शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

१५ एप्रिलपासून मिळणार पालकांना एसएमएमएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:16 IST

जळगाव : बालकांच्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर राबविण्यात येत असलेली आरटीई ...

जळगाव : बालकांच्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर राबविण्यात येत असलेली आरटीई प्रवेशाची सोडत बुधवारी पुण्यातून व्हीसीद्वारे काढण्यात आली आहे. आता यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून एसएमएस पाठविण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

दरवर्षी शिक्षण विभागाच्या वतीने आरटीईची प्रवेशप्रक्रिया राबविली जात असते़ त्यानुसार २५ टक्के राखीव जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यंदा ३ मार्चपासून ऑनलाईन आरटीईच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली होती़ ३ ते ३० मार्चपर्यंत पालकांना पाल्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ४ हजार ९३९ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते.

संकेतस्थळ पाहण्याचेही आवाहन

बुधवारी पुण्यातील प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण उपसंचालक द ग़ो़ जगताप यांनी ऑनलाईन व्हीसीद्वारे आरटीईची सोडत जाहीर केली. दरम्यान, किती विद्यार्थ्यांची सोडतीत निवड झाली, याची यादी मात्र जाहीर करण्यात आली नाही. १५ एप्रिलपासून पालकांना प्रवेशासाठीचे एसएमएम पाठविले जाणार असल्याचे व्हीसीत सांगण्यात आले असल्याची माहिती जळगाव शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. परंतु, एसएमएमवर अवलंबून न राहता आरटीईच्या संकेतस्थळावर लॉगिन करून यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच निवड झालेल्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत प्रवेश घेणे आवश्यक आहे.