शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:31 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘आरसा मनाचा’ या सदरात लिहिताहेत विलास भाऊलाल पाटील..

जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. तसं भारताला उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या लोकांचा देश म्हणावं असं मला वाटतं. या देशात प्रेम, आपुलकी सद्भावआणि नाती जपणारी माणसं मानवतेचं महन्मंगल स्तोम गाणारी माणसं, त्यासाठी आयुष्य पणाला लावणारी माणसं मूळातच कमी, पण त्यांन ापूजणारी, त्यांना नमस्कार करणारी माणसं मात्र खूपच कमी. याऊलट पद, पैसा, प्रतिष्ठा (खोटी का असेना) यानं मोठी असणारी माणसं आज समाजात नमस्कार पात्र झालेली आहेत. आजकाल ‘पदं’ कशी मिळवली जातात, पैसा कसा कमावला जातो या विषयी बोलण्याची, लिहिण्याची काहीच आवश्यकता नाही असं मला वाटतं. आपणा सर्वांना ते चांगलच माहित आहे. पूर्वी एखाद्या महनीय व्यक्तीमुळे एखाद्या पदाची प्रतिष्ठा वाढत असे मात्र आजकाल एखाद्या पदामुळे गुंडपुंडसुध्दा महनीय झालेले दिसत आहेत. अर्थात याला काही सन्मान्य अपवाद नक्कीच आहेत नाही असे नव्हे पण अगदीच नगण्या बोटावर मोजण्याइतके. बहुतांश मात्र पद आणि पैशानेच महनीय झालेले दिसत आहेत. स्पष्टीकरणासाठी एक छोटी गोष्ट सांगतो, ‘एकदा एका गावात एका महापुरुषाची जयंती होती. मिरवणूक काढावयाचे ठरले. पालखी सजवण्यात आली. ऐनवेळी पालखी ठेवण्यासाठी एक गाढवच तेवढे उपलब्ध झाले. मिरवणूक निघाली. लोक पालखीला हात घालत होते. नमस्कार करत होते. गाढवाला वाटल वाह ! लोक मला हार घालत आहेत. नमस्कार करत आहेत. गाढव चेकाळलं, त्याला वाटलं मी हे पालखीचं ओझं तरी का वहावं म्हणून पालखी फेकून दिली. पालखी फेकल्याबरोबर लोक चिडले. गाढवाला पाठीवर रट्टे हाणले. गाढव पळत सुटलं.’ गोष्टीप्रमाणे आज समाजातील अनेक गाढवं पदाच्या पालखीमुळे स्वत:ला मोठे समजायला लागले अ ाहेत आणि समाजातील दुसरी गाढवं सुध्दा त्यांना मोठी समजायला लागलेली आहेत आणि नमस्कार करायला लागली आहेत. वास्तविक उगवता सूर्य सुध्दा संध्याकाळी अस्ताला जातो. (चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा) आणि त्यावेळी कधी चंद्र, तारे, तारका आणि प्रसंगी मेणबत्ती किंवा काजवा देखील आपल्याला सक्षमपणे प्रकाश देतो हे आपण विसरतो आणि त्यांची हेळसांड करतो. त्याचप्रमाणे अस्ताला जाणारा सूर्य देखील दुसºया दिवशी नव्या उमेदीने उदयाला येतो हे त्रिकालाबाधीत सत्य आहे पण घुबडाच्या जातीच्या काही माणसांना खरा प्रकाश माहित नसतोच आणि काही फक्त पावलापुरता प्रकाश शोधत असतात. एक पाऊल ठेवण्यापुरती जागा आणि तेवढाच फक्त प्रकाश इतकी आत्मकेंद्री माणसं असतात आणि ती सत्ता-संपत्तीच्या प्रकाशात दीपून जातातआणि खºया योगत्येच्या माणसांना सोडून नकलींच्या मागे धावतात. त्यांनाच नमस्कार करण्यात स्वत:ला धन्य समजतात. पण त्या घुबडांना हे माहीत नसते की हा प्रकाश लुप्त झाल्यावर माझ्यासमोर अंधार पसरणार आहे आणि दुसरं पाऊल टाकण्याइतक दिसावं एवढा प्रकाश आणि तेवढी जागाही शिल्लक राहणार नाही अ ाणि प्रसंगी त्याचा कडेलोटही होऊ शकतो म्हणून मी अशा माणसांना निव्वळ आत्मकेंद्रीच नव्हे तर आत्मघातकी सुध्दा म्हणेल. कारण योग्य माणसाला नमस्कार न करून तुम्ही स्वत:चेच नुकसान करीत असतात. याऊलट खºया योग्यतेच्या माणसाला कुणाच्या नमस्काराची देखील गरज नसते. तो तर त्याचे काम क रीतच असतो. एखाद्या ‘दीपस्तंभा’प्रमाणे. दीपस्तंभ प्रकाश देतो, ज्याला तो प्रकाश देतो त्याच्याबद्दल त्याला काही देणघेण नसतं किंवा त्याला सातत्यानं विझवू पाहणाºया वाºयाचाही त्याला काही सोयरसुतक नसतं. तसच समाजात कोण आपल्याला दुर्लक्षित करत, हेटाळत किंवा त्रास देतं याच्याशी चांगल्या माणसाला काहीच देणं घेणं नसतं हेच खरं !-विलास भाऊलाल पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव