शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जळगावजवळील मण्यारखेडा तलावात असंख्य माशांचा मृत्यू, प्रशासनाकडून पंचनामा

By अमित महाबळ | Updated: June 15, 2024 19:55 IST

मण्यारखेडा तलावात आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था यांनी लाल परी, कतला, ब्रिगेड प्रकारातील मत्सबीज सोडले होते. तलावात मासेमारी करून मच्छीमार उदरनिर्वाह करतात.

अमित महाबळ

जळगाव : तालुक्यातील मण्यारखेडा तलावात अनेक माशांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, सकाळी उघडकीस आली. यामुळे खळबळ उडाली आहे. एमआयडीसीतून वाहून येणारे प्रदूषित पाणी, प्लास्टिक चटई उद्योगातील वेस्ट मटेरियल यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे, तर शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी समन्वयातून जागेवर पंचनामा करण्यासह मृत माशांचे व पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी संकलित केले आहेत.

मण्यारखेडा तलावात आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था यांनी लाल परी, कतला, ब्रिगेड प्रकारातील मत्सबीज सोडले होते. तलावात मासेमारी करून मच्छीमार उदरनिर्वाह करतात. शनिवारी, ते मासेमारी करण्यासाठी आले असता, तलावाच्या काठावर असंख्य मृत मासे आढळून आले. मत्सबीज टाकल्यानंतर ते सहा महिन्यानंतर निघायला लागते. मे महिन्यापासून मासे काढायला सुरुवात होते. दोन दिवसांपासून मासे मरत होते पण शनिवारी मोठ्या प्रमाणात मेलेले मासे आढळून आले. यामुळे मच्छीमार संस्थेचे आर्थिक नुकसान झाले आहे. ४० ते ६० क्विंटल माशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

असा सुरू झाला फॉलोअप...

घटनेची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना समजताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळवले. या दरम्यान, तहसीलदार शीतल राजपूत यांनाही माहिती देण्यात आली. आरोग्य अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी, त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना माहिती कळवली. थोड्याच वेळात प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी समन्वय साधून घटनास्थळी पंचनामा, नमुने संकलन आदी कार्यवाही पूर्ण केली. यावेळी पोलीस पाटील उपस्थित होते.

गावात सर्वेक्षण सुरू...

या घटनेनंतर आरोग्य विभागाच्या माध्यमातून तातडीने मण्यारखेडा गावात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पुढील आणखी दोन दिवस ते सुरू राहील. या दरम्यान विषबाधा, डायरियाची लक्षणे कोणात आढळून येतात का ? याची पाहणी केली जाणार आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना बाधा झाल्यास सुरुवातीला उलटी, जुलाब आदी लक्षणे आढळून येतात.

पाण्यापासून लांब रहा, दवंडी देत आवाहन

मेलेले मासे तलावाच्या काठावर आले होते. काही मुलांनी ते विकण्यासाठी गोळा केले होते. त्यांच्याकडून ते जप्त करण्यात आले आहेत. तलावातील पाणी वापरू नये. गुरांना पिऊ देऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने दवंडी देत गावात करण्यात आले आहे.

पंचनामा केला...

घटनास्थळी वेगवेगळ्या शासकीय विभागांनी समन्वय साधून पंचनामा केला. तलावातील पाणी वापरू नये. गुरांना पाजू नये, असे आवाहन मन्यारखेडा गावात दवंडी देऊन केले आहे, अशी माहिती तहसीलदार शीतल राजपूत यांनी दिली. 

दरवर्षी समस्या येते...

एमआयडीसीतून वाहत येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे दरवर्षी मण्यारखेडा तलावातील मासे मरतात. याबाबत प्रशासनाने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. या घटनेत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था चेअरमन बाळासाहेब सैंदाणे यांनी केली आहे.