शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

प्लॅस्टिकबंदीसाठी हवी इच्छाशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 12:14 IST

आज प्रत्येक जीवनावश्यक वस्तू म्हणजे दूध, तेल, औषधी किराणामालाच्या वस्तू, सलाईनच्या बाटल्या, वाहनांचे स्पेअर पार्ट, स्टेशनवरील चहा, बिस्कीटाचे पुडे ...

आज प्रत्येक जीवनावश्यक वस्तू म्हणजे दूध, तेल, औषधी किराणामालाच्या वस्तू, सलाईनच्या बाटल्या, वाहनांचे स्पेअर पार्ट, स्टेशनवरील चहा, बिस्कीटाचे पुडे या आणि अशा शेकडो वस्तू कशात बांधल्या आहेत? उत्तर आहे, प्लॅस्टिकमध्ये. प्लॅस्टिकची निर्मितीच जर टनावारी होते तर हे प्लॅस्टिक जाईल कुठे ? दुसरी बाब, अगदी आदर्श परिस्थितीत समजा, जनतेने कचरा कचरापेटीतच टाकला तरी याचे पुढे काय करायचे? हा जाळता वा पुरता येणार नाही. पुनर्प्रक्रिया सध्यातरी होत नाही. उद्या झाली तरी ती प्रदूषणरहित असेलच असे सांगता येत नाही. या परिस्थितीत या प्रदूषणासाठी जवाबदार कोण? प्लॅस्टिक निर्माते का या बद्दल उदासीन सरकार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्लॅस्टिकबंदीसाठी सर्वांचा पुढाकार व इच्छाशक्तीची खरी गरज आहे. पूर्वी तेल, तूप, दूध यासाठी बरण्या नेत होतो, आता तेच करावे लागणार असून किराणा माल बेताचा असेल तर कागदी पिशवचीत, जास्त असेल तर कापडी पिशवीत नेणे याच सवयी जडवून घ्याव्या लागतील. या बंदीमुळे सर्वात मोठा प्रश्न प्लॅस्टिक निर्मात्यांचा येईल, ज्याच्यावर लाखो लोकांचे पोट भरते. यावर उपाय म्हणजे त्यांच्यासाठी पर्यायी व्यवसाय सुरू करणे. अर्थात हे स्थित्यंतर अतिशय कठीण आहे. परंतू प्लॅस्टिकचे भयानक दुष्परिणाम म्हणजे कॅन्सर व अनेक आजारांचे वाढते प्रमाण, प्लॅस्टिककचरा अडकल्याने मिठी नदीला आलेला पूर, जमिनीची घटती गुणवत्ता या गोष्टी जनतेला पटवून दिल्या तर जनता स्वत:हून प्लॅस्टिकला नाकारेल.- सुजाता देशपांडे, अध्यक्ष, भारती पर्यावरण प्रतिष्ठान

टॅग्स :Jalgaonजळगाव