शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

लग्नातील जेवणातून ७० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 11:10 PM

कढोली ता. एरंडोल येथे एका लग्न समारंभातील जेवणावळीतून गावातील ६० ते ७० जणांना विषबाधा झाली आहे.

ठळक मुद्देकढोली येथील घटना : ५ जणांना जळगावला हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क 

जळगाव/ कढोली ता. एरंडोल : कढोली ता. एरंडोल येथे एका लग्न समारंभातील जेवणावळीतून गावातील ६० ते ७० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला आहे. यामध्ये पाच जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात तीन जण  गंभीर आहेत. सायंकाळच्या सुमारास उपकेंद्रात रुग्णाची रांग लागली होती. 

कढोली गावात १६ फेब्रुवारी रोजी  भास्कर झावरु बडगुजर यांच्या मुलाच्या झालेल्या लग्नात जेवण केल्याने काही नागरिकांना १७ रोजी सकाळपासूनच उलट्या, मळमळ, जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला होता. दिवसभर गावातील काही नागरिकांना हा त्रास जाणवला. सायंकाळी तर अनेक नागरिकांना हा त्रास अधिकच जाणवू लागल्याने नागरिकांनी गावातील खाजगी डॉक्टरांकडे धाव घेतली.

हा प्रकार गावातील काही नागरिकांनी जिल्हा परिषदेचे सदस्य नानाभाऊ महाजन यांना कळविला. त्यांनी  तात्काळ रिंगणराव प्राथमिक आरोग्य केंद्राला घटनेची माहिती देऊन, कढोली गाठले. काही वेळातच रिंगणगाव येथुन सहा डॉक्टर व दहा नर्सचे पथक येऊन त्यांनी नागरिकांवर उपचार केले. यात अति प्रकृती खालावलेल्या ५ जणांना रूग्णवाहिकेने जळगावला आणण्यात आले.

तर अन्नातूनच विषबाधा झाल्याचा संशय

यावेळी डॉक्टरांनी गावातील नागरिकांना झालेल्या त्रासाची कारणे विचारली असता, त्यांनी लग्नात जेवल्यामुळेच हा त्रास जाणवत असल्याचे सांगितले. गावातील अनेकांन पोटदुखीचा व जुलाबाचा त्रास जाणवत असल्याने बु‌धवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची तपासणी करण्यात येत असल्याचे नानाभाऊ महाजन यांनी सांगितले. विषबाधा झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल भंगाळे यांनी ही माहिती दिली. मंगलाबाई गोकुळ बडगुजर यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. 

२२ तासांनी त्रास सुरु

लग्नात जेवण झाल्यानंतर  २२ तासाने हातपाय दुखणे थंडीताप व डोकेदुखी चक्कर आल्याने खाजगी डॉक्टरांकडून उपचार केला, असे कृष्णा बडगुजर यांनी सांगितले. लग्नासाठी पिंप्री ता. धरणगाव येथील सोमनाथ बडगुजर या स्वयंपाकीला बोलावण्यात आले होते, अशी माहिती मिळाली.

टॅग्स :JalgaonजळगावErandolएरंडोलmarriageलग्नfood poisoningअन्नातून विषबाधा