शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने गाठला ८० चा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:05 IST

अवकाळी पावसाचा फटका : आवक कमी, ओल्या कांद्यालाही सोन्याचा भाव

जळगाव : मुसळधार पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका बसला असून त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचा दर ८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बाजारपेठेतील आवकही मंदावल्याने महागडा कांदाही विकत मिळेल की नाही, अशी शंका व्यक्त होत आहे.अवकाळी पावसाने जाता जाता दिलेल्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा फटका आता कांद्याच्या पिकालाही बसला असून तयार झालेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी दीड ते दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत कांद्याचे दर हे जास्तच राहणार आहेत, असा अंदाज काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.जळगावच्या बाजारात धुळे, नंदूरबार, नाशिक, सोलापूर, नगर येथून कांदा येतो. मात्र पावसामुळे तोही खराब झाला आहे. त्यामुळे पूर्वी ४ हजार गोणी कांदा येत होता. आता त्याठिकाणी ३०० ते ४०० गोणी कांदाच येत आहे. परिणामी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढले आहेत. हे भाव आणखीन वाढण्याची शक्यता आहे.येणाºया कांद्यामध्येही १० ते १५ किलो कांदा फुकट जात आहे. त्यामुळे शेतकºयांबरोबरच व्यापारीही हवालदिल झाला आहे. भिजलेला कांदा जास्त प्रमाणात बाजारात असल्याचे दिसत असून त्याचे दरही ६० ते ७० च्या घरात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. सुका कांदा आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्यामुळे ओला कांदा किरकोळ स्वरुपात घेण्यावर ग्राहक भर देत आहेत. भविष्यात हे दर आणखीन भडकण्याच्या शक्यतेने आहे त्या दरात ग्राहक कांद्याची उचल करत आहेत.लसूणही ३०० रुपयांपर्यंत पोहोचलीकिरकोळ बाजारात लसूणचे दर ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. जळगाव बाजारपेठेत इंदोर, म्हैसूर या बाजारपेठेतून लसूण मागवलाजातो. घाऊक बाजारात या लसणाचे दर १०० ते १२५ रुपयांपर्यंत आहेत. मात्र किरकोळ बाजारात हेच दर ३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ग्राहकराजा आर्थिक कोंडीत सापडला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव