शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

जळगावजवळील मण्यारखेडा तलावात असंख्य माशांचा मृत्यू, प्रशासनाकडून पंचनामा

By अमित महाबळ | Updated: June 15, 2024 19:55 IST

मण्यारखेडा तलावात आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था यांनी लाल परी, कतला, ब्रिगेड प्रकारातील मत्सबीज सोडले होते. तलावात मासेमारी करून मच्छीमार उदरनिर्वाह करतात.

अमित महाबळ

जळगाव : तालुक्यातील मण्यारखेडा तलावात अनेक माशांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, सकाळी उघडकीस आली. यामुळे खळबळ उडाली आहे. एमआयडीसीतून वाहून येणारे प्रदूषित पाणी, प्लास्टिक चटई उद्योगातील वेस्ट मटेरियल यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे, तर शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी समन्वयातून जागेवर पंचनामा करण्यासह मृत माशांचे व पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी संकलित केले आहेत.

मण्यारखेडा तलावात आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था यांनी लाल परी, कतला, ब्रिगेड प्रकारातील मत्सबीज सोडले होते. तलावात मासेमारी करून मच्छीमार उदरनिर्वाह करतात. शनिवारी, ते मासेमारी करण्यासाठी आले असता, तलावाच्या काठावर असंख्य मृत मासे आढळून आले. मत्सबीज टाकल्यानंतर ते सहा महिन्यानंतर निघायला लागते. मे महिन्यापासून मासे काढायला सुरुवात होते. दोन दिवसांपासून मासे मरत होते पण शनिवारी मोठ्या प्रमाणात मेलेले मासे आढळून आले. यामुळे मच्छीमार संस्थेचे आर्थिक नुकसान झाले आहे. ४० ते ६० क्विंटल माशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

असा सुरू झाला फॉलोअप...

घटनेची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना समजताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळवले. या दरम्यान, तहसीलदार शीतल राजपूत यांनाही माहिती देण्यात आली. आरोग्य अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी, त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना माहिती कळवली. थोड्याच वेळात प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी समन्वय साधून घटनास्थळी पंचनामा, नमुने संकलन आदी कार्यवाही पूर्ण केली. यावेळी पोलीस पाटील उपस्थित होते.

गावात सर्वेक्षण सुरू...

या घटनेनंतर आरोग्य विभागाच्या माध्यमातून तातडीने मण्यारखेडा गावात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पुढील आणखी दोन दिवस ते सुरू राहील. या दरम्यान विषबाधा, डायरियाची लक्षणे कोणात आढळून येतात का ? याची पाहणी केली जाणार आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना बाधा झाल्यास सुरुवातीला उलटी, जुलाब आदी लक्षणे आढळून येतात.

पाण्यापासून लांब रहा, दवंडी देत आवाहन

मेलेले मासे तलावाच्या काठावर आले होते. काही मुलांनी ते विकण्यासाठी गोळा केले होते. त्यांच्याकडून ते जप्त करण्यात आले आहेत. तलावातील पाणी वापरू नये. गुरांना पिऊ देऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने दवंडी देत गावात करण्यात आले आहे.

पंचनामा केला...

घटनास्थळी वेगवेगळ्या शासकीय विभागांनी समन्वय साधून पंचनामा केला. तलावातील पाणी वापरू नये. गुरांना पाजू नये, असे आवाहन मन्यारखेडा गावात दवंडी देऊन केले आहे, अशी माहिती तहसीलदार शीतल राजपूत यांनी दिली. 

दरवर्षी समस्या येते...

एमआयडीसीतून वाहत येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे दरवर्षी मण्यारखेडा तलावातील मासे मरतात. याबाबत प्रशासनाने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. या घटनेत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था चेअरमन बाळासाहेब सैंदाणे यांनी केली आहे.