शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

पुन्हा एकदा मोदी लाटेचा जाणवला परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 21:51 IST

प्रतिक्रिया : मोठ्या फरकाने पराभव झाल्याने विरोधक झाले अवाक

जळगाव : भाजपाने जिल्ह्यातील दोन्ही जागा कायम राखल्या आहेत. मात्र यंदा किमान एका ठिकाणी तरी बदल होईल, अशी अपेक्षा विरोधकांना होती. परंतु दोन्ही ठिकाणीही मोठ्या फरकाने पराभव झाल यामुळे विरोधक अवाक झाले असून सत्ताधाऱ्यांसह त्यांनीही मोदी लाट पुन्हा एकदा चालल्याची कबुली दिली आहे.उत्तमराव पाटील यांच्यापासून विजयाची परंपरा आजही कायम आहे. उन्मेष पाटील यांना आमच्या अपेक्षेपेक्षा निश्चितच जास्त मतदान मिळाले असून हा युतीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे.- गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री.देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची यावेळीही सुप्त लाट होती. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात युतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले, याचा आनंद असून त्यासाठी मतदारांना धन्यवाद.-सुरेशदादा जैन, माजी मंत्रीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात केलेल्या कामांचा हा विजय आहे. नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू-सुरेश भोळे,आमदारमतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत मतदानाचा रेषो एकसारखाच होता. त्यामुळे हा संशोधनाचा विषय आहे. प्रचारादरम्यान मिळालेल्या प्रतिसादावरून एवढा पराभव होणे शक्यच नाही.- गुलाबराव देवकर, राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवारजनतेने दिलेला कौल मान्य आहे. उमेदवारी उशिरा झाल्याने प्रचाराला वेळ कमी मिळाला. पराभवाचे चिंतन करु, तसेच जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू.-डॉ.उल्हास पाटील, कॉँग्रेसचे उमेदवारपंतप्रधान मोदींनी राबविलेल्या विविध लोकोपयोगी योजना तसेच खासदार खडसे यांनी तालुक्यात सतत ठेवलेला संपर्क तसेच गरिबांची केलेली कामे व कार्यकर्त्यांची फळी हे विजयाचे गणित आहे.- हरिभाऊ जावळे, आमदार रावेर-यावल विधानसभाजनतेने नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी दिली. चांगल्या कामाला ही संधी आहे. राज्यात आणि देशात भाजप, शिवसेना आणि हिंदुत्ववाद जपणाºया पक्षाला मतदारांनी पुन्हा संधी दिली.- प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार चोपडा विधानसभारक्षा खडसे यांना भुसावळ विधानसभा मतदारसंघातून ४५ हजार पेक्षाही जास्त मताधिक्य मिळणार, असा मी व्यक्त केलेला अंदाज अचूक खरा ठरला आहे. त्याचप्रमाणे मतदारांनी पंतप्रधान मोदी व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर हा विश्वास टाकला.-संजय सावकारे,आमदार, भुसावळअमळनेर तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देईन, असा शब्द आपण पक्षश्रेष्ठींना दिला होता, आणि तो पाळला. पक्षातीलच काही फितूर झाले होते, त्याचा परिणाम झाला नाही.-शिरीष चौधरी,आमदार, अमळनेर विधानसभाहे यश अन्य कोणत्याही नेत्याचे नसून फक्त मोदी यांचे आहे. त्यांनी दाखविलेले स्वप्न या पाच वर्षात तरी पूर्ण होईल, असा आशावाद जनतेला आहे. पाहूया ते काय करतात?-डॉ. सतीश पाटील, आमदार, एरंडोल- पारोळा विधानसभा.गेल्या तीस वर्षांपासून पाचोरा- भडगाव मतदारसंघातून लोकसभेसाठी युतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य मिळाले असून यंदाही ७५ हजारापेक्षा जास्त लीड दिला आहे. मोदींवर पुन्हा जनतेने विश्वास दाखविला.-किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव विधानसभापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारांवरील प्रभाव कायम असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे संघटन तसेच जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांचे मार्गदर्शन यामुळे अपेक्षित विजय मिळू शकला.- स्मिता वाघ, आमदार, विधानपरिषदपंतप्रधान मोदी यांचा करिश्मा कायम आहे. यासाठी पक्षाध्यक्ष शहा यांचीही मोलाची साथ लाभली अूसन राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस, नेते गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांचे मार्गदर्शन याचबरोबवर कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे हे यश मिळू शकले.- उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजपादोन्ही ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली होती. परंतु आमच्या पराभव झाला. निकाल धक्कादायक असून पराभवाचे चिंतन करून पुढील निवडणुकीला सामोरे जाऊ.-अ‍ॅड. संदीप पाटील,जिल्हाध्यक्ष, काँग्रेसपरावभ होईल असे वाटत नव्हते. पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मनापासून काम केले. जनतेच कौल स्विकारत चिंतन केले जाईल.-अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसबहुतांशी ग्राम पंचायती, नगरपालिका, पंचायत समित्या, जि.प. या यूतीच्या ताब्यात आहेत.तसेच राज्य व केंद्र सरकाची विकासकामे यामुळे मतदार आकृष्ठ झाले. तरुण मतदारांना मोदींची क्रेझ भावली.-गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमूख.

टॅग्स :Politicsराजकारण