शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

रेल्वेची संख्या वाढली; थांबे मात्र वाढेनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST

सचिन देव जळगाव : गेल्या महिन्यापासून शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यानंतर, रेल्वे प्रशासनातर्फे पॅसेंजर वगळता ९० टक्के एक्स्प्रेस गाड्या ...

सचिन देव

जळगाव : गेल्या महिन्यापासून शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यानंतर, रेल्वे प्रशासनातर्फे पॅसेंजर वगळता ९० टक्के एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. गाड्यांची संख्या वाढल्याने काही प्रमाणात प्रवाशांची गैरसोयही थांबली आहे; मात्र अनेक वर्षांपासून महत्त्वाच्या स्टेशनवर काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा नसल्यामुळे येथील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गाड्यांची संख्या वाढविल्यानंतर थांब्यांची संख्या वाढविण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

सध्या सुरू असलेल्या गाड्यांमध्ये अनेक गाड्यांना जळगाव स्टेशननंतर पाचोरा व चाळीसगाव येथे थांबा आहे; मात्र लांब पल्ल्याच्या असणाऱ्या गोवा एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, कर्नाटक एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस, गरिबरथ एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना या संबंधित गाड्यांनी बाहेरगावी प्रवास करायचा असल्यास, त्यांना जळगावला यावे लागत आहे. त्यामुळे या प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे या गाड्यांना थांबा मिळण्याबाबत प्रवासी संघटनांतर्फे अनेकदा रेल्वे प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे; मात्र इतक्या वर्षात यातील एकाही गाडीला संबंधित स्टेशनवर थांबा देण्यात आलेला नसल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

- हावडा एक्स्प्रेस

- सेवाग्राम एक्स्प्रेस

- महाराष्ट्र एक्स्प्रेस

- काशी एक्स्प्रेस

- विदर्भ एक्स्प्रेस

- महानगरी एक्स्प्रेस

इन्फो :

या ठिकाणी रेल्वे कधी थांबणार?

- जळगाव स्टेशननंतर पाचोरा रेल्वे स्टेशनवरून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची नेहमी वर्दळ असते; मात्र या स्टेशनवर सध्या सुरू असलेल्या गाड्यांपैकी मोजक्याच गाड्या थांबत आहेत. त्यामुळे या स्टेशनवरही गोवा, कर्नाटक, गीतांजली आदी एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची प्रवाशांमधून मागणी केली जात आहे.

- तसेच पाचोरानंतर चाळीसगाव रेल्वे स्टेशनवरूही प्रवाशांसह बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते; परंतु अनेक वर्षांपासून मागणी सुरू करूनही गोवा, कर्नाटक, गीतांजली, दुरंतो, हावडा सुपरफास्ट या गाड्यांना अद्यापही थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या गाड्यांना संबंधित स्टेशनवर थांबा देण्याची मागणी होत आहे.

इन्फो :

थांबा नसल्याने आम्हाला होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या असलेल्या गाड्यांना थांबा देण्यात आलेला नाही. यामुळे या ठिकाणाहून दिल्ली-गोवाकडे जायचे म्हटल्यास जळगावला जाऊन गाडी पकडावी लागते. त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होतो. तरी रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देणे गरजेचे आहे.

संदीप पाटे, प्रवासी.

जिल्ह्यात भुसावळ व जळगावनंतर चाळीसगाव स्टेशन मोठे आहे. रेल्वेला सध्या सुरू असलेल्या गाड्यांना बऱ्यापैकी उत्पन्नही चाळीसगावहून मिळत आहे; मात्र गोवा एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, कर्नाटक एक्स्प्रेस आदी महत्त्वाच्या गाड्यांना इतक्या वर्षांत अनेकदा मागणी करूनही थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे.

योगेश पाटील, प्रवासी.