शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:31 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘आरसा मनाचा’ या सदरात लिहिताहेत विलास भाऊलाल पाटील..

जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. तसं भारताला उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या लोकांचा देश म्हणावं असं मला वाटतं. या देशात प्रेम, आपुलकी सद्भावआणि नाती जपणारी माणसं मानवतेचं महन्मंगल स्तोम गाणारी माणसं, त्यासाठी आयुष्य पणाला लावणारी माणसं मूळातच कमी, पण त्यांन ापूजणारी, त्यांना नमस्कार करणारी माणसं मात्र खूपच कमी. याऊलट पद, पैसा, प्रतिष्ठा (खोटी का असेना) यानं मोठी असणारी माणसं आज समाजात नमस्कार पात्र झालेली आहेत. आजकाल ‘पदं’ कशी मिळवली जातात, पैसा कसा कमावला जातो या विषयी बोलण्याची, लिहिण्याची काहीच आवश्यकता नाही असं मला वाटतं. आपणा सर्वांना ते चांगलच माहित आहे. पूर्वी एखाद्या महनीय व्यक्तीमुळे एखाद्या पदाची प्रतिष्ठा वाढत असे मात्र आजकाल एखाद्या पदामुळे गुंडपुंडसुध्दा महनीय झालेले दिसत आहेत. अर्थात याला काही सन्मान्य अपवाद नक्कीच आहेत नाही असे नव्हे पण अगदीच नगण्या बोटावर मोजण्याइतके. बहुतांश मात्र पद आणि पैशानेच महनीय झालेले दिसत आहेत. स्पष्टीकरणासाठी एक छोटी गोष्ट सांगतो, ‘एकदा एका गावात एका महापुरुषाची जयंती होती. मिरवणूक काढावयाचे ठरले. पालखी सजवण्यात आली. ऐनवेळी पालखी ठेवण्यासाठी एक गाढवच तेवढे उपलब्ध झाले. मिरवणूक निघाली. लोक पालखीला हात घालत होते. नमस्कार करत होते. गाढवाला वाटल वाह ! लोक मला हार घालत आहेत. नमस्कार करत आहेत. गाढव चेकाळलं, त्याला वाटलं मी हे पालखीचं ओझं तरी का वहावं म्हणून पालखी फेकून दिली. पालखी फेकल्याबरोबर लोक चिडले. गाढवाला पाठीवर रट्टे हाणले. गाढव पळत सुटलं.’ गोष्टीप्रमाणे आज समाजातील अनेक गाढवं पदाच्या पालखीमुळे स्वत:ला मोठे समजायला लागले अ ाहेत आणि समाजातील दुसरी गाढवं सुध्दा त्यांना मोठी समजायला लागलेली आहेत आणि नमस्कार करायला लागली आहेत. वास्तविक उगवता सूर्य सुध्दा संध्याकाळी अस्ताला जातो. (चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा) आणि त्यावेळी कधी चंद्र, तारे, तारका आणि प्रसंगी मेणबत्ती किंवा काजवा देखील आपल्याला सक्षमपणे प्रकाश देतो हे आपण विसरतो आणि त्यांची हेळसांड करतो. त्याचप्रमाणे अस्ताला जाणारा सूर्य देखील दुसºया दिवशी नव्या उमेदीने उदयाला येतो हे त्रिकालाबाधीत सत्य आहे पण घुबडाच्या जातीच्या काही माणसांना खरा प्रकाश माहित नसतोच आणि काही फक्त पावलापुरता प्रकाश शोधत असतात. एक पाऊल ठेवण्यापुरती जागा आणि तेवढाच फक्त प्रकाश इतकी आत्मकेंद्री माणसं असतात आणि ती सत्ता-संपत्तीच्या प्रकाशात दीपून जातातआणि खºया योगत्येच्या माणसांना सोडून नकलींच्या मागे धावतात. त्यांनाच नमस्कार करण्यात स्वत:ला धन्य समजतात. पण त्या घुबडांना हे माहीत नसते की हा प्रकाश लुप्त झाल्यावर माझ्यासमोर अंधार पसरणार आहे आणि दुसरं पाऊल टाकण्याइतक दिसावं एवढा प्रकाश आणि तेवढी जागाही शिल्लक राहणार नाही अ ाणि प्रसंगी त्याचा कडेलोटही होऊ शकतो म्हणून मी अशा माणसांना निव्वळ आत्मकेंद्रीच नव्हे तर आत्मघातकी सुध्दा म्हणेल. कारण योग्य माणसाला नमस्कार न करून तुम्ही स्वत:चेच नुकसान करीत असतात. याऊलट खºया योग्यतेच्या माणसाला कुणाच्या नमस्काराची देखील गरज नसते. तो तर त्याचे काम क रीतच असतो. एखाद्या ‘दीपस्तंभा’प्रमाणे. दीपस्तंभ प्रकाश देतो, ज्याला तो प्रकाश देतो त्याच्याबद्दल त्याला काही देणघेण नसतं किंवा त्याला सातत्यानं विझवू पाहणाºया वाºयाचाही त्याला काही सोयरसुतक नसतं. तसच समाजात कोण आपल्याला दुर्लक्षित करत, हेटाळत किंवा त्रास देतं याच्याशी चांगल्या माणसाला काहीच देणं घेणं नसतं हेच खरं !-विलास भाऊलाल पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव