शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या सायकलफेरीने फुटले जळगावातील शिक्षण विभागाचे बिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:28 IST

धानोरा बुद्रुक येथे कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी गुरूजी वेळेपूर्वीच हजर

ठळक मुद्देखरचं होते का पाहणी?अऩ़्ग़ुरूजी वेळेच्या आतच हजर

जळगाव : एकीकडे पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थी शाळेत येऊनही शिक्षकांचा पत्ता नसल्याचा प्रकार धानोरा बुद्रुक ता. जळगाव येथे बुधवारी घडला. जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील हे सायकलिंग करीत धानोरा रस्त्याने चालले होते. त्यावेळी त्यांना हा प्रकार दिसला आणि त्यांच्या एका मोबाईल संदेशनाने जि.प. शिक्षण विभागाचे बिंग फुटले आणि यंत्रणा हलली.या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या इतर शाळांची परिस्थिती काय असणार? प्राथमिक शिक्षणाधिकारी व संबंधित गटशिक्षणाधिकारी शाळांना भेटी देतात की नाही? यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.नियोजन अधिकारी पाटील हे रोज सकाळी पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत सायकलींग करतात़ ३ एप्रिल रोजी ते धानोरा बुद्रुक गावाकडे सायकलीने जात होते. त्यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शाळेबाहेर उभे तर शाळा खोल्या बंद असल्याचे त्यांना आढळून आले.गुरूजी देखील सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शाळेत पोहचलेले नव्हते. एक जागरुक नागरिक म्हणून त्यांनी बाहेर उभे असलेले विद्यार्थी आणि बंद शाळेचा फोटो त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़एऩपाटील यांना व्हॉटस्अ‍ॅप संदेशाद्वारे कळविला.सीईओंनी या तक्रारीची लागलीच दखल घेतली आणि गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना शाळेला भेट देण्यास सांगितले़ चव्हाण ह्या शाळेत पोहचल्या त्यावेळपर्यंत शाळा बंद असल्याचे आढळून आले. या प्रकाराची त्यांनी सीईओंना माहिती दिली. आणि धानोरा बुद्रुक शाळेचे केंद्रप्रमुख, शिक्षकांसह एक महिन्याचे वेतन कपात आणि एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले.अऩ़्ग़ुरूजी वेळेच्या आतच हजरदुसºया दिवशी सकाळी ७़३० वाजता पाटील यांनी सायकलींग करीत धानोरा बुद्रुक येथे पोहचले. त्यावेळी शाळेतील गुरूजी वेळेच्या आधीच शाळेत हजर झालेले आढळून आले. पाटील यांनी पुन्हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत फोटो काढला आणि सायकलींग करीत ते पुढे मार्गस्थ झाले.पाटील हे सायकलींग करीत असताना त्या मार्गावर असलेल्या गावातील शाळांना भेटी देऊन विद्याथी व शिक्षकांना प्रोत्साहन देत असतात.खरचं होते का पाहणी?शाळेसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी एकीकडे शासनाकडून प्रयत्न सुरू असताना गुरूजीच वेळेवर येत नसतील तर विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे़ यातच शाळा सुरू आहे की, नाही़ पटसंख्या किती आहे, विद्यार्थ्यांच्या सुविधा आदींबाबत केंद्रप्रमुखासह गटशिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी असते़ केंद्रप्रमुखाने आठवड्यातून एकदा तर विस्तार अधिकाºयाने पंधरा ते महिनाभरातून शाळेला भेट देणे बंधनकारक आहे़ परंतु, अधिकाऱ्यांकडून शाळांना भेटी दिल्या जातात का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे़७़१५ वाजता राहणार हजऱ़़जिल्हा नियोजन अधिकाºयांनी बिंग फोडल्यानंतर शिक्षण विभागाला आता जाग आली. गटशिक्षणाधिकाºयांनी सोमवारी तालुक्यातील विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची बैठक घेतली़ यावेळी विस्तार अधिकारी, विषय तज्ज्ञ आणि केंद्रप्रमुखांनी सकाळी ७़१५ ते ७़३० दरम्यानात शाळांना भेटी देऊन उपस्थितीचा अहवाल द्यावा अशा सूचना देण्यात आल्या़ याशिवाय दुपारी उशिरा येणाºया शिक्षकांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे़मी सुध्दा जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेतले आहे़ विद्यार्थ्यांचा भविष्य घडविणे हे गुरूजींचे कार्य आहे़ त्यामुळे त्यांनी वेळेवर येणे आवश्यक आहे़ एक जागरुक नागरिक म्हणून घडलेला प्रकार सीईओ यांना कळविला़ नोटीस किंवा तंबी देण्यात येईल, असे वाटले होते़ मात्र, कारवाई झाली़-प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारीधानोरा बुद्रुक येथील उशिरा येणाºया शिक्षक, केंद्र्रप्रमुखावर कार्यवाही करण्यात आली आहे़ पुन्हा असा प्रकार कुठल्याही शाळेत आढळून आल्यास त्यांना देखील नोटीस देऊन कार्यवाही करण्यात येईल़- बी़जे़पाटील़ प्राथमिक शिक्षणाधिकारी.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव