शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम वाया गेल्याने संपूर्ण विमा भरपाई द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:20 IST

पातोंडा ता.अमळनेर पातोंडासह परिसरात गेल्या आठवड्यात दोन तीन दिवस पाऊस झाल्याने बळीराजाचे समाधान झाले खरे; पण गेल्या अडीच महिन्याच्या ...

पातोंडा ता.अमळनेर

पातोंडासह परिसरात गेल्या आठवड्यात दोन तीन दिवस पाऊस झाल्याने बळीराजाचे समाधान झाले खरे; पण गेल्या अडीच महिन्याच्या पावसाच्या ओढीने संपूर्ण खरिपाचा हंगाम वाया गेल्याने बळीराजाची पूर्णतः आर्थिक घडी विस्कटली.

जून, जुलै व अर्धा आगस्टपर्यंत पावसाने ओढ दिली. जवळजवळ अडीच महिना पावसाने दडी मारली होती. यामुळे शेतीवरच जीवनमान अवलंबून असलेल्या बळीराजाची पूर्णतः शेती उत्पादनाची व आर्थिक प्रपंचाची घडी संपूर्ण विस्कटली. असा हा बळीराजा भीषण दुष्काळी परिस्थितीच्या संकटात सापडला आहे, तरी शासनाने या गंभीर परिस्थितीची तत्काळ दखल घेऊन हेक्टरीभरीव अशी आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

पातोंडासह परिसरात जून महिन्यात हलक्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली; पण दीड महिना पाऊसच पडला नाही. त्यामुळे पहिली पेरणी वाया गेली. जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरणी केली. पेरणी करून एक महिना उलटला तरी उगवण पिकांवर पाऊस न झाल्याने पिके जळू लागली. खरीप हंगाम शंभर टक्के वाया जाणारच, म्हणून शेतकरी हताश झाला. महागडी कापूस, मूग, तूर आदी बियाणे पेरणी करून आर्थिक फटका बसला. जूनमध्ये एकदा, जुलैपण एकच असा फक्त साठ-सत्तर मिमी इतकाच पाऊस परिसरात झाला.

पावसाळा अगदी उन्हाळ्यासारखा

अर्धा आगस्ट महिना कोरडा गेला. भरपावसाचा ऋतु हा उन्हाळ्यासारखा जात आहे. बळीराजा हवालदिल झाला. पिके अजून जमिनीच्या कुशीतच आहेत. पावसाअभावी वाढ खुंटली आहे. वरून उन्हाचा तडाखा यामुळे पिके जळू लागली. पूर्ण खरीप हंगाम वाया गेला. आता पाऊस पडला समाधान झाले; पण खरिपाचा हंगाम वाया जाणार, हे संकट कायम राहील. दोन दिवस पाऊस पडला. आता पुन्हा पावसाने उघडीप दिली. कोमात गेलेल्या कापूस पिकाला जेमतेम जीवनदान मिळाले; पण मूग,उडीद, तीळ आदी पिके तर वाया गेलेली आहेत. आता पुढील सप्टेंबरमध्येही पाऊस नसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

विमा भरपाई मिळावी

पातोंडासह परिसरातील सावखेडा, मुंगसे, रुंधाटी, मठगव्हाण, दापोरी, दहीवद,

सोनखडी, नगाव-गडखांब परिसर, नांद्री, खवशी, खेडी, अमळगाव-जळोद परिसर या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विमाधारकांना सपूर्ण विमा भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

आमदार अनिल पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे वरील दुष्काळी गावातील सरपंच, उपसरपंच ,सदस्य,सामाजिक कार्यकर्ते,यांनी दुष्काळी परिस्थितीची समस्या सांगून लेखी निवेदन दिले. त्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव अशी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. आमदार अनिल पाटील यांनी तत्काळ दखल घेऊन शासनाकडे प्रस्ताव मांडून बळीराजासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.