शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे वाहून जाणाऱ्या पाण्याला लोकसहभातून आणले तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 16:25 IST

महिंदळे परिसरात नाले केटीवेअर पूर्ण कोरडेठाक पडले आहेत व विहिरींनीही तळ गाठला आहे. पण गावाजवळ असलेला पाझर तलाव मात्र याला अपवाद ठरत आहे. परिसरात कुठेही पाणी नसताना पाझर तलावात अजूनही बºयापैकी पाणी साठा आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी व गावातील महिलांना धुणी भांडीसाठी पाझर तलाव उपयोगी ठरत आहे.

ठळक मुद्देपरिसरात विहिरींनी गाठला तळपाझर तलावावर पाणी पिण्यासाठी दूरवरून येतात गुरेपाझर तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करावेपरिसरात पाण्याचा स्त्रोत म्हणून फक्त एकच पाझर तलाव

भास्कर पाटीलमहिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : परिसरात नाले केटीवेअर पूर्ण कोरडेठाक पडले आहेत व विहिरींनीही तळ गाठला आहे. पण गावाजवळ असलेला पाझर तलाव मात्र याला अपवाद ठरत आहे. परिसरात कुठेही पाणी नसताना पाझर तलावात अजूनही बºयापैकी पाणी साठा आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी व गावातील महिलांना धुणी भांडीसाठी पाझर तलाव उपयोगी ठरत आहे.येथील पाझर तलाव हा स्वातंत्र्य पूर्व काळातील आहे . परंतु यात मोठ्या प्रमाणात गाळ होता. त्यामुळे साठवण क्षमता कमी होती व यात येणारे पाणी अत्यल्प होते. हे गावातील तरुणांनी हेरले व प्रथम लोकसहभागाने यातील गाळ मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी काढून तो शेतात टाकला. परिणामी आपोआप खोलीकरण झाले. परंतु दरवर्षी पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. तलावात पाणी कमी प्रमाणात येत होते व तलाव डिसेंबर महिन्यातच आटत होता. तलावाला लागून जंगल आहे. त्या जंगलातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात इतरत्र वाहून जात होते. त्या पाण्याला योग्य वळसा कसा घालता येईल याविषयी गावात चर्चा करून गावात वर्गणी गोळा केली. आमदार किशोर पाटील यांच्या सहकार्याने जेसीबी मशीन मिळाले. ग्रामस्थांनी त्यात इंधन पुरवले. दोन किलोमीटरपर्यंत मोठी पाटचारी खोदली. या पाण्यामुळे आज तलावात बºयापैकी जलसाठा आहे. परिसरात यावर्षी दोनच पाऊस पडले आहेत. तरीही तलावात परिसरातील प्राण्यांसाठी पिण्यासाठी पाणी साठा आहे.परिसरातील विहिरींनी पूर्ण तळ गाठला आहे. परंतु तलावातील पाणी परिसरातील गुरे व पक्ष्यांसाठी जीवनदायी ठरत आहे. लांब अंतरावरुन येथे पाणी पिण्यासाठी पशुपक्षी येत आहेत.रखडलेल्या तलावाच्या कामाला मुहूर्त मिळेल काय?गेल्या तीन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून तलावात खोलीकरण, भिंतीची उंची वाढवणे व भिंतीला दोघांची पिंचिंग करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. थोडक्यात खोलीकरण झाले व कामाला ग्रहण लागले. ते आजतागायत लागलेलेच आहे. काम आजही बंदच आहे. या तलावाच्या कामात गैरप्रकार झाला असावा म्हणून इतक्या दिवसांपासून काम बंद आहे. याकडे संबंधित आधिकाºयांनी लक्ष द्यावे व त्वरित अपूर्ण अवस्थेत बंद पडलेले काम सुरू करावे अन्यथा ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव