शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

हंगाम वाया गेल्याने संपूर्ण विमा भरपाई द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:20 IST

पातोंडा ता.अमळनेर पातोंडासह परिसरात गेल्या आठवड्यात दोन तीन दिवस पाऊस झाल्याने बळीराजाचे समाधान झाले खरे; पण गेल्या अडीच महिन्याच्या ...

पातोंडा ता.अमळनेर

पातोंडासह परिसरात गेल्या आठवड्यात दोन तीन दिवस पाऊस झाल्याने बळीराजाचे समाधान झाले खरे; पण गेल्या अडीच महिन्याच्या पावसाच्या ओढीने संपूर्ण खरिपाचा हंगाम वाया गेल्याने बळीराजाची पूर्णतः आर्थिक घडी विस्कटली.

जून, जुलै व अर्धा आगस्टपर्यंत पावसाने ओढ दिली. जवळजवळ अडीच महिना पावसाने दडी मारली होती. यामुळे शेतीवरच जीवनमान अवलंबून असलेल्या बळीराजाची पूर्णतः शेती उत्पादनाची व आर्थिक प्रपंचाची घडी संपूर्ण विस्कटली. असा हा बळीराजा भीषण दुष्काळी परिस्थितीच्या संकटात सापडला आहे, तरी शासनाने या गंभीर परिस्थितीची तत्काळ दखल घेऊन हेक्टरीभरीव अशी आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

पातोंडासह परिसरात जून महिन्यात हलक्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली; पण दीड महिना पाऊसच पडला नाही. त्यामुळे पहिली पेरणी वाया गेली. जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरणी केली. पेरणी करून एक महिना उलटला तरी उगवण पिकांवर पाऊस न झाल्याने पिके जळू लागली. खरीप हंगाम शंभर टक्के वाया जाणारच, म्हणून शेतकरी हताश झाला. महागडी कापूस, मूग, तूर आदी बियाणे पेरणी करून आर्थिक फटका बसला. जूनमध्ये एकदा, जुलैपण एकच असा फक्त साठ-सत्तर मिमी इतकाच पाऊस परिसरात झाला.

पावसाळा अगदी उन्हाळ्यासारखा

अर्धा आगस्ट महिना कोरडा गेला. भरपावसाचा ऋतु हा उन्हाळ्यासारखा जात आहे. बळीराजा हवालदिल झाला. पिके अजून जमिनीच्या कुशीतच आहेत. पावसाअभावी वाढ खुंटली आहे. वरून उन्हाचा तडाखा यामुळे पिके जळू लागली. पूर्ण खरीप हंगाम वाया गेला. आता पाऊस पडला समाधान झाले; पण खरिपाचा हंगाम वाया जाणार, हे संकट कायम राहील. दोन दिवस पाऊस पडला. आता पुन्हा पावसाने उघडीप दिली. कोमात गेलेल्या कापूस पिकाला जेमतेम जीवनदान मिळाले; पण मूग,उडीद, तीळ आदी पिके तर वाया गेलेली आहेत. आता पुढील सप्टेंबरमध्येही पाऊस नसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

विमा भरपाई मिळावी

पातोंडासह परिसरातील सावखेडा, मुंगसे, रुंधाटी, मठगव्हाण, दापोरी, दहीवद,

सोनखडी, नगाव-गडखांब परिसर, नांद्री, खवशी, खेडी, अमळगाव-जळोद परिसर या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विमाधारकांना सपूर्ण विमा भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

आमदार अनिल पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे वरील दुष्काळी गावातील सरपंच, उपसरपंच ,सदस्य,सामाजिक कार्यकर्ते,यांनी दुष्काळी परिस्थितीची समस्या सांगून लेखी निवेदन दिले. त्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव अशी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. आमदार अनिल पाटील यांनी तत्काळ दखल घेऊन शासनाकडे प्रस्ताव मांडून बळीराजासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.