शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

संततधारेने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:14 IST

बाजारपेठेत शुकशुकाट : चहूकडे पाणीच पाणी

जळगाव : गेल्या दोन आठवड्यांपासून सलग सुरू असलेल्या व आता तर तीन दिवसांपासून थोडाही खंड न घेता सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील वेगवेगळ््या भागात पाण्याचा निचरा होत नसल्याने तसेच चिखल अधिकच वाढत असल्याने विद्यार्थ्यांना तसेच रहिवाशांचे हाल होत आहेत.यंदा जून महिन्यात पाऊस लांबल्याने सर्वच जण चिंतेत होते. त्यानंतर मात्र जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस चांगलाच वाढत गेला. दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची अत्यंत बिकट स्थिती झाली आहे. त्यात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी रात्रीपर्यंत सलग सुरूच असल्याने त्याचा जवजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.जोरदार पावसामुळे नवीपेठ, जिल्हा क्रीडा संकुलनजीक पाणी साचत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले की हे पाणी कमी होते, मात्र पुन्हा जोरदार पाऊस झाला की पुन्हा पाणी साचते. त्यामुळे तीन दिवसांपासून वाहन धारकांना आपली वाहने काढताना कसरत करावी लागत आहे. या सोबतच जिल्हा रुग्णालयासमोर, श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान, बालगंधर्व नाट्यगृह इत्याही भागातही असेच अनुभव येत आहे. - जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले जात आहे तर रिपरिप पावसामुळे कॉलनी भागात चिखलच चिखल होत आहे.-शहरात अनेक ठिकाणी एकमेकांना जोडणाऱ्या दोन भागांचा रस्ता वाहून गेल्याने तर काही ठिकाणी पाईप वाहून गेल्याने रहिवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. नाल्याचे पाणी रस्त्यावर असल्याने विद्यार्थ्यांना ते धोकेदायक ठरत आहे. अनेक भागात घरांच्या आजूबाजूला पाणी साचले आहे. त्यामुळे रहिवाशी भयभीत झाले आहेत.रोजगार झाला ठप्प भाजीपाला महागलाजळगाव : पावसाने गेल्या दोन दिवसात थोडा वेळही उसंत न घेतल्याने जळगावातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे़ संपूर्ण शहरात सर्वत्र पाणी साचल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत़ शहरातील झोपडपट्टी भागात परिस्थिती भयावह झाली आहे़ नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याने बाजारपेठा मंदावल्या आहेत़ हातमजूरी करणाऱ्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ रस्त्यांची वाट लागल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे़ अनेक भागात मोठे पाणी साचले आहे़ जनजीवन सुरळीत होण्यासाठी पावसाने काही काळ उघडीप द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़ सततच्या पावसामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या समस्या जाणवणार असल्याची भिती वर्तविण्यात येत आहे़ गुरूवारी रात्री मुसळधार कोसळल्यानंतर शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती़ जीवन जगण्याशी निगडीत अनेक बाबींवर या पावसामुळे विपरीत परिणाम जाणवायला लागला आहे़ भाजीपाला महागला आहे तर अनेक छोटे मोठ व्यवसाय ठप्प झाले आहेत़ अनेक भागांमध्ये गुडघ्याऐवढे पाणी साचल्याने रस्ते बंद झालेले आहेत़२४ तास आपत्कालीन व्यवस्था तैनात ठेवण्याच्या सूचनाजळगाव : आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील सर्वच नाले भरून वाहत आहेत. पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, आपत्कलीन परिस्थिती उद्भवल्यास २४ तास मनपा कर्मचाºयांनी तैनात राहण्याचा सूचना उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी आपात्कलीन विभागाला दिल्या़शुक्रवारी उपमहापौरांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी अग्निशमन विभागाचे प्रमुख शशिकांत बारी, नगरसेवक धीरज सोनवणे यांच्यासह आपत्कलीन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. अनेक भागातील गटारी ओव्हरफ्लो झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून, मोठे नाले व उपनाले देखील भरले आहेत. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास नाल्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते, अशा भागांमध्ये जावून पाहणी करण्याचा सूचना उपमहापौरांनी दिल्या. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव