शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

संततधारेने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:14 IST

बाजारपेठेत शुकशुकाट : चहूकडे पाणीच पाणी

जळगाव : गेल्या दोन आठवड्यांपासून सलग सुरू असलेल्या व आता तर तीन दिवसांपासून थोडाही खंड न घेता सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील वेगवेगळ््या भागात पाण्याचा निचरा होत नसल्याने तसेच चिखल अधिकच वाढत असल्याने विद्यार्थ्यांना तसेच रहिवाशांचे हाल होत आहेत.यंदा जून महिन्यात पाऊस लांबल्याने सर्वच जण चिंतेत होते. त्यानंतर मात्र जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस चांगलाच वाढत गेला. दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची अत्यंत बिकट स्थिती झाली आहे. त्यात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी रात्रीपर्यंत सलग सुरूच असल्याने त्याचा जवजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.जोरदार पावसामुळे नवीपेठ, जिल्हा क्रीडा संकुलनजीक पाणी साचत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले की हे पाणी कमी होते, मात्र पुन्हा जोरदार पाऊस झाला की पुन्हा पाणी साचते. त्यामुळे तीन दिवसांपासून वाहन धारकांना आपली वाहने काढताना कसरत करावी लागत आहे. या सोबतच जिल्हा रुग्णालयासमोर, श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान, बालगंधर्व नाट्यगृह इत्याही भागातही असेच अनुभव येत आहे. - जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले जात आहे तर रिपरिप पावसामुळे कॉलनी भागात चिखलच चिखल होत आहे.-शहरात अनेक ठिकाणी एकमेकांना जोडणाऱ्या दोन भागांचा रस्ता वाहून गेल्याने तर काही ठिकाणी पाईप वाहून गेल्याने रहिवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. नाल्याचे पाणी रस्त्यावर असल्याने विद्यार्थ्यांना ते धोकेदायक ठरत आहे. अनेक भागात घरांच्या आजूबाजूला पाणी साचले आहे. त्यामुळे रहिवाशी भयभीत झाले आहेत.रोजगार झाला ठप्प भाजीपाला महागलाजळगाव : पावसाने गेल्या दोन दिवसात थोडा वेळही उसंत न घेतल्याने जळगावातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे़ संपूर्ण शहरात सर्वत्र पाणी साचल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत़ शहरातील झोपडपट्टी भागात परिस्थिती भयावह झाली आहे़ नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याने बाजारपेठा मंदावल्या आहेत़ हातमजूरी करणाऱ्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ रस्त्यांची वाट लागल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे़ अनेक भागात मोठे पाणी साचले आहे़ जनजीवन सुरळीत होण्यासाठी पावसाने काही काळ उघडीप द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़ सततच्या पावसामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या समस्या जाणवणार असल्याची भिती वर्तविण्यात येत आहे़ गुरूवारी रात्री मुसळधार कोसळल्यानंतर शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती़ जीवन जगण्याशी निगडीत अनेक बाबींवर या पावसामुळे विपरीत परिणाम जाणवायला लागला आहे़ भाजीपाला महागला आहे तर अनेक छोटे मोठ व्यवसाय ठप्प झाले आहेत़ अनेक भागांमध्ये गुडघ्याऐवढे पाणी साचल्याने रस्ते बंद झालेले आहेत़२४ तास आपत्कालीन व्यवस्था तैनात ठेवण्याच्या सूचनाजळगाव : आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील सर्वच नाले भरून वाहत आहेत. पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, आपत्कलीन परिस्थिती उद्भवल्यास २४ तास मनपा कर्मचाºयांनी तैनात राहण्याचा सूचना उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी आपात्कलीन विभागाला दिल्या़शुक्रवारी उपमहापौरांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी अग्निशमन विभागाचे प्रमुख शशिकांत बारी, नगरसेवक धीरज सोनवणे यांच्यासह आपत्कलीन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. अनेक भागातील गटारी ओव्हरफ्लो झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून, मोठे नाले व उपनाले देखील भरले आहेत. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास नाल्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते, अशा भागांमध्ये जावून पाहणी करण्याचा सूचना उपमहापौरांनी दिल्या. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव