शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

राजकारणात केवळ घोषणांचाच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:00 IST

नंदुरबार ते साक्री ५६ किमी

संतोष सूर्यवंशीनंदुरबार : राजकारणात सर्वच राजकीय पक्षांकडून केवळ विविध घोषणांचाच पाऊस पाडण्यात येत असतो़ प्रत्यक्ष निवडून आल्यावर मात्र कृतीशून्य असते़ त्यामुळे घोषणांवर फारसा विश्वास न ठेवता कृतीला अधिक महत्त्व द्यावे, असे मत मतदारांकडून व्यक्त करण्यात आले़‘लोकमत’ प्रतिनिधीने नंदुरबार ते साक्री लोकसभा मार्गावर एसटी बसने प्रवास करून प्रवाशांची मते जाणून घेतली. यावेळी अनेक मतदारांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख, गरिबांना दरवर्षी ७२ हजार आदी ज्वलंत मुद्यांवर आपल्या भावना व्यक्त केल्या़ बसमध्ये अनेक शेतकरीही प्रवास करीत होते़ त्यांना लोकसभा निवडणुकीबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला कवडीमोल भाव देऊन बाहेरुन आयात केलेल्या वस्तूंना मात्र अधिक किंमत मोजून आणले जात आहे़ शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव दिल्यास त्याची आर्थिक स्थिती सुधारणार असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त करण्यात आले़ भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती हा असल्याने नवीन येणाºया सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले़ लोकप्रतिनिधींही स्थानिक शेतकºयांचे प्रश्न संसदेत मांडत त्याचा पाठपुरावा करून समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त करण्यात आली़ ग्रामीण व शहरी भागातील प्रश्न वेगवेगळे आहे़ त्यामुळे दोघांना न्याय कसा मिळता येईल याचा विचार करून सरकारने काम करावे, असेमत काही प्रवाशांकडून व्यक्त झाले़ युवकांनी रोजगारनिर्मितीची अपेक्षा व्यक्त केली़पायाभुत सुविधा द्याव्यानिवडणुकींच्या तोंडावर सर्वच पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करीत असतात़ परंतु यात पायाभूत सुविधांचा अभाव असतो़ राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात, रस्ते, वीज, घरे, पाणी आदी पायाभूत सुविधांचाही समावेश करावा अशी अपेक्षा तरुणांकडून व्यक्त करण्यात आली़शासनाने युवकांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन पर योजना सुरू करण्याचीही अपेक्षा काही तरुणांंनी व्यक्त केली़

टॅग्स :Jalgaonजळगाव