शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एक जण बाधित आढळून आल्यानंतर त्याचे कुटुंबिय वगळता ती व्यक्ती कोणाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एक जण बाधित आढळून आल्यानंतर त्याचे कुटुंबिय वगळता ती व्यक्ती कोणाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आली याची माहितीच न घेता संबधितांची तपासणीच होत नसल्याचे चित्र मध्यंतरी होते. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढल्याचा तर्क लावला जात आहे. दरम्यान, याबाबत काही तथ्थ्यांची पडताळणी केली असता हे गंभीर चित्र समोर आले आहे.

जिल्ह्यात १८ सप्टेंबरपासून कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरीकडे झुकल्याचे समाधानकारक चित्र होते. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याचे चित्र आहे. यात सुरूवातीला प्रत्येक रुग्णामागे किमान आठ हायरिस्क आणि दहा ते बारा लोरिस्क कॉन्टॅक्टवर लक्ष ठेवून काहींची तपासणी केली जात होती. मात्र, मध्यंतरी शहरातच नव्हे, ग्रामीण भागातही अशा संपर्कांबाबत प्रशासनाने गांभिर्याने पावलेच उचलली नसल्याचे चित्र समोर आले होते. यात जळगाव ग्रामीणमध्येही अनेक उदाहरणे समोर आली होती. स्वत: कुणी तपासणीसाठी आले तरच त्यांची तपासणी होत होती.

केस १

एका कुटुंबातील कर्ता पुरूष बाधित आढळून आला. बाधित आढळून आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट मुलगाच घेऊन मुलानेच त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले. मात्र, त्यांच्या कुटुंबातील चार सदस्य वगळता अन्य कुणाच्या बाबतीत आरोग्य यंत्रणेने ना विचारणा केली ना कोणी समोर आले.

केस २

एक कर्मचारी बाधित आढळून आले, मात्र, नियमित त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी झाली नाही. लक्षणे आली तर तपासणी करून घेण्याचे सांगण्यात आले. केवळ कुटुंबियांची तपासणी झाली. ते आठ दिवस बाहेरच असल्याचे सांगण्यात आले.

केस ३

एक तरूण बाधित आढळून आल्यानंतर तो स्वत:च त्याच्या कुटुंबियांना तपासणीसाठी घेऊन आला होता. त्याला तेवढी लक्षणे नव्हती. मात्र, या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला होता.

लक्षणे नसलेले अधिक धोकादायक

ज्यांना कोरोनाची लक्षणे येत नाहीत, असे रुग्ण अत्यंत धोकादायक मानले जात आहे. अनेक जण बाधिताच्या संपर्कात येऊ त्यांना अगदी सौम्य लक्षणे जाणवतात किंवा जाणवतही नाही, अशांना कोरोना झालाय हे समजत नाही, मात्र, ते कोरोनाचा संसर्ग वाढतात त्यामुळे अशी लोक अधिक धोकादायक असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे अत्यंत गरजचे असल्याचे सांगितले जाते.

कोरोनाचे एकूण रुग्ण ५९२२२

बरे झालेले ५६२७९

उपचार सुरू असलेले रुग्ण १५६६

कोरेाना बळी १३७७