शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

ही महागाई! चाळीस वर्षानंतर तूरडाळीने गाठला उच्चांक! १८५ रुपये किलोवर गेला दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 14:20 IST

१८५ प्रतिकिलोने विक्री : चने, वाटाणा, मूगदाळ आणि चनाडाळही महागली

जळगाव : ४० वर्षानंतर तूरदाळीने महागाईचा उच्चांक गाठला आहे. आवक नाही आणि ग्राहकही नाही, अशा परिस्थिती बाजाराची श्वासकोंडी झाली आहे. १८५ ते १९० प्रतिकिलोने तूरदाळ जळगावच्या बाजारात विक्री होत असून त्यासोबतच चने, वाटाणा, मूगदाळ आणि चनादाळही महागाईच्या चुलीवर जाऊन बसली आहे. 

गेल्या हंगामात तुरीची लागवड घटली. खान्देशात सर्वाधिक कापसाची लागवड झाली. तर मराठवाडा, विदर्भातही कापूस, सोयाबीनला अनेकांनी पसंती दिली.त्यामुळे तुरीची लागवड घटली. त्यामुळे यंदा तूरदाळ दोनशे रुपयांवर पोहोचते की काय, याचीच भिती व्यक्त होऊ लागली आहे.४० वर्षानंतर तूरदाळीने दरवाढीचा उच्चांक गाठल्याचे व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. १५ वर्षांपूर्वी १५५ रुपयांपर्यंत तूरदाळीने भाव घेतला होता. त्यातुलनेत सध्याचे दर उच्चांक गाठणारा असल्याचे सांगण्यात आले.

जळगावची निर्यात घटलीसध्या तूरदाळीची आवक घटली आहे. नवे उत्पादन जानेवारीपर्यंत येईल. तोपर्यंत जळगावच्या ७५ दाल मिलच्या माध्यमातून अन्य दाळींवर प्रक्रिया करण्याला प्राधान्य दिले जात आहे. जळगावहून देशभरात दाळी निर्यात होतात. सध्या तूरदाळ महागल्याने तिच्यावर होणारी दैनंदिन प्रक्रिया कमी प्रमाणात केली जात आहे. दरम्यान,  दाळींसह वाटाणे, चने महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली आहे. एकीकडे आवक कमी असताना दुसरीकडे ग्राहकही नसल्याने व्यापाऱ्यांचीही मोठी कोंडी झाली आहे.

दरवाढीचा तुलनात्मक आढावा (प्रतिकिलो)डाळ-पूर्वीचे दर-सध्याचे दरतूरडाळ-१६०-१८५मूगडाळ-१००-१०७चनाडाळ-६०-७५चने-१६२-१७०वाटाणा-७५-८०कोट५० वर्षांपासून या व्यवसायात आहे. तूरदाळीने महागाईचा उच्चांक गाठला आहे. या भाववाढीवर सरकारचे नियंत्रण असायला हवे.स्वस्त दरात तुरीची डाळ आयात करून भाव नियंत्रण करायला हवेत. तरच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.-विजयकुमार रामदास वाणी, विक्रेते.पाऊस नाही. लागवड कमी आहे.पंधरवाड्यात दमदार पाऊस झाल्यास उत्पादनात वाढ होईल. सध्या तूरदाळीची मागणी कमी असल्याने अन्य उत्पादनावर प्रक्रिया करण्याला प्राधान्य दिले जात आहे.-प्रेम कोगटा, अध्यक्ष, दाल-मिल असोसिएशन.

टॅग्स :Inflationमहागाई