकडून गुंडगिरी वाढत चालली आहे काही ठिकाणी तर सीसीटीव्ही कॅमे-यात हे गुंड कैद झाले

सुनील पाटीलजळगाव : पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अवैध धंद्याचा बिमोड करण्यासह ‘खाकी’ला शिस्त लावण्याचे केलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून शहरात विशिष्ट गटाकडून गुंडगिरी वाढत चालली आहे. जातीय तणावाच्या घटनांचा उदय होत आहे. जळगाव शहरातील आर.आर.विद्यालयाच्या दोन शिक्षकांवर एकाच महिन्याच दोन वेळा हल्ले झाले. हल्ला करणारे कोण?, त्यामागे कारण काय? हे स्पष्ट झालेले असतानाही पोलिसांकडून या गुंडगिरी करणा-या टवाळखोरांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. एका विशिष्ट गटाकडून शहरात दादागिरी वाढली आहे. हल्ला केल्यानंतर या टवाळखोरांकडून त्यांच्या गृपचे नाव सांगितले जात आहे. काही ठिकाणी तर सीसीटीव्ही कॅमे-यात हे गुंड कैद झाले आहेत. आर.आर.विद्यालयाच्या दोन शिक्षकांवर हल्ला केल्यानंतर या टवाळखोरांनी बी.जे.मार्केट परिसरातील एका हॉटेलवर तरुणाला घेरुन मारहाण झाली होती. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने हे टवाळखोर पळून गेले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही, मात्र त्याआधी याच गृपच्या टवाळखोरांनी आर.आर.विद्यालयाच्या शिक्षकावर हल्ला केला होता. हा गृप शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्याला आहे. या गृपमधील टवाळखोर १८ ते २५ वयोगटातील आहेत. यांना वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात या टवाळखोरांकडून मोठी घटना घडली तर नवल वाटू नये. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी नुसते अवैध धंदे हेच टार्गेट न ठेवता गुंडगिरीचा नायनाट करण्यासह  जातीय तणावाच्या घटनांवरही लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. शहरात वाढणारी गुंडगिरी रोखणे हे अत्यंत महत्वाचे आहे, अन्यथा त्याचे परिणाम वेगळे भोगावे लागतील,हे काही घटनांवरुन सिध्द झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव