शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:31 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘आरसा मनाचा’ या सदरात लिहिताहेत विलास भाऊलाल पाटील..

जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. तसं भारताला उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या लोकांचा देश म्हणावं असं मला वाटतं. या देशात प्रेम, आपुलकी सद्भावआणि नाती जपणारी माणसं मानवतेचं महन्मंगल स्तोम गाणारी माणसं, त्यासाठी आयुष्य पणाला लावणारी माणसं मूळातच कमी, पण त्यांन ापूजणारी, त्यांना नमस्कार करणारी माणसं मात्र खूपच कमी. याऊलट पद, पैसा, प्रतिष्ठा (खोटी का असेना) यानं मोठी असणारी माणसं आज समाजात नमस्कार पात्र झालेली आहेत. आजकाल ‘पदं’ कशी मिळवली जातात, पैसा कसा कमावला जातो या विषयी बोलण्याची, लिहिण्याची काहीच आवश्यकता नाही असं मला वाटतं. आपणा सर्वांना ते चांगलच माहित आहे. पूर्वी एखाद्या महनीय व्यक्तीमुळे एखाद्या पदाची प्रतिष्ठा वाढत असे मात्र आजकाल एखाद्या पदामुळे गुंडपुंडसुध्दा महनीय झालेले दिसत आहेत. अर्थात याला काही सन्मान्य अपवाद नक्कीच आहेत नाही असे नव्हे पण अगदीच नगण्या बोटावर मोजण्याइतके. बहुतांश मात्र पद आणि पैशानेच महनीय झालेले दिसत आहेत. स्पष्टीकरणासाठी एक छोटी गोष्ट सांगतो, ‘एकदा एका गावात एका महापुरुषाची जयंती होती. मिरवणूक काढावयाचे ठरले. पालखी सजवण्यात आली. ऐनवेळी पालखी ठेवण्यासाठी एक गाढवच तेवढे उपलब्ध झाले. मिरवणूक निघाली. लोक पालखीला हात घालत होते. नमस्कार करत होते. गाढवाला वाटल वाह ! लोक मला हार घालत आहेत. नमस्कार करत आहेत. गाढव चेकाळलं, त्याला वाटलं मी हे पालखीचं ओझं तरी का वहावं म्हणून पालखी फेकून दिली. पालखी फेकल्याबरोबर लोक चिडले. गाढवाला पाठीवर रट्टे हाणले. गाढव पळत सुटलं.’ गोष्टीप्रमाणे आज समाजातील अनेक गाढवं पदाच्या पालखीमुळे स्वत:ला मोठे समजायला लागले अ ाहेत आणि समाजातील दुसरी गाढवं सुध्दा त्यांना मोठी समजायला लागलेली आहेत आणि नमस्कार करायला लागली आहेत. वास्तविक उगवता सूर्य सुध्दा संध्याकाळी अस्ताला जातो. (चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा) आणि त्यावेळी कधी चंद्र, तारे, तारका आणि प्रसंगी मेणबत्ती किंवा काजवा देखील आपल्याला सक्षमपणे प्रकाश देतो हे आपण विसरतो आणि त्यांची हेळसांड करतो. त्याचप्रमाणे अस्ताला जाणारा सूर्य देखील दुसºया दिवशी नव्या उमेदीने उदयाला येतो हे त्रिकालाबाधीत सत्य आहे पण घुबडाच्या जातीच्या काही माणसांना खरा प्रकाश माहित नसतोच आणि काही फक्त पावलापुरता प्रकाश शोधत असतात. एक पाऊल ठेवण्यापुरती जागा आणि तेवढाच फक्त प्रकाश इतकी आत्मकेंद्री माणसं असतात आणि ती सत्ता-संपत्तीच्या प्रकाशात दीपून जातातआणि खºया योगत्येच्या माणसांना सोडून नकलींच्या मागे धावतात. त्यांनाच नमस्कार करण्यात स्वत:ला धन्य समजतात. पण त्या घुबडांना हे माहीत नसते की हा प्रकाश लुप्त झाल्यावर माझ्यासमोर अंधार पसरणार आहे आणि दुसरं पाऊल टाकण्याइतक दिसावं एवढा प्रकाश आणि तेवढी जागाही शिल्लक राहणार नाही अ ाणि प्रसंगी त्याचा कडेलोटही होऊ शकतो म्हणून मी अशा माणसांना निव्वळ आत्मकेंद्रीच नव्हे तर आत्मघातकी सुध्दा म्हणेल. कारण योग्य माणसाला नमस्कार न करून तुम्ही स्वत:चेच नुकसान करीत असतात. याऊलट खºया योग्यतेच्या माणसाला कुणाच्या नमस्काराची देखील गरज नसते. तो तर त्याचे काम क रीतच असतो. एखाद्या ‘दीपस्तंभा’प्रमाणे. दीपस्तंभ प्रकाश देतो, ज्याला तो प्रकाश देतो त्याच्याबद्दल त्याला काही देणघेण नसतं किंवा त्याला सातत्यानं विझवू पाहणाºया वाºयाचाही त्याला काही सोयरसुतक नसतं. तसच समाजात कोण आपल्याला दुर्लक्षित करत, हेटाळत किंवा त्रास देतं याच्याशी चांगल्या माणसाला काहीच देणं घेणं नसतं हेच खरं !-विलास भाऊलाल पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव