शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

आता २ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 13:07 IST

मुख्यमंत्री फडणवीस : ‘अनुलोम’च्या उत्कृष्ट जनसेवकांचा सत्कार

जळगाव : गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियानात ‘अनुलोम’ संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. या संस्थेने पुढील वर्षी २ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.जैन हिल्स येथील कस्तुरबा गांधी सभागृहात रविवारी सकाळी अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात ‘अनुलोम’चा चौथा वार्षिक अनुलोम संगम सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, ‘अनुलोम’चे कार्यकारी अधिकारी अतुल वझे, पंकज पाठक व ‘अनुलोम’चे जनसेवक, भागसेवक, विस्तारक उपस्थित होते. उत्कृष्ट कार्य करणारे जनसेवक, भाग सेवक, विस्तारक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. नितीन खर्चे लिखित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू’ या पुस्तकाचा प्रा.डॉ. सुनील कुलकर्णी यांनी हिंदी भाषेत अनुवादित केलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय, जीवनदर्शन के विविध पैलू’ या पुस्तकाचे व अनुलोमच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.कॅलिफोर्नियापेक्षा कोकण समृध्दमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोकणातील पर्यटन वाढावे म्हणून गेल्या पाच वर्षात विविध पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. रायगड जिल्हा औद्योगिक विकासाच्या अग्रभागी आणण्यात आला. ‘नैना’च्या माध्यमातून तिसरी मुंबई आकारास येत आहे. पालघर व ठाणे या भागात आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे या भागाचा आरोग्य निर्देशांक उंचावला असून कुपोषण मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. कोकणचा कॅलिफोर्निया केव्हा होणार? असा प्रश्न एका जनसेवकाने केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, कॅलिफोर्नियापेक्षा कोकण समृध्द आहे.शेती व्यवसाय, सेवा, उद्योग क्षेत्राच्या विस्तारास संधीतसेच येत्या काळात १०० लाख कोटी रुपये खर्चून पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यासाठी पुढील पाच वर्षे महत्वाची असल्याचे ते म्हणाले.जिल्ह्यात ३ लाख ७४ हजार घनमीटर गाळ काढलाअनुलोम संस्थेने शासनाच्या सहकार्याने गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ६५ कामे केली. त्यापैकी ५७ कामे जेसीबी तर ७ कामे पोकलेनच्या सहाय्याने करण्यात आली. यापैकी ४७ कामे पूर्ण झाली असून १८ कामे सुरू आहेत. याद्वारे आतापर्यंत ३ लाख ७४ हजार २६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. या गाळाच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टरच्या १ लाख ३३ हजार ५२६ तर हायवाच्या ३०१ फेऱ्या झाल्या. त्यासाठी ५३ हजार ४१८ लिटर डिझेल लागले. तर जेसीबी व पोकलेनसाठी ३५ लाख ७१ हजार १६५ रूपये भाडे लागले आहे. एकूण १ हजार ३३५ एकरवर ही गाळाची माती टाकण्यात आली. त्याचा ६८० शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव