शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

आता २ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 13:07 IST

मुख्यमंत्री फडणवीस : ‘अनुलोम’च्या उत्कृष्ट जनसेवकांचा सत्कार

जळगाव : गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियानात ‘अनुलोम’ संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. या संस्थेने पुढील वर्षी २ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.जैन हिल्स येथील कस्तुरबा गांधी सभागृहात रविवारी सकाळी अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात ‘अनुलोम’चा चौथा वार्षिक अनुलोम संगम सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, ‘अनुलोम’चे कार्यकारी अधिकारी अतुल वझे, पंकज पाठक व ‘अनुलोम’चे जनसेवक, भागसेवक, विस्तारक उपस्थित होते. उत्कृष्ट कार्य करणारे जनसेवक, भाग सेवक, विस्तारक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. नितीन खर्चे लिखित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू’ या पुस्तकाचा प्रा.डॉ. सुनील कुलकर्णी यांनी हिंदी भाषेत अनुवादित केलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय, जीवनदर्शन के विविध पैलू’ या पुस्तकाचे व अनुलोमच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.कॅलिफोर्नियापेक्षा कोकण समृध्दमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोकणातील पर्यटन वाढावे म्हणून गेल्या पाच वर्षात विविध पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. रायगड जिल्हा औद्योगिक विकासाच्या अग्रभागी आणण्यात आला. ‘नैना’च्या माध्यमातून तिसरी मुंबई आकारास येत आहे. पालघर व ठाणे या भागात आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे या भागाचा आरोग्य निर्देशांक उंचावला असून कुपोषण मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. कोकणचा कॅलिफोर्निया केव्हा होणार? असा प्रश्न एका जनसेवकाने केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, कॅलिफोर्नियापेक्षा कोकण समृध्द आहे.शेती व्यवसाय, सेवा, उद्योग क्षेत्राच्या विस्तारास संधीतसेच येत्या काळात १०० लाख कोटी रुपये खर्चून पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यासाठी पुढील पाच वर्षे महत्वाची असल्याचे ते म्हणाले.जिल्ह्यात ३ लाख ७४ हजार घनमीटर गाळ काढलाअनुलोम संस्थेने शासनाच्या सहकार्याने गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ६५ कामे केली. त्यापैकी ५७ कामे जेसीबी तर ७ कामे पोकलेनच्या सहाय्याने करण्यात आली. यापैकी ४७ कामे पूर्ण झाली असून १८ कामे सुरू आहेत. याद्वारे आतापर्यंत ३ लाख ७४ हजार २६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. या गाळाच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टरच्या १ लाख ३३ हजार ५२६ तर हायवाच्या ३०१ फेऱ्या झाल्या. त्यासाठी ५३ हजार ४१८ लिटर डिझेल लागले. तर जेसीबी व पोकलेनसाठी ३५ लाख ७१ हजार १६५ रूपये भाडे लागले आहे. एकूण १ हजार ३३५ एकरवर ही गाळाची माती टाकण्यात आली. त्याचा ६८० शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव