शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

आदीवासी भागात रस्त्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 6:00 PM

प्रचंड गैरसोय

सावखेडा :   रावेर तालुक्यातील सातपुडा जंगलात असलेले आदिवासी गावे तिड्या अंधारमळी,मोहमांडली , निमड्या, गारखेडा हे रस्ते अतिशय खराब झाले असुन नागरिकांना दवाखाना व  शासकीय कामी  मोठे हाल सहन करीत या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे.  तिड्या, मोहमांली, अंधारमळी, निमड्या, गारखेडा रस्त्याची दयनीय अवस्था संबधित अधिकारी, पदाधिकारी यांना माहिती असल्यावरही जाणीवपुर्वक डोळेझाक करीत असल्याचे  ग्रामस्थांकडुन बोलले जात आहे.या रस्त्यांची गेल्या तीन वर्षापासुन अतिशय दुरावस्था झाली असून हे रस्ते अपघातांना कारणीभुत ठरत आहेत. या रस्त्यांनी  प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. वाहनधारक, प्रवासी त्रस्त झाले असून  गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी दवाखान्यात जाताना या रस्त्यामुळे तर खूपच त्रास होतो. काही वेळा तर  रस्त्यातच बाळंतपण होते.  अशा वेळी रस्त्यात  नवजात शिशुला जन्म देतांना बाळ किंवा मातेला आपल जीव गमवावा लागला आहे.  यास जबाबदार कोण ? असा सवाल आदिवासी जनतेने उपस्थित केला आहे.  सातपुडा भाग हा जंगलमय परिसर असून येथे नेहमी काही ना काही घटना घडतच असतात. जंगलातील प्राण्यांपासुन देखील या परिसरातील जनतेला जीवाला धोका असतो. एकूणच खडतर जीवन जगत असताना आवश्यक कामासाठी जाताना रस्ताही धड नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही समस्या मांडली असता संबंधित विभागाच्या अधिकारी, पदाधिकारी यांचेकडुन उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.  अमाचा आदिवासी भाग असल्यामुळे दुर्लक्ष केले जात आहे, असे या भागातील ग्रामस्थांनी सांगितले.  या समस्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन  संबधित गावांच्या रस्त्यांची व पुलांची तत्काळ  दुरुस्ती करावी अशी रास्त  मागणी, तिड्या, अंधारमळी, मोहमांडी,निमड्या,गारखेडा गावाच्या नागरिकांनी  केली आहे.