शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

पुन्हा एकदा मोदी लाटेचा जाणवला परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 21:51 IST

प्रतिक्रिया : मोठ्या फरकाने पराभव झाल्याने विरोधक झाले अवाक

जळगाव : भाजपाने जिल्ह्यातील दोन्ही जागा कायम राखल्या आहेत. मात्र यंदा किमान एका ठिकाणी तरी बदल होईल, अशी अपेक्षा विरोधकांना होती. परंतु दोन्ही ठिकाणीही मोठ्या फरकाने पराभव झाल यामुळे विरोधक अवाक झाले असून सत्ताधाऱ्यांसह त्यांनीही मोदी लाट पुन्हा एकदा चालल्याची कबुली दिली आहे.उत्तमराव पाटील यांच्यापासून विजयाची परंपरा आजही कायम आहे. उन्मेष पाटील यांना आमच्या अपेक्षेपेक्षा निश्चितच जास्त मतदान मिळाले असून हा युतीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे.- गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री.देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची यावेळीही सुप्त लाट होती. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात युतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले, याचा आनंद असून त्यासाठी मतदारांना धन्यवाद.-सुरेशदादा जैन, माजी मंत्रीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात केलेल्या कामांचा हा विजय आहे. नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू-सुरेश भोळे,आमदारमतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत मतदानाचा रेषो एकसारखाच होता. त्यामुळे हा संशोधनाचा विषय आहे. प्रचारादरम्यान मिळालेल्या प्रतिसादावरून एवढा पराभव होणे शक्यच नाही.- गुलाबराव देवकर, राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवारजनतेने दिलेला कौल मान्य आहे. उमेदवारी उशिरा झाल्याने प्रचाराला वेळ कमी मिळाला. पराभवाचे चिंतन करु, तसेच जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू.-डॉ.उल्हास पाटील, कॉँग्रेसचे उमेदवारपंतप्रधान मोदींनी राबविलेल्या विविध लोकोपयोगी योजना तसेच खासदार खडसे यांनी तालुक्यात सतत ठेवलेला संपर्क तसेच गरिबांची केलेली कामे व कार्यकर्त्यांची फळी हे विजयाचे गणित आहे.- हरिभाऊ जावळे, आमदार रावेर-यावल विधानसभाजनतेने नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी दिली. चांगल्या कामाला ही संधी आहे. राज्यात आणि देशात भाजप, शिवसेना आणि हिंदुत्ववाद जपणाºया पक्षाला मतदारांनी पुन्हा संधी दिली.- प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार चोपडा विधानसभारक्षा खडसे यांना भुसावळ विधानसभा मतदारसंघातून ४५ हजार पेक्षाही जास्त मताधिक्य मिळणार, असा मी व्यक्त केलेला अंदाज अचूक खरा ठरला आहे. त्याचप्रमाणे मतदारांनी पंतप्रधान मोदी व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर हा विश्वास टाकला.-संजय सावकारे,आमदार, भुसावळअमळनेर तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देईन, असा शब्द आपण पक्षश्रेष्ठींना दिला होता, आणि तो पाळला. पक्षातीलच काही फितूर झाले होते, त्याचा परिणाम झाला नाही.-शिरीष चौधरी,आमदार, अमळनेर विधानसभाहे यश अन्य कोणत्याही नेत्याचे नसून फक्त मोदी यांचे आहे. त्यांनी दाखविलेले स्वप्न या पाच वर्षात तरी पूर्ण होईल, असा आशावाद जनतेला आहे. पाहूया ते काय करतात?-डॉ. सतीश पाटील, आमदार, एरंडोल- पारोळा विधानसभा.गेल्या तीस वर्षांपासून पाचोरा- भडगाव मतदारसंघातून लोकसभेसाठी युतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य मिळाले असून यंदाही ७५ हजारापेक्षा जास्त लीड दिला आहे. मोदींवर पुन्हा जनतेने विश्वास दाखविला.-किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव विधानसभापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारांवरील प्रभाव कायम असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे संघटन तसेच जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांचे मार्गदर्शन यामुळे अपेक्षित विजय मिळू शकला.- स्मिता वाघ, आमदार, विधानपरिषदपंतप्रधान मोदी यांचा करिश्मा कायम आहे. यासाठी पक्षाध्यक्ष शहा यांचीही मोलाची साथ लाभली अूसन राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस, नेते गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांचे मार्गदर्शन याचबरोबवर कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे हे यश मिळू शकले.- उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजपादोन्ही ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली होती. परंतु आमच्या पराभव झाला. निकाल धक्कादायक असून पराभवाचे चिंतन करून पुढील निवडणुकीला सामोरे जाऊ.-अ‍ॅड. संदीप पाटील,जिल्हाध्यक्ष, काँग्रेसपरावभ होईल असे वाटत नव्हते. पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मनापासून काम केले. जनतेच कौल स्विकारत चिंतन केले जाईल.-अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसबहुतांशी ग्राम पंचायती, नगरपालिका, पंचायत समित्या, जि.प. या यूतीच्या ताब्यात आहेत.तसेच राज्य व केंद्र सरकाची विकासकामे यामुळे मतदार आकृष्ठ झाले. तरुण मतदारांना मोदींची क्रेझ भावली.-गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमूख.

टॅग्स :Politicsराजकारण