शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

‘रमजान’ पर्वात ‘अक्षय्य’ आनंदाचे तीर्थ! ‘मानव सेवे’ने पुसली धर्म नि जातीची सीमारेषा...माणुसकीचीही भिंत अभेद्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 20:03 IST

सध्या इथे रमजानच्या पवित्र पर्वात अक्षय्य आनंदाच्या तीर्थाची प्रचिती येत आहे. जात-धर्माचे व्रण पुसले गेले म्हणून...

कुंदन पाटील, जळगाव : वाढलेले-विस्कटलेले-मळकटलेले-एकमेकांत गुरफटलेले केस धुतले गेले. मोकळे झाले. अंगावरील मळाचा थर निघून गेला आणि नंतर मनातील जाळेही हळूहळू उलगडू लागले. वाट हरविलेल्या मनोरुग्णांना जितक्या मायेने आंघोळ घातली गेली, तितक्याच मायेने घास भरविले गेले. वेले या लहानशा गावात माणुसकीची, ममत्वाची बहरलेली ही वेल... सध्या इथे रमजानच्या पवित्र पर्वात अक्षय्य आनंदाच्या तीर्थाची प्रचिती येत आहे. जात-धर्माचे व्रण पुसले गेले म्हणून...

वेले (चोपडा) गावातील मानव सेवा तिर्थ संस्थेचा हा सेवाभावच. खरे म्हणजे हे माणुसकीचे देऊळच, पण इथे कुठलीही मूर्ती नाही... अखंड सेवेच्या प्रवासात सहाशेवर भटक्या मनोरुग्णांना या संस्थेने हक्काचे घर आणि स्थैर्य दिले आहे. नरेंद्र रावण पाटील या हे या संस्थेचे संचालक. नरेंद्र हे स्वामी विवेकानंदांचेही नाव होते. सेवा-सत्कर्म हाच महान धर्म, हे सांगणाऱ्या विवेकानंदाचे अनुसरण करत भरकटलेल्या आयुष्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी या नरेंद्राने स्वत:ला एखाद्या यज्ञातील समिधेप्रमाणे समर्पित केले आहे. भटक्या, मनोरुग्णांच्या जखमा स्वत: धुताना त्यांना कधीही किळस येत नाही. त्यांच्या ममत्वाने भटके मनोरुग्ण स्थिरावतात. पंगतीतही शिस्तीत बसतात. जेवणात अर्थातच निस्वार्थ मानवताभावाचा स्वाद असतो...घासापरत तृप्तीची अनुभूतीही येते आणि मनोरुग्णांच्या मनातील जाळेही उलगडू लागते. भान येऊ लागते.

प्रार्थना सर्वमांगल्याची...इथल्या दैनंदिनीत कर्मकांड नाही, पूजा, प्रार्थनाही नाही, केवळ मानवता आहे. मनोरुग्णांना सुरुवातीला स्वत:चे नाव, गाव, जात, धर्म काही सांगता येत नाही. कोण हिंदू असेल, कोण मुस्लिम काही माहिती नसते. म्हणूनच पाटील यांनी देव दूर ठेवून जणू स्वत:च देवपण स्वीकारलेले आहे.

अनेक मनोरुग्णांना आता स्वत्वाबद्दल भान आलेले आहे. पाटील ज्या दीडशे जणांची सेवा करत आहेत, अशा या सर्व भरकटलेल्यांत सध्या १३ जण मुस्लिम आहेत. त्यांना आयुष्यभरच‘रमजान’पर्व पावले आहे. तर उपचारानंतर ते मानसिकदृष्ट्या सावरलेले साडेचारशेवर लोक आपापल्या घरी सुखरुपपणे पोहोच केले आहेत. या संस्थेने भाड्याने घेतलेल्या जागेत सध्या १५४ जण वास्तव्याला आहेत. मानसोपचार तज्ज्ञ डॉ.दिलीप महाजन उपचारासाठी स्वत: पुढे येतात. शासकीय मानसोपचार समितीकडून औषधं मिळतात. म्हणून इथं प्रत्येक जण मानसिक आजाराला हरवत जातात...

या आनंद विश्वाच्या सेवेतच दिवस घालवतो.अनेक जण मदत करतात. म्हणून प्रत्येकाच्या वेदना, दु:ख पुसता येतं.-नरेंद्र रावण पाटील, सेवेकरी.

टॅग्स :Jalgaonजळगाव