शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

मोंढाळा येथील एका विहिरीत अज्ञातांनी टाकले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 19:35 IST

उत्तम काळेभुसावळ , जि.जळगाव : तालुक्यातील मोंढाळे येथील दीपक फुलचंद परदेशी यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात व काही समाजकंटकांनी रविवार, ७ रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान कीटकनाशक (तणनाशक) विषारी औषध टाकल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, ...

ठळक मुद्देशेतकºयाने शेतमालावर पाणी सोडून गुरांसाठी उपलब्ध केली होती विहीरभीषण पाणीटंचाईच्या संकटात प्रकार घडल्याने संतापसमाजकंटकांवर कारवाईची मागणी

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील मोंढाळे येथील दीपक फुलचंद परदेशी यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात व काही समाजकंटकांनी रविवार, ७ रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान कीटकनाशक (तणनाशक) विषारी औषध टाकल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.यावर्षी भुसावळ तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. मोंढाळे येथे तर तालुक्यातून सर्वात जास्त भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त छापले आहे.अशा परिस्थितीत मोंढाळे येथील दीपक फुलचंद परदेशी यांनी शेतीच्या उत्पन्नावर पाणी सोडून त्यांचे मोंढाळा व शिंदी या रस्त्यावरील शेतातील विहीर गुरांना पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. याच विहिरीजवळ दीपक परदेशी यांनी गेल्या १० ते १२ वर्षांपासून गुरांना पाणी पिण्यासाठी स्वखर्चाने हौद बांधून दिला आहे.या हौदाचा वापर मोंढाळेसह शिंदी येथील गुरांना उपयोग होत आहे. दररोज सुमारे ३०० ते ४०० गुरे या हौदावर पाणी पीत असल्याची माहिती दीपक परदेशी यांनी दिली. या रस्त्यावरून येणारे व जाणारे प्रवासी तसेच परिसरातील शेतकरी यांना उपयोग होत आहे.अशा परिस्थितीत काही अज्ञात समाजकंटक व्यक्तीने रविवार, ७ रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास विहिरीत विष टाकण्याचा प्रयोग केल्यामुळे शिंदी, मोंढाळा व परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.परदेशी हे सायंकाळी सहा वाजेनंतर शेतात गेले. शेतातील विहिरीतील पाणी हे पांढऱ्या रंगाचे दिसायला लागले व तेथे वासही येऊ लागला. त्यामुळे त्यांना विहिरीत कीटकनाशक टाकल्याचा संशय आला.दरम्यान, परदेशी यांनी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क केला. मात्र पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या बंदोबस्तासाठी अडकले आहे. त्यामुळे उद्या मंगळवार, ९ रोजी पंचनामा करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी त्यांना दिली आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ