शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

लांडोरखोरी वनोद्यानासाठी मेहरूणमधून पाईपलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 13:17 IST

उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांची माहिती

ठळक मुद्दे कुंभारखोरीचा विकास करणार वनजमिनींचा विषय गंभीरबछड्याचा मृत्यूनंतर विमानतळावरील काम बंद

जळगाव : लांडोरखोरीत पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्हानियोजनसमितीतून निधी मंजूर झाला असून मेहरूण तलावातून पाईपलाईन टाकून पाणी घेतले जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी ‘लोकमत’ भेटीप्रसंगी दिली.ते म्हणाले की, शहरातील मोहाडी व शिरसोली रस्त्याच्या मध्ये असलेल्या लांडोरखोरी वनउद्यानाच्या विकासानंतर त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. आतापर्यंत सुमारे हजार च्या आसपास लोकांनी या उद्यानाचे पास घेतले आहेत. मात्र या ठिकाणी पाण्याची टाकी असूनही पाणीटंचाई आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मेहरूण तलावातून पाईपलाईन टाकून पाणी आणले जाणार आहे. त्यासाठी डीपीडीसीतून निधी देखील मंजूर झाला असल्याचे सांगितले. उंचावर असलेल्या टाकीमुळे दाबाने पाणीपुरवठा सर्व भागात होईल.बछड्याचा मृत्यूनंतर विमानतळावरील काम बंदजळगाव विमानतळावरील सपाटीकरणाचे काम करताना बिबट्याच्या दोन बछड्यापैकी एका बछड्याचा जेसीबीच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी संबंधीत जेसीबी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जेसीबी जप्त करण्यात आला आहे. तसेच विमानतळावरील काम बंद करण्यात आले आहे. वनविभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय हे काम सुरू न करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पगार यांनी दिली. एका बछड्याचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या बछड्याला विमानतळावरील त्याच ठिकाणी ठेवून ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला होता. त्यात मादी बिबट्याने त्या पिलाला उचलून १००-२०० मीटर अंतरावर सोडून दिले होते. त्यानंतरही आठवड्याभरापूर्वी ही मादी बिबट्या या परिसरात आल्याचे ट्रॅप कॅमेºयात दिसून आले असल्याची माहिती पगार यांनी दिली.वृक्षलागवडीबाबत ४ रोजी सचिवांची बैठक५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अतंर्गत जिल्ह्याला ४२ लाख ४७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १२ लाख ५६ हजार, जळगाव वन विभागास ६ लाख, यावल वन विभागास १३ लाख ७३ हजार, सामाजिक वनीकरण विभागास ६ लाख तर इतर विभागांना ३ लाख १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात ४६ लाखापेक्षा अधिक रोपे तयार आहेत. तसेच ४ रोजी नाशिक येथे सचिवांनी आयुक्तांची बैठक बोलावली असून त्यात जिल्हाधिकारी या वृक्षलागवडीबाबत सादरीकरण करतील, अशी माहिती पगार यांनी दिली.वनजमिनींचा विषय गंभीरशासनाने वनक्षेत्र वाढवून ३३ टक्के करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे जंगलातील मूळ अधिवास असलेल्या नागरिकांवरही अन्याय होऊ नये यासाठी वनजमिनी हक्क कायदा आणला. मात्र त्या कायद्याचा गैरफायदा घेण्यासाठी वनजमिनीवर अतिक्रमण करून दावे करण्याचे प्रमाण वाढले आहे. ती चिंतेची बाब आहे.मात्र असे दावे अपात्र करण्यात आले आहेत.सर्पमित्रांना दिले ओळखपत्रसर्पमित्रांबाबत राज्यात काही ठिकाणी विषाची विक्री करत असल्याच्या तक्रारी आल्याने ओळखपत्र देण्याचा निर्णय शासनने घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सर्पमित्रांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मात्र त्यांनी साप पकडल्यानंतर स्वत:कडे २४ तासांपेक्षा जास्तवेळ ठेवता येणार नाही. त्याला सुरक्षीत ठिकाणी जंगलात सोडून द्यावे लागेल.नुकसानीचे सर्व दावे निकालीवन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना अथवा पाळीव प्राण्यांची हत्या झाल्यास त्याचे नुकसान भरपाईचे दावे वनविभागाकडून तातडीने निकाली काढले जातात. दरवर्षी सुमारे सव्वा दोन ते अडीच कोटी रूपये नुकसान भरपाईवर खर्च होतात. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या वृद्धाच्या वारसांना १ लाख रूपये तातडीने देण्यात आले. तर ७ लाख रूपये वारसाच्या नावाने बँकेत फिक्स डिपॉझीट ठेवण्यात आले आहेत. ३१ मार्च अखेर १०० टक्के नुकसान भरपाईचे दावे निकाली काढले असल्याची माहिती पगार यांनी दिली.वनविभागाला यशलांडोरखोरी वनक्षेत्राचा विकास करण्यात वनविभागाला यश आले आहे. शहराच्या जवळच एवढे मोठे वनक्षेत्र संरक्षित आहे. त्याच प्रमाणे कुंभारखोरी वनक्षेत्राचाही विकास करण्याचा प्रयत्न असल्याचे दिगंबर पगार यांनी यावेळी सांगितले.ट्रॅप कॅमेरे पुरेसेउपवनसंरक्षक पगार म्हणाले की, जळगाव वनविभागाकडे पूर्वीचे १७ ट्रॅप कॅमेरे होते. आता नव्याने २२ ट्रॅप कॅमेरे घेण्यात आले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे होते.