शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दोन बंधू एकत्र येऊ नयेत, यासाठी विरोधकांकडून विघ्न; ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:00 IST

हे दोन्ही नेते एकत्र आले तर त्यांच्या दोन्ही पक्षाची शक्ती वाढेल ही भीती विरोधकांना सतावत आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे.

Shiv Sena UBT: "महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेउद्धव ठाकरे हे एकत्र येणे गरजेचे असल्याची भावना महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे. हे दोन्ही नेते एकत्र आले तर त्यांच्या दोन्ही पक्षाची शक्ती वाढेल ही भीती विरोधकांना सतावत आहे. त्यामुळे राज ठाकरेउद्धव ठाकरे हे एकत्र येऊ नयेत यासाठी विरोधकांकडून विघ्न निर्माण केले जात आहे," असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी केला आहे.

सुभाष देसाई हे बुधवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता अजिंठा विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याआधी उद्धवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. जिल्ह्यात पक्षाची स्थिती आणि इतर मुद्यांची त्यांनी यावेळी माहिती घेतली.

संघर्ष मोठा आहे, लढा आणि जिंकण्याचा संदेशशिवसेनेत फुटीनंतर काही नेते शिंदेसेनेत गेले आहेत. मात्र, आपल्याकडे शिवसैनिकांची ताकद आहे. त्यामुळे विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव विसरून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे देसाई यांनी सांगितले. आगामी काळात पक्षासाठी संघर्ष मोठा आहे. मात्र, या संघर्षावर मात करून पक्ष संघटनेच्या जोरावर पुन्हा पक्षाला चांगले दिवस आणायचे आवाहन देसाई यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, जयश्री महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, या बैठकीत संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर जयश्री महाजन, लक्ष्मण पाटील, महानंदा पाटील, विराज कावडिया यांच्यासह उद्धवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीबाबत देसाई यांनी आढावा घेतला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना