शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

...अब जलगाँव, धुलीया बाकी है !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 16:55 IST

गिरीश महाजन यांनी जामनेर राखले, तर जयकुमार रावल यांनी दोंडाईचा व शिंदखेडा पालिका खेचल्या. खान्देशातील दोन्ही मंत्री जळगाव, धुळे महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी काय रणनीती आखतात याची उत्सुकता आहे.

चार वर्षातील सत्तेनंतर भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी, मतभेद उफाळून आले आहेत. जळगावात महाजन, खडसे आणि पालकमंत्री असे तीन गट तयार झाले आहेत. तर धुळ्यात भामरे-रावल आणि गोटे असे दोन गट आहेत. पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची अशा गटातटात विभागणी झालेली आहे. मंत्र्यांचे कार्यक्रमदेखील गटातटातर्फे आयोजिले जातात. स्वपक्षाचे केंद्र व राज्य सरकार असताना विकासकामांना गती देण्यात यश आलेले नाही. ही सगळी आव्हाने भाजपापुढे आहेत.भाजपाची विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी या दोन्ही महापालिकांचे नेतृत्व एका व्यक्तीकडे देण्यात येते की, समिती नेमून सामूहिक निर्णय प्रक्रिया राबविली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, धुळे महानगरचे आमदार अनिल गोटे यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. जळगावात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि जळगाव महानगरचे आमदार सुरेश भोळे यांची भूमिका निर्णायक राहणार आहे.सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांमधील गटबाजीचे जाहीर प्रदर्शन घडविणाऱ्या दोन घटना या ठिकाणी नमूद करायला हव्यात. पहिली घटना गेल्या आठवड्यातील धुळ्याची आहे. भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी पांझरा नदीकिनारी रस्ते उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्या ठिकाणच्या झुलत्या पुलाचे भूमिपूजन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. मुनगंटीवारांसारखा ज्येष्ठ मंत्री धुळ्यात येत असताना जिल्ह्यातील केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे कार्यक्रमात दिसले नाही. गोटे यांनी दोघांना बोलावले नसावे, हे कारण त्यामागे असावे. डॉ.भामरे हे तर त्या दिवशी धुळ्यात होते, परंतु ते कार्यक्रमाकडे फिरकले नाही.दुसरी घटना गेल्या वर्षातील जामनेरची. राजस्व अभियान आणि विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. एकनाथराव खडसे, डॉ.गुरुमुख जगवाणी या भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे जळगावच्या विमानतळावर स्वागत केले, परंतु जामनेरच्या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरवली.गेल्या महिन्यात मुख्यमंत्री जळगाव आणि दीपनगरच्या कार्यक्रमाला आले नाही, याचे खरे कारण प्रकृती अस्वास्थ्य होते, की पक्षातील गटबाजीचे प्रदर्शन टाळणे होते, याविषयी माध्यमे व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली होती.पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तर मध्यममार्ग स्वीकारत खडसे-महाजन अशा दोन्ही गटांचे कार्यक्रम स्वीकारतात. खासदार रक्षा खडसे यांनी चोपड्यात दिव्यांगांसाठी शिबिर घेतले त्याला पाटील हजर राहिले, त्याच दिवशी महाजन गटाचे आमदार उन्मेष पाटील यांच्या चाळीसगावातील विज्ञान परिषदेच्या समारोपाला ते उपस्थित होते.मूळ मुद्दा असा आहे की, पक्षाची ही स्थिती असताना जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या महापालिका निवडणुका, धुळे व नंदुरबारच्या जिल्हा परिषदेची निवडणूक ही भाजपा एकसंघपणे कशी लढविणार आहे? चारही ठिकाणी भाजपा सत्तेत नाही. स्वबळावर सत्ता आणेल, अशी स्थिती नाही. शिवसेनेशी सख्य नाही, त्यामुळे युतीची चर्चा ‘जर-तर’मध्ये अडकणार आहे. मग ‘जामनेर तो झाँकी है, जलगाँव अब बाकी है’ अशी घोषणा देऊन भाजपाचे कार्यकर्ते काय साधत आहे, हा प्रश्न आहे.मुळात जामनेर आणि जळगावची तुलना होऊ शकत नाही. जळगाव हे सहा लाख लोकसंख्येचे शहर आहे. जामनेरात एकूण मतदार ३५ हजार आहेत. त्यापैकी २७ हजार मतदारांनी मतदान केले. तर जळगाव महापालिकेचा एक वॉर्ड हा कमाल २६ हजार मतदार संख्येचा आहे. नेत्यांचा उदोउदो करीत स्वत:च्या निष्ठेचे जाहीर प्रदर्शन करणारा संप्रदाय हल्ली भाजपामध्ये वाढीस लागला आहे, त्यापैकी काहींचा ‘झाँकी-बाकी’चा प्रयत्न आहे.पक्षातील मतभेद हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा विकासकामांचा आहे. अनिल गोटे आणि सुरेश भोळे या दोन्ही आमदारांचा मतदारसंघ हा महापालिका कार्यक्षेत्राचा आहे. स्थानिक विकास निधीतील कामे शहरात होणार आहेत. त्यासोबतच केंद्र व राज्य सरकारकडून निधी खेचून काही योजना आणणे या आमदारांना शक्य होते. याबाबतीत गोटे उजवे ठरले. धाडसी निर्णय घेत, प्रसंगी टीका, विविध घटकांचा रोष ओढवून घेत त्यांनी विकासकामे रेटून नेली. पांझरा नदी किनारी सुरू असलेले रस्त्यांचे काम, अतिक्रमण हटविण्यात घेतलेला पुढाकार ही त्यांची जमेची बाजू आहे. याउलट आमदार भोळे यांची पहिली टर्म असल्याने नवखेपण अद्याप गेलेले नाही. समांतर रस्त्यांचा प्रश्न, गाळेधारकांचा विषय प्रलंबित आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या २५ कोटी रुपयांमधील एक पैशाचे काम अद्याप शहरात झालेले नाही. दोन्ही ठिकाणी आमदारांचे महापालिकेतील सत्ताधारी मंडळींशी वाजत असते, पण त्याचा परिणाम विकासकामांवर होऊ नये अशी अपेक्षा असताना नेमके उलटे घडत आहे.गेल्या वेळी धुळ्यात गोटे यांनी लोकसंग्रामतर्फे सर्व महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या, पण अवघी एक जागा त्यांना मिळाली. तर जळगावात भाजपाच्या १४ जागा निवडून आल्या होत्या. विरोधी पक्षातील भाजपाची ही स्थिती पक्ष आता सत्तेत असल्याने बदलेल, असा कार्यकर्त्यांना विश्वास वाटत आहे. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. अर्थात अजून चार महिन्यांचा कालावधी हातात असल्याने दुरुस्तीला वाव आहे.काँग्रेसच्या वाटेवरजळगावात स्वतंत्र कार्यालय असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे जी.एम. फाउंडेशनच्या नावाने स्वतंत्र कार्यालय, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वतंत्र कार्यालय, आमदार सुरेश भोळे यांचे स्वतंत्र कार्यालय, तर खडसे ‘मुक्ताई’ या निवासस्थानी जनतेसाठी उपलब्ध असतात. प्रदेश पदाधिकारी आले की, केवळ कार्यालयात सगळे जमतात. धुळ्यात अशीच स्वतंत्र ठिकाणे आहेत.- मिलिंद कुलकर्णी

टॅग्स :JalgaonजळगावBJPभाजपा