शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

एका दुपारची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 1:22 PM

एकदा असे झाले. कस्तुरबा निघाली. वेळ दुपारची होती. बिहारातले रणरणते ऊन. सोबत अवंतिकाबाई होत्या. त्या महाराष्ट्रातल्या होत्या. दुर्गाबेन होत्या. तिघी सोबत निघाल्यात. या बायका एका चौकात थांबल्यात. चौकात मोठे चिंचेचे झाड होते. प्रगाढ सावली होती. तसे बिहारात बांबू खूप. गवताला तर काही सुमार नाही. यापासून झोपड्या बनवायच्या. एका झोपडीपाशी या ...

एकदा असे झाले. कस्तुरबा निघाली. वेळ दुपारची होती. बिहारातले रणरणते ऊन. सोबत अवंतिकाबाई होत्या. त्या महाराष्ट्रातल्या होत्या. दुर्गाबेन होत्या. तिघी सोबत निघाल्यात. या बायका एका चौकात थांबल्यात. चौकात मोठे चिंचेचे झाड होते. प्रगाढ सावली होती. तसे बिहारात बांबू खूप. गवताला तर काही सुमार नाही. यापासून झोपड्या बनवायच्या. एका झोपडीपाशी या तिघी जणी थांबल्यात. हाक मारली.कुणी आहे का घरात? घरातून काहीही हालचाल कशी नाही?’ उत्तरादाखल अपार शांतता होती. कस्तुरबा म्हणाली, ‘तहान लागलीय बाई खूप. कुणी आहे का घरात? पेलाभर पाणी मिळेल का प्यायला? दाराशी साºया बायका आहेत तुमच्या.’झोपडीचे कवाड कुरकुरले. किलकिले झाले. एक हात दाराच्या फटीतून बाहेर आला. कृश, काळा कुळकुळीत हात. हातावर निळ्या रेषांचे घनदाट जाळे. हात काळा कळकट. पेला मात्र कमालीचा स्वच्छ. पेल्यातले पाणी झळाळते. कस्तुरबाने पेला हातात नाही घेतला. पाणी देणारे मनगटच हातात धरले. काळा हात थरथरला.‘कवाड उघड बाई.’‘लाज आती है.’‘बाई ग, तू का नाही येत स्वराज्याच्या कार्यक्रमात बाहेर?’‘अडचण आहे बाई.’‘कसली अडचण आहे?’‘काय करू बाई? आम्हाला चळवळीत सामील व्हायची खूप इच्छा आहे. आम्हाला वाटते की सभेला जावे. नेत्यांचे दोन शब्द आमच्या कानी पडावे, पण काय करणार? मोठी अडचण आहे. या, घरात तर या.’कस्तुरबा आपल्या सख्यांसोबत घरात गेली. घरात तीन बायका होत्या. एकीच्याही अंगावर धडपणे कपडे नव्हते. एक कपडा घरात असायचा. तो पुरुषाने अंगावर घ्यायचा. बाईला तो अर्धा तुकडा अंगावर अर्ध्या साडीसारखा नेसून बाहेर पडावे लागायचे. अंगावर नेसलेली तेवढी एक काय ती साडी. हिंदुस्तानात असल्या झोपड्या अगणित आहेत जिथे काही काही नाही. अंगावरचे कपडे तेवढे जेमतेम आहेत. खूप माणसे अशी रहातात. त्या झोपडीतली एक बाई म्हणाली, ‘आम्ही दोघा जावा घरात आहोत. सासूबाई लुगडे नेसून बाजाराला गेल्या आहेत. अब्रू झाकण्यासाठी आमच्यापाशी दुसरा कपडा नाही. त्यामुळे आम्हाला बाहेर पडता येत नाही. मन मारून झोपडीत बसून रहावे लागते.’कस्तुरबाच्या प्रश्नाला हे उत्तर होते. सायंकाळी तिने दुपारची ही करुण कथा गांधीजींना सांगितली. ते गंभीर झाले. त्यांच्या हृदयात वेदना जागली.(क्रमश:)- प्रा.विश्वास पाटील

टॅग्स :Jalgaonजळगाव