शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

जळगावजवळील मण्यारखेडा तलावात असंख्य माशांचा मृत्यू, प्रशासनाकडून पंचनामा

By अमित महाबळ | Updated: June 15, 2024 19:55 IST

मण्यारखेडा तलावात आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था यांनी लाल परी, कतला, ब्रिगेड प्रकारातील मत्सबीज सोडले होते. तलावात मासेमारी करून मच्छीमार उदरनिर्वाह करतात.

अमित महाबळ

जळगाव : तालुक्यातील मण्यारखेडा तलावात अनेक माशांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, सकाळी उघडकीस आली. यामुळे खळबळ उडाली आहे. एमआयडीसीतून वाहून येणारे प्रदूषित पाणी, प्लास्टिक चटई उद्योगातील वेस्ट मटेरियल यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे, तर शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी समन्वयातून जागेवर पंचनामा करण्यासह मृत माशांचे व पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी संकलित केले आहेत.

मण्यारखेडा तलावात आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था यांनी लाल परी, कतला, ब्रिगेड प्रकारातील मत्सबीज सोडले होते. तलावात मासेमारी करून मच्छीमार उदरनिर्वाह करतात. शनिवारी, ते मासेमारी करण्यासाठी आले असता, तलावाच्या काठावर असंख्य मृत मासे आढळून आले. मत्सबीज टाकल्यानंतर ते सहा महिन्यानंतर निघायला लागते. मे महिन्यापासून मासे काढायला सुरुवात होते. दोन दिवसांपासून मासे मरत होते पण शनिवारी मोठ्या प्रमाणात मेलेले मासे आढळून आले. यामुळे मच्छीमार संस्थेचे आर्थिक नुकसान झाले आहे. ४० ते ६० क्विंटल माशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

असा सुरू झाला फॉलोअप...

घटनेची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना समजताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळवले. या दरम्यान, तहसीलदार शीतल राजपूत यांनाही माहिती देण्यात आली. आरोग्य अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी, त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना माहिती कळवली. थोड्याच वेळात प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी समन्वय साधून घटनास्थळी पंचनामा, नमुने संकलन आदी कार्यवाही पूर्ण केली. यावेळी पोलीस पाटील उपस्थित होते.

गावात सर्वेक्षण सुरू...

या घटनेनंतर आरोग्य विभागाच्या माध्यमातून तातडीने मण्यारखेडा गावात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पुढील आणखी दोन दिवस ते सुरू राहील. या दरम्यान विषबाधा, डायरियाची लक्षणे कोणात आढळून येतात का ? याची पाहणी केली जाणार आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना बाधा झाल्यास सुरुवातीला उलटी, जुलाब आदी लक्षणे आढळून येतात.

पाण्यापासून लांब रहा, दवंडी देत आवाहन

मेलेले मासे तलावाच्या काठावर आले होते. काही मुलांनी ते विकण्यासाठी गोळा केले होते. त्यांच्याकडून ते जप्त करण्यात आले आहेत. तलावातील पाणी वापरू नये. गुरांना पिऊ देऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने दवंडी देत गावात करण्यात आले आहे.

पंचनामा केला...

घटनास्थळी वेगवेगळ्या शासकीय विभागांनी समन्वय साधून पंचनामा केला. तलावातील पाणी वापरू नये. गुरांना पाजू नये, असे आवाहन मन्यारखेडा गावात दवंडी देऊन केले आहे, अशी माहिती तहसीलदार शीतल राजपूत यांनी दिली. 

दरवर्षी समस्या येते...

एमआयडीसीतून वाहत येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे दरवर्षी मण्यारखेडा तलावातील मासे मरतात. याबाबत प्रशासनाने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. या घटनेत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था चेअरमन बाळासाहेब सैंदाणे यांनी केली आहे.