शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एक जण बाधित आढळून आल्यानंतर त्याचे कुटुंबिय वगळता ती व्यक्ती कोणाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एक जण बाधित आढळून आल्यानंतर त्याचे कुटुंबिय वगळता ती व्यक्ती कोणाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आली याची माहितीच न घेता संबधितांची तपासणीच होत नसल्याचे चित्र मध्यंतरी होते. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढल्याचा तर्क लावला जात आहे. दरम्यान, याबाबत काही तथ्थ्यांची पडताळणी केली असता हे गंभीर चित्र समोर आले आहे.

जिल्ह्यात १८ सप्टेंबरपासून कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरीकडे झुकल्याचे समाधानकारक चित्र होते. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याचे चित्र आहे. यात सुरूवातीला प्रत्येक रुग्णामागे किमान आठ हायरिस्क आणि दहा ते बारा लोरिस्क कॉन्टॅक्टवर लक्ष ठेवून काहींची तपासणी केली जात होती. मात्र, मध्यंतरी शहरातच नव्हे, ग्रामीण भागातही अशा संपर्कांबाबत प्रशासनाने गांभिर्याने पावलेच उचलली नसल्याचे चित्र समोर आले होते. यात जळगाव ग्रामीणमध्येही अनेक उदाहरणे समोर आली होती. स्वत: कुणी तपासणीसाठी आले तरच त्यांची तपासणी होत होती.

केस १

एका कुटुंबातील कर्ता पुरूष बाधित आढळून आला. बाधित आढळून आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट मुलगाच घेऊन मुलानेच त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले. मात्र, त्यांच्या कुटुंबातील चार सदस्य वगळता अन्य कुणाच्या बाबतीत आरोग्य यंत्रणेने ना विचारणा केली ना कोणी समोर आले.

केस २

एक कर्मचारी बाधित आढळून आले, मात्र, नियमित त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी झाली नाही. लक्षणे आली तर तपासणी करून घेण्याचे सांगण्यात आले. केवळ कुटुंबियांची तपासणी झाली. ते आठ दिवस बाहेरच असल्याचे सांगण्यात आले.

केस ३

एक तरूण बाधित आढळून आल्यानंतर तो स्वत:च त्याच्या कुटुंबियांना तपासणीसाठी घेऊन आला होता. त्याला तेवढी लक्षणे नव्हती. मात्र, या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला होता.

लक्षणे नसलेले अधिक धोकादायक

ज्यांना कोरोनाची लक्षणे येत नाहीत, असे रुग्ण अत्यंत धोकादायक मानले जात आहे. अनेक जण बाधिताच्या संपर्कात येऊ त्यांना अगदी सौम्य लक्षणे जाणवतात किंवा जाणवतही नाही, अशांना कोरोना झालाय हे समजत नाही, मात्र, ते कोरोनाचा संसर्ग वाढतात त्यामुळे अशी लोक अधिक धोकादायक असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे अत्यंत गरजचे असल्याचे सांगितले जाते.

कोरोनाचे एकूण रुग्ण ५९२२२

बरे झालेले ५६२७९

उपचार सुरू असलेले रुग्ण १५६६

कोरेाना बळी १३७७