शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

बहुमताने मंजूर केलेल्या विषयांनाच विरोध करण्याची सत्ताधाऱ्यांवर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 21:01 IST

जळगाव : मनपात सत्तेत येवून भाजपला दीड वर्ष झाले. याकाळात सत्ताधाऱ्यांवरच महासभेत बहूमताने घेतलेल्या अनेक विषयांवरून माघार घेण्याची व ...

जळगाव : मनपात सत्तेत येवून भाजपला दीड वर्ष झाले. याकाळात सत्ताधाऱ्यांवरच महासभेत बहूमताने घेतलेल्या अनेक विषयांवरून माघार घेण्याची व विरोध करण्याची नामुष्की आली आहे. एलईडी पाठोपाठ आता शहरासाठी देण्यात आलेल्या सफाईच ठेक्यावरुन आता सत्ताधाºयांकडूनच विरोध होत असून, मक्ता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे सत्ताधाºयांनी विरोधकांचा विरोध झुगारून हा ठेका देण्याचा ठराव मंजूर केला होता.शुक्रवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपा नगरसेवकांकडून कचºयाच्या प्रश्नावर प्रशासन व मक्तेदाराला धारेवर धरत नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला दिलेला मक्ता रद्द करण्याची मागणी केली. याआधी सत्ताधारी भाजपाने शहरात एलईडी लावण्यासाठी ईईईएसएल या कंपनीला ७ कोटी रुपयांचा मक्ता देण्याचा ठरावाला मंजूरी दिली होती.मात्र, संबधित कंपनीने मुदतीत एलईडी लावले नाही तसेच खराब दर्ज्याचे एलईडी लावल्यामुळे सत्ताधाºयांनी हा मक्ता देखील रद्द करण्याची मागणी केली होती. आता कचºयाचा प्रश्नावरुन देखील वॉटरग्रेस कंपनीचा मक्ता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप नगरसेवकांककडून ठराव करण्याआधीच याबाबतची माहिती किंवा अभ्यास केला जात नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.दबावात घेतले जाताहेत निर्णय ?सफाईसाठी ७५ कोटी रुपयांचा मक्ता देण्यात आला आहे. वॉटरग्रेस कंपनीबाबत काही आक्षेप होते. त्या आक्षेपांची माहिती जून महिन्यात झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी सभागृहात दिली होती.तसेच सफाईचा मक्ता मंजुरीसाठी झालेल्या महासभेपूर्वी अनेक भाजपा नगसेवकांचा विरोध देखील होता.सभेत मात्र बहूमताने हा मक्ता नाशिकच्याच कंपनीला देण्याचे ठरले. त्यामुळे हा निर्णय घेताना भाजपा नगरसेवकांवर नेमका दबाव कोणाचा होता ? हा प्रश्न निर्माण होतो.तसेच आता सर्वच भाजपा नगरसेवकांकडून या मक्तयाचा विरोध होत असल्याने मक्ता देण्याआधीच विरोध का केला नाही ? हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. हाच प्रकार आता एलईडीबाबत देखील झालेला पहायला मिळाला.विषयांच्या अभ्यासासाठी समिती की विषय थांबविण्यासाठी ?४एकीकडे विषय मंजूर करून त्यानंतर विरोध करण्याची नामुष्की सत्ताधाºयांवर ओढावत असताना दुसरीकडे काही महत्वाचा प्रश्नावर तोडगा न काढताच प्रशासनाकडून आलेल्या अनेक महत्वाच्या विषयांना थांबविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा घाट सत्ताधाºयांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे समिती स्थापन करून समितीची एकही बैठक देखील होत नाही.४ ३ आॅगस्टच्या सभेत भंगार बाजाराचे आतिक्रमण कारवाईचा प्रस्ताव स्थगित ठेवत याबाबत निर्णयासाठी ागत बालाणी, नवनाथ दारकुंडे, खान रुकसानाबी यांच्यासह एमआयएमचे नगरसेवक रियाज बागवान यांची समिती स्थापन केली. अद्यापपर्यंत या समितीची एकही बैठक झालेली नाही.४ गाळेधारकांवर मनपाने थकीत भाड्यापोटी ५ पटचा केलेला दंड रद्द करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. यामध्ये भगत बालाणी, अ‍ॅड.शुचिता हाडा, अ‍ॅड.दिलीप पोकळे यांचा समावेश होता. त्यानंतर मनपान समिती स्थापन करण्याचा ठरावच शासनाकडे विखंडनासाठी पाठवला होता. या समितीचीही एकही बैठक झाली नव्हती.४त्यानंतर भूसंपासनाच्या विषयासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासंदर्भात नगसेवक कैलास सोनवणे, अ‍ॅड.शुचिता हाडा, अ‍ॅड.दिलीप पोकळे व शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांची समिती स्थापन करण्यात आली. ही समिती स्थापन करूनही मनपाने सर्वोच्च न्यायालयात कुठलीही याचिका दाखल केली नाही. त्यामुळे समिती स्थापन करण्याचा विषय नेमका विषयाचा अभ्यासासाठी केला जातो की विषय थांबविण्यासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव