शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

दोन किंवा तीन वेचणीच्या इराद्यानेच कपाशी लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST

जितेंद्र पाटील लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या सरासरी उत्पादनात अलीकडील काही वर्षात झालेली घट लक्षात ...

जितेंद्र पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या सरासरी उत्पादनात अलीकडील काही वर्षात झालेली घट लक्षात घेता शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीच्या दोन किंवा तीन वेचण्या झाल्यानंतर कपाशीचे पीक लगेच उपटून फेकण्याच्या इराद्यानेच जवळपास सर्व शेतकऱ्यांनी यंदा कपाशी लागवडीसाठी पाऊल उचलले आहे.

गेल्या काही वर्षात सततच्या प्रतिकूल हवामानामुळे कापसाचे उत्पादन घटलेले असतांना, खुल्या बाजारातही अपेक्षित भाव न मिळाल्याने कोरडवाहू व बागायती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे संकटात आणखी वाढ झाल्यानंतर कापसाची शेती तर अक्षरशः आतबट्ट्याची ठरली आहे. अशा या परिस्थितीत यंदा कपाशी लागवडीसाठी सरसावलेल्या शेतकऱ्यांनी थोडी सावध भूमिका घेतली असून, सुरुवातीच्या दोन-तीन वेचण्या झाल्यानंतर शेतातील कापसाचे पीक उपटून त्या जागी रब्बी हंगामात गहू, हरभरा किंवा मका पीक घेण्याचे नियोजन विशेषतः पूर्वहंगामी कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आतापासून करून ठेवले आहे. सुरुवातीच्या वेचण्या झाल्यानंतर नेमका बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कापसाचे पीक जोपासणे खूपच जिकिरीचे ठरते. कीड लागलेल्या कापसाचा दर्जा खराब झाल्याने बाजारात त्यास फार किंमत मिळत नाही. शिवाय कीड लागलेले बोंड वेचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मजुरीचा खर्चही आवाक्याबाहेर जातो. अतोनात मेहनत घेऊनही हाती काही पडत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला येतो. या सर्व गोष्टींचा विचार करता काही शेतकरी फरदड कापसाचे उत्पादन घेण्याऐवजी हिवाळ्यात त्या क्षेत्रात रब्बी पिके घेऊन दोन हंगाम घेण्यात यशस्वी ठरल्याचीही उदाहरणे आहेत.

-----------------

हाच पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या खरिपात बहुतेक सर्व शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीच्या जुन्या पद्धतीला मूठमाती देऊन बोंडअळीच्या प्रादुर्भावावर मात करण्याची नवी व्यूहरचना आतापासून आखल्याचे निदर्शनास आले आहे. कापसाच्या एकूण उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात चांगली सुधारणा होण्याचे संकेत त्यामुळे प्राप्त झाले आहेत.

-----------------

फोटो-

बोंडअळीच्या प्रादुर्भावावर मात करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात कपाशी लागवडीत सावध भूमिका घेतली आहे. (जितेंद्र पाटील)