शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:31 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘आरसा मनाचा’ या सदरात लिहिताहेत विलास भाऊलाल पाटील..

जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. तसं भारताला उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या लोकांचा देश म्हणावं असं मला वाटतं. या देशात प्रेम, आपुलकी सद्भावआणि नाती जपणारी माणसं मानवतेचं महन्मंगल स्तोम गाणारी माणसं, त्यासाठी आयुष्य पणाला लावणारी माणसं मूळातच कमी, पण त्यांन ापूजणारी, त्यांना नमस्कार करणारी माणसं मात्र खूपच कमी. याऊलट पद, पैसा, प्रतिष्ठा (खोटी का असेना) यानं मोठी असणारी माणसं आज समाजात नमस्कार पात्र झालेली आहेत. आजकाल ‘पदं’ कशी मिळवली जातात, पैसा कसा कमावला जातो या विषयी बोलण्याची, लिहिण्याची काहीच आवश्यकता नाही असं मला वाटतं. आपणा सर्वांना ते चांगलच माहित आहे. पूर्वी एखाद्या महनीय व्यक्तीमुळे एखाद्या पदाची प्रतिष्ठा वाढत असे मात्र आजकाल एखाद्या पदामुळे गुंडपुंडसुध्दा महनीय झालेले दिसत आहेत. अर्थात याला काही सन्मान्य अपवाद नक्कीच आहेत नाही असे नव्हे पण अगदीच नगण्या बोटावर मोजण्याइतके. बहुतांश मात्र पद आणि पैशानेच महनीय झालेले दिसत आहेत. स्पष्टीकरणासाठी एक छोटी गोष्ट सांगतो, ‘एकदा एका गावात एका महापुरुषाची जयंती होती. मिरवणूक काढावयाचे ठरले. पालखी सजवण्यात आली. ऐनवेळी पालखी ठेवण्यासाठी एक गाढवच तेवढे उपलब्ध झाले. मिरवणूक निघाली. लोक पालखीला हात घालत होते. नमस्कार करत होते. गाढवाला वाटल वाह ! लोक मला हार घालत आहेत. नमस्कार करत आहेत. गाढव चेकाळलं, त्याला वाटलं मी हे पालखीचं ओझं तरी का वहावं म्हणून पालखी फेकून दिली. पालखी फेकल्याबरोबर लोक चिडले. गाढवाला पाठीवर रट्टे हाणले. गाढव पळत सुटलं.’ गोष्टीप्रमाणे आज समाजातील अनेक गाढवं पदाच्या पालखीमुळे स्वत:ला मोठे समजायला लागले अ ाहेत आणि समाजातील दुसरी गाढवं सुध्दा त्यांना मोठी समजायला लागलेली आहेत आणि नमस्कार करायला लागली आहेत. वास्तविक उगवता सूर्य सुध्दा संध्याकाळी अस्ताला जातो. (चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा) आणि त्यावेळी कधी चंद्र, तारे, तारका आणि प्रसंगी मेणबत्ती किंवा काजवा देखील आपल्याला सक्षमपणे प्रकाश देतो हे आपण विसरतो आणि त्यांची हेळसांड करतो. त्याचप्रमाणे अस्ताला जाणारा सूर्य देखील दुसºया दिवशी नव्या उमेदीने उदयाला येतो हे त्रिकालाबाधीत सत्य आहे पण घुबडाच्या जातीच्या काही माणसांना खरा प्रकाश माहित नसतोच आणि काही फक्त पावलापुरता प्रकाश शोधत असतात. एक पाऊल ठेवण्यापुरती जागा आणि तेवढाच फक्त प्रकाश इतकी आत्मकेंद्री माणसं असतात आणि ती सत्ता-संपत्तीच्या प्रकाशात दीपून जातातआणि खºया योगत्येच्या माणसांना सोडून नकलींच्या मागे धावतात. त्यांनाच नमस्कार करण्यात स्वत:ला धन्य समजतात. पण त्या घुबडांना हे माहीत नसते की हा प्रकाश लुप्त झाल्यावर माझ्यासमोर अंधार पसरणार आहे आणि दुसरं पाऊल टाकण्याइतक दिसावं एवढा प्रकाश आणि तेवढी जागाही शिल्लक राहणार नाही अ ाणि प्रसंगी त्याचा कडेलोटही होऊ शकतो म्हणून मी अशा माणसांना निव्वळ आत्मकेंद्रीच नव्हे तर आत्मघातकी सुध्दा म्हणेल. कारण योग्य माणसाला नमस्कार न करून तुम्ही स्वत:चेच नुकसान करीत असतात. याऊलट खºया योग्यतेच्या माणसाला कुणाच्या नमस्काराची देखील गरज नसते. तो तर त्याचे काम क रीतच असतो. एखाद्या ‘दीपस्तंभा’प्रमाणे. दीपस्तंभ प्रकाश देतो, ज्याला तो प्रकाश देतो त्याच्याबद्दल त्याला काही देणघेण नसतं किंवा त्याला सातत्यानं विझवू पाहणाºया वाºयाचाही त्याला काही सोयरसुतक नसतं. तसच समाजात कोण आपल्याला दुर्लक्षित करत, हेटाळत किंवा त्रास देतं याच्याशी चांगल्या माणसाला काहीच देणं घेणं नसतं हेच खरं !-विलास भाऊलाल पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव