शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पहूर रुग्णालयात तब्बल महिनाभरानंतर रुग्णसेवा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST

यामुळे रुग्णांची परवड थांबली आहे. विशेष म्हणजे कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती केली असून, पुन्हा दोन डॉक्टर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे जिल्हा ...

यामुळे रुग्णांची परवड थांबली आहे. विशेष म्हणजे कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती केली असून, पुन्हा दोन डॉक्टर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी सांगितले आहे.

गेल्या महिन्यात १८ ऑगस्टपासून रुग्णालयात डॉक्टरांअभावी रुग्णसेवा खंडित होती. यामुळे गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांची परवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आपत्कालीन व अपघातग्रस्त रुग्णांवर प्राथमिक उपचार होत नसल्याने रुग्णांच्या जिवावर बेतल्याचे पाहावयास मिळाले आहे, तर शवविच्छेदनासाठी मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात न्यावा लागत असल्याने गैरसोय झाली आहे. गावात साथीच्या आजाराने थैमान घातल्याने घराघरांत रुग्ण वाढले आहेत. रुग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णांना खाजगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. सर्वसामान्य रुग्णांना हे परवडणारे नसल्याने उपचारापासून काही रुग्ण वंचित राहिल्याचे दिसून आले. अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी सूर्यवंशी यांची नियुक्ती केली असून, त्या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांना कायम नियुक्ती दिली आहे, तसेच दोन डॉक्टर कंत्राटी पद्धतीने नियुक्त होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. डॉ. सूर्यवंशी यांनी शनिवारी वैद्यकीय सूत्रे हातात घेतल्याने रुग्णसेवा सुरळीत झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.