शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

आता गटबाजी सोडा आणि जरा शहराकडे बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

महापालिकेत सत्तांतर होऊन आता चार महिन्यांचा काळ झाला आहे. मात्र, जळगावकरांना मनपात भाजपची सत्ता असो वा शिवसेनेची, समस्या मात्र ...

महापालिकेत सत्तांतर होऊन आता चार महिन्यांचा काळ झाला आहे. मात्र, जळगावकरांना मनपात भाजपची सत्ता असो वा शिवसेनेची, समस्या मात्र कायम असतातच असे म्हणावे लागत आहे. कारण भ्रमनिराश करण्यात हे दोन्हीही सारखेच असल्याचा प्रत्यय आता जळगावकरांना येऊ लागला आहे. जळगावकरांनी स्पष्ट बहुमत देत मनपात भाजपला सत्ता दिली. मात्र, अंतर्गत गटबाजीने पोखरल्या गेलेल्या भाजपला लक्षवेधी कामे करता आली नाही. निधी आला तो खर्च करता आला नाही. त्यामुळे अडीच वर्षांत नागरिक भाजपला कंटाळून गेले होते. त्यात २७ नगरसेवकांनी भाजपविरोधात बंड पुकारून शिवसेनेची सत्ता महापालिकेत आणली. राज्यात व मनपातही सेनेची सत्ता आल्याने जळगावकरांना या बदलाकडून अपेक्षा होत्या. मात्र, गटबाजीचे ग्रहण भाजपप्रमाणे शिवसेनेतही वाढत आहे. बंडखोर नगरसेवक भाजपमध्ये होते आता शिवसेनेत गेले आहेत. मात्र, गटबाजीचे ग्रहण आता सेनेतही सुरू झाले आहे. त्याचा फटका जळगावकरांना बसत आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थाकडे लक्ष देण्यात गुंग असलेल्या या नगरसेवकांना जळगावकरांचा पूर्णपणे विसर पडलेला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महापालिकेत येणार असल्याचे माहीत पडताच जळगावकरांच्या थांबलेल्या विकासाला गती देण्यासाठी भरघोस निधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. कारण, मनपातील नगरसेवकांना शहराचा विकासापेक्षा इतरांच्या तक्रारी शिंदेकडे सांगण्यात जास्त रस होता. शहरातील रस्त्यांची समस्या बिकट झाली असताना त्याच्या तक्रारी या नगरसेवकांकडून नगरविकासमंत्र्यांकडे करण्यात आल्या नाहीत. तर शिंदे मनपात येतील आणि संपर्कप्रमुख, पालकमंत्री यांच्या तक्रारी त्यांच्याकडे करण्यावर नगरसेवकांचा भर होता. त्यामुळे गटबाजी वाढलेल्या या महापालिकेत आज जरी सेनेची सत्ता असली तरी स्वार्थापोटी जनतेला विसरणारे हे नगरसेवक उद्या शिवसेनेत राहतील की नाही ? अशी शंकाच शिंदेच्या मनात आली असेल, म्हणून शहराच्या समस्या आणि मनपाचे प्रश्न ऐकून शिंदे यांनी मुंबईत येण्याचा सूचना नगरसेवकांना केल्या आहेत. शहरातील समस्या वाढत आहेत. रस्ते, वाहतूककोंडी, धुळ, चिखल, पार्किंग, अतिक्रमण, तुंबलेल्या गटारी, घाणीचे साम्राज्य अशा समस्यांकडे आता नवग्रह मंडळातील नगरसेवक असो वा कट्टर शिवसैनिक नगरसेवक, आता जळगावकरांच्या समस्यांचे ग्रहण सोडवा, अन्यथा जळगावकर कोणताही पक्ष असो त्याला कायमचे ग्रहण लावतील.