शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

घरात आलेल्या शाळेला समृद्ध करण्याचे आॅनलाईन आव्हान-डॉ.जगदीश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 14:43 IST

घरात आलेल्या शाळेला समृद्ध करण्यासाठी आॅनलाईन साक्षरतेचे मोठे आव्हान शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले आहे, असे मत बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देद्वारकाई व्याख्यानमालेत गुंफले प्रथम पुष्पतीन दिवसीय आॅनलाईन व्याख्यानमाला

भुसावळ, जि.जळगाव : कोरोनाने अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन कौशल्याचे तंत्रच बदलून टाकले आहे. अर्थात आॅनलाईन शिक्षणाचे माध्यम वापरणे गरजेचे बनल्याने शाळाच घरात आली आहे. पण या घरात आलेल्या शाळेला समृद्ध करण्यासाठी आॅनलाईन साक्षरतेचे मोठे आव्हान शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले आहे, असे मत बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी व्यक्त केले.भुसावळ येथील जय गणेश फाउंडेशनतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री स्व.द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेत डॉ.पाटील यांनी प्रथम पुष्प गुंफले.प्रारंभी जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी मातोश्री स्व. द्वारकाबाई नेमाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. समन्वयक अरूण मांडळकर यांनी व्याख्यानमालेचा आढावा घेऊन वक्त्यांचा परिचय करून दिला.उमेश नेमाडे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश कथन केला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सल्लागार गणेश फेगडे यांनी केले. त्यानंतर शाळा आली घरात या विषयावर डॉ.जगदीश पाटील यांनी कस्टम अ‍ॅनिमेशन पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून झूम अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या व्याख्यानाची मांडणी केली. ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे शाळा कधी सुरू होतील हे काही सांगता येत नाही. मात्र या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सध्या तरी आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय उभा करण्यात आला आहे. त्यामुळे घराघरातील पालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सध्या तरी आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकावे लागणार आहे. अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास करून कृती मालिकांची निर्मिती करावी लागेल तरच घरात आलेली शाळा समृद्ध होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. आॅनलाईन शिक्षण चार प्रकारे घेता येते. त्यात शंभर टक्के आॅनलाईन, अंशत: आॅनलाईन, व्हिडिओ व आॅडिओ या प्रकारांचा समावेश करता येईल. क्षमतांचा कस लावणारे हे शिक्षण आहे. पण मोठ्या भावाच्या अभ्यासाचे आकलन लहान भाऊही दृकश्राव्य माध्यमांद्वारे करू शकतो. याचा अर्थ ज्ञानाचे भांडार आॅनलाईन शिक्षणाने खुले केले आहे. पालकांनीही आॅनलाईन साक्षरतेवर भर द्यावा, असेही ते म्हणाले. संगणक, मोबाईल क्रांतीमुळे शिक्षण मुठीत आले आहे. एका क्लिकवर हवे ते मिळवता येते. मात्र असे असले तरी शिक्षण विभागाने पाल्यांना जी पाठ्यक्रमाची पुस्तके पोहोचवली आहेत, ती हाताळावी. मुलांशी संवाद, गप्पा, चर्चांच्या माध्यमातून प्रवाही संवाद साधावा. आॅनलाईन शिक्षणाने शाळा व शिक्षकांचे महत्त्व अजिबात कमी होणार नाही. परंतु आपल्याला या आभासी जगाशीसुद्धा जुळवून घ्यावे लागेल, असेही मत त्यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केले.यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.गिरीश कोळी, प्रा.नीलेश गुरूचल, जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज पांडे, उपाध्यक्ष राहुल भावसेकर, सचिव तुषार झांबरे व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ