शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आता गटबाजी सोडा आणि जरा शहराकडे बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

महापालिकेत सत्तांतर होऊन आता चार महिन्यांचा काळ झाला आहे. मात्र, जळगावकरांना मनपात भाजपची सत्ता असो वा शिवसेनेची, समस्या मात्र ...

महापालिकेत सत्तांतर होऊन आता चार महिन्यांचा काळ झाला आहे. मात्र, जळगावकरांना मनपात भाजपची सत्ता असो वा शिवसेनेची, समस्या मात्र कायम असतातच असे म्हणावे लागत आहे. कारण भ्रमनिराश करण्यात हे दोन्हीही सारखेच असल्याचा प्रत्यय आता जळगावकरांना येऊ लागला आहे. जळगावकरांनी स्पष्ट बहुमत देत मनपात भाजपला सत्ता दिली. मात्र, अंतर्गत गटबाजीने पोखरल्या गेलेल्या भाजपला लक्षवेधी कामे करता आली नाही. निधी आला तो खर्च करता आला नाही. त्यामुळे अडीच वर्षांत नागरिक भाजपला कंटाळून गेले होते. त्यात २७ नगरसेवकांनी भाजपविरोधात बंड पुकारून शिवसेनेची सत्ता महापालिकेत आणली. राज्यात व मनपातही सेनेची सत्ता आल्याने जळगावकरांना या बदलाकडून अपेक्षा होत्या. मात्र, गटबाजीचे ग्रहण भाजपप्रमाणे शिवसेनेतही वाढत आहे. बंडखोर नगरसेवक भाजपमध्ये होते आता शिवसेनेत गेले आहेत. मात्र, गटबाजीचे ग्रहण आता सेनेतही सुरू झाले आहे. त्याचा फटका जळगावकरांना बसत आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थाकडे लक्ष देण्यात गुंग असलेल्या या नगरसेवकांना जळगावकरांचा पूर्णपणे विसर पडलेला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महापालिकेत येणार असल्याचे माहीत पडताच जळगावकरांच्या थांबलेल्या विकासाला गती देण्यासाठी भरघोस निधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. कारण, मनपातील नगरसेवकांना शहराचा विकासापेक्षा इतरांच्या तक्रारी शिंदेकडे सांगण्यात जास्त रस होता. शहरातील रस्त्यांची समस्या बिकट झाली असताना त्याच्या तक्रारी या नगरसेवकांकडून नगरविकासमंत्र्यांकडे करण्यात आल्या नाहीत. तर शिंदे मनपात येतील आणि संपर्कप्रमुख, पालकमंत्री यांच्या तक्रारी त्यांच्याकडे करण्यावर नगरसेवकांचा भर होता. त्यामुळे गटबाजी वाढलेल्या या महापालिकेत आज जरी सेनेची सत्ता असली तरी स्वार्थापोटी जनतेला विसरणारे हे नगरसेवक उद्या शिवसेनेत राहतील की नाही ? अशी शंकाच शिंदेच्या मनात आली असेल, म्हणून शहराच्या समस्या आणि मनपाचे प्रश्न ऐकून शिंदे यांनी मुंबईत येण्याचा सूचना नगरसेवकांना केल्या आहेत. शहरातील समस्या वाढत आहेत. रस्ते, वाहतूककोंडी, धुळ, चिखल, पार्किंग, अतिक्रमण, तुंबलेल्या गटारी, घाणीचे साम्राज्य अशा समस्यांकडे आता नवग्रह मंडळातील नगरसेवक असो वा कट्टर शिवसैनिक नगरसेवक, आता जळगावकरांच्या समस्यांचे ग्रहण सोडवा, अन्यथा जळगावकर कोणताही पक्ष असो त्याला कायमचे ग्रहण लावतील.