शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

आता २ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 13:07 IST

मुख्यमंत्री फडणवीस : ‘अनुलोम’च्या उत्कृष्ट जनसेवकांचा सत्कार

जळगाव : गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियानात ‘अनुलोम’ संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. या संस्थेने पुढील वर्षी २ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.जैन हिल्स येथील कस्तुरबा गांधी सभागृहात रविवारी सकाळी अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात ‘अनुलोम’चा चौथा वार्षिक अनुलोम संगम सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, ‘अनुलोम’चे कार्यकारी अधिकारी अतुल वझे, पंकज पाठक व ‘अनुलोम’चे जनसेवक, भागसेवक, विस्तारक उपस्थित होते. उत्कृष्ट कार्य करणारे जनसेवक, भाग सेवक, विस्तारक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. नितीन खर्चे लिखित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू’ या पुस्तकाचा प्रा.डॉ. सुनील कुलकर्णी यांनी हिंदी भाषेत अनुवादित केलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय, जीवनदर्शन के विविध पैलू’ या पुस्तकाचे व अनुलोमच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.कॅलिफोर्नियापेक्षा कोकण समृध्दमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोकणातील पर्यटन वाढावे म्हणून गेल्या पाच वर्षात विविध पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. रायगड जिल्हा औद्योगिक विकासाच्या अग्रभागी आणण्यात आला. ‘नैना’च्या माध्यमातून तिसरी मुंबई आकारास येत आहे. पालघर व ठाणे या भागात आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे या भागाचा आरोग्य निर्देशांक उंचावला असून कुपोषण मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. कोकणचा कॅलिफोर्निया केव्हा होणार? असा प्रश्न एका जनसेवकाने केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, कॅलिफोर्नियापेक्षा कोकण समृध्द आहे.शेती व्यवसाय, सेवा, उद्योग क्षेत्राच्या विस्तारास संधीतसेच येत्या काळात १०० लाख कोटी रुपये खर्चून पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यासाठी पुढील पाच वर्षे महत्वाची असल्याचे ते म्हणाले.जिल्ह्यात ३ लाख ७४ हजार घनमीटर गाळ काढलाअनुलोम संस्थेने शासनाच्या सहकार्याने गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ६५ कामे केली. त्यापैकी ५७ कामे जेसीबी तर ७ कामे पोकलेनच्या सहाय्याने करण्यात आली. यापैकी ४७ कामे पूर्ण झाली असून १८ कामे सुरू आहेत. याद्वारे आतापर्यंत ३ लाख ७४ हजार २६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. या गाळाच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टरच्या १ लाख ३३ हजार ५२६ तर हायवाच्या ३०१ फेऱ्या झाल्या. त्यासाठी ५३ हजार ४१८ लिटर डिझेल लागले. तर जेसीबी व पोकलेनसाठी ३५ लाख ७१ हजार १६५ रूपये भाडे लागले आहे. एकूण १ हजार ३३५ एकरवर ही गाळाची माती टाकण्यात आली. त्याचा ६८० शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव