शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

वृद्ध होती तरणे रे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:25 PM

‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम’ या संतांचा जयघोष आजही अनेक शतकानंतर सर्वार्थाने केला जातो. हे खूपच वैशिष्टपूर्ण ...

‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम’ या संतांचा जयघोष आजही अनेक शतकानंतर सर्वार्थाने केला जातो. हे खूपच वैशिष्टपूर्ण आहे. त्यातील मौलिक अर्थ असा आहे की, हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थीर । किंबहुना चराचर । आपण जाहला ।। या ज्ञानेश्वरीतील विशाल विचारांचा आदर्श घेत संत परंपरा अनेक आक्रमणे व आघात स्वीकारत आपले अस्त्तित्व अबाधित ठेवून जन प्रबोधन करीत शतकानुशतके विठ्ठल भक्तीचा संदेश देत आहे.‘ज्ञानदेवे रचिला पाया ...... तुका झालासे कळस’ या अभंगातील संत इमारत अनेक शतकांच्या वैचारिक पातळीत खोलवर वारकरी तत्व रुजवणारी आहे. आजही विठ्ठल भक्तीचा आनंद यात्रेत अर्थात पंढरीच्या वारीत अनेक धर्म, पंथ, जाती ह्या एकरूप झालेल्या असतात. या पंढरीच्या वारीचे अनेक संतांनी वर्णन केले आहे. त्यात संत नामदेवराय सांगतात की,पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ।।संत ज्ञानोबाराय म्हणतात की,माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।आणि त्याच वारीचे वर्णन संत तुकोबाराय करतात की,उदंड पाहिले, उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ।।ऐसी चंद्रभागा, ऐसे भिमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ।।ऐसे संत जन, ऐसे हरीदास । ऐसा नामघोष सांगा कोठो ।।याप्रमाणे वारीचे श्रेष्ठत्व विविध संतांनी अधोरेखित केले आहे.आता पंढरपूरकडे जाण्यासाठी वारकरी आतुर झालेले आहेत. म्हणून पंढरीची वारी आता आंतरराष्टÑीय वारी झालेली आहे. वारकरी आपले भौतिक वैभव विसरून वारीसाठी तळमळ करीत आहेत. म्हणूनच संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरिचा ।।आपल्या खान्देशातून अनेक दिंड्यांची परंपरा कायम आहे. आजही अनेक दिंडी सोहळे पंढरपूरला जात असतात.पंढरीच्या वारीचे वैशिष्ट- ज्याला भूक लागत नाही, त्याने वारीत यावे.- ज्याला झोप लागत नाही, त्याने वारीत यावे.-ज्याला शारीरिक व्याधी आहे, त्याने वारीत यावे.मंडळी आपल्या घरी अतिशय सुग्रास भोजन असूनही ज्यांना भूक लागत नाही अशी माणसं वारीत २-२ भाकरी खातात. आणि घरी झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोपत नाही. अशी माणसं वारीत दिवसा विसाव्यामध्ये घोरतात. आणि विशेष म्हणजे विविध शारीरिक व्याधी, दु:ख, विसरून वारीतील लोक अक्षरश: नाचतात ! फुगड्या खेळतात, ‘वृद्ध होती तरणे रे’ याप्रमाणे वारीमध्ये कायिक, वाचिक, मानसिक तपश्चर्या घडते.-विजय नामदेव भामरे, अध्यक्ष, सुकेश्वर देवस्थान.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव