शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ही महागाई! चाळीस वर्षानंतर तूरडाळीने गाठला उच्चांक! १८५ रुपये किलोवर गेला दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 14:20 IST

१८५ प्रतिकिलोने विक्री : चने, वाटाणा, मूगदाळ आणि चनाडाळही महागली

जळगाव : ४० वर्षानंतर तूरदाळीने महागाईचा उच्चांक गाठला आहे. आवक नाही आणि ग्राहकही नाही, अशा परिस्थिती बाजाराची श्वासकोंडी झाली आहे. १८५ ते १९० प्रतिकिलोने तूरदाळ जळगावच्या बाजारात विक्री होत असून त्यासोबतच चने, वाटाणा, मूगदाळ आणि चनादाळही महागाईच्या चुलीवर जाऊन बसली आहे. 

गेल्या हंगामात तुरीची लागवड घटली. खान्देशात सर्वाधिक कापसाची लागवड झाली. तर मराठवाडा, विदर्भातही कापूस, सोयाबीनला अनेकांनी पसंती दिली.त्यामुळे तुरीची लागवड घटली. त्यामुळे यंदा तूरदाळ दोनशे रुपयांवर पोहोचते की काय, याचीच भिती व्यक्त होऊ लागली आहे.४० वर्षानंतर तूरदाळीने दरवाढीचा उच्चांक गाठल्याचे व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. १५ वर्षांपूर्वी १५५ रुपयांपर्यंत तूरदाळीने भाव घेतला होता. त्यातुलनेत सध्याचे दर उच्चांक गाठणारा असल्याचे सांगण्यात आले.

जळगावची निर्यात घटलीसध्या तूरदाळीची आवक घटली आहे. नवे उत्पादन जानेवारीपर्यंत येईल. तोपर्यंत जळगावच्या ७५ दाल मिलच्या माध्यमातून अन्य दाळींवर प्रक्रिया करण्याला प्राधान्य दिले जात आहे. जळगावहून देशभरात दाळी निर्यात होतात. सध्या तूरदाळ महागल्याने तिच्यावर होणारी दैनंदिन प्रक्रिया कमी प्रमाणात केली जात आहे. दरम्यान,  दाळींसह वाटाणे, चने महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली आहे. एकीकडे आवक कमी असताना दुसरीकडे ग्राहकही नसल्याने व्यापाऱ्यांचीही मोठी कोंडी झाली आहे.

दरवाढीचा तुलनात्मक आढावा (प्रतिकिलो)डाळ-पूर्वीचे दर-सध्याचे दरतूरडाळ-१६०-१८५मूगडाळ-१००-१०७चनाडाळ-६०-७५चने-१६२-१७०वाटाणा-७५-८०कोट५० वर्षांपासून या व्यवसायात आहे. तूरदाळीने महागाईचा उच्चांक गाठला आहे. या भाववाढीवर सरकारचे नियंत्रण असायला हवे.स्वस्त दरात तुरीची डाळ आयात करून भाव नियंत्रण करायला हवेत. तरच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.-विजयकुमार रामदास वाणी, विक्रेते.पाऊस नाही. लागवड कमी आहे.पंधरवाड्यात दमदार पाऊस झाल्यास उत्पादनात वाढ होईल. सध्या तूरदाळीची मागणी कमी असल्याने अन्य उत्पादनावर प्रक्रिया करण्याला प्राधान्य दिले जात आहे.-प्रेम कोगटा, अध्यक्ष, दाल-मिल असोसिएशन.

टॅग्स :Inflationमहागाई