शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

मांडवेदिगरवासीयांना दोन हजार एकर जमीन खाली करण्याच्या मिळाल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:04 IST

भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर या बंजारा वस्तीतील तब्बल दोन हजार एकर जमीन शासन जमा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चांगलाच धसका घेतला आहे. या धसक्यामुळे रविवारी एक महिला व एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांमध्ये उडाली खळबळधसका घेतल्याने दोघांचा मृत्यू : प्रशासन अनभिज्ञ

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील मांडवेदिगर या बंजारा वस्तीतील तब्बल दोन हजार एकर जमीन शासन जमा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चांगलाच धसका घेतला आहे. या धसक्यामुळे रविवारी एक महिला व एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत प्रशासकीय अधिकारी मात्र अद्यापही अनभिज्ञ आहे.मांडवेदिगर, भिलमळी व मुसाळतांडा अशी बंजारा व भिल्ल समाजाची तीन गावांची एक किलोमीटर अंतरात वस्ती आहे. तिन्ही तांड्यांची लोकसंख्या जवळपास पाच हजारावर पोहोचली आहे. गेल्या दीडशे वर्षांपूर्वीची ही वस्ती असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दीडशे वर्षांपासून हा समाज या परिसरातील शेतीवर अवलंबून आहे. बहुतांशी जमीन ही शेतकऱ्यांनी विकत घेतली. त्याचा खरेदी-विक्रीचा टॅक्स व शेतसाराही ग्रामस्थ दीडशे वर्षांपासून भरत आहे. त्यांच्याकडे खरेदी खत आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशाने शासनाने गेल्या काही दिवसांपासून ही जमीन शासन जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी ग्रामस्थांना नुकतीच जमीन व गावातील घरे खाली करण्यासंदर्भात नोटिसा दिल्या आहे.पालकमंत्र्यांकडूनही ग्रामस्थ आले आहे खाली हातग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांच्याकडेही न्यायासाठी प्रयत्न केले. मात्र हा प्रश्न न्यायालयीन व न्यायप्रविष्ट असल्यामुळे ग्रामस्थांना येथूनही खाली हात यावे लागले, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे आता न्याय कुणाकडे मागावाल असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उपस्थित झाला आहे?दरम्यान, ३ रोजी सुमारे शंभर लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जळगाव येथे धाव घेतली होती. मात्र जिल्हाधिकाºयांची भेट झाली नसल्यामुळे ग्रामस्थ परत आले आहे. त्यात दुसºयाच दिवशी धसक्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.प्रांताधिकाºयांनी सांगितले अपील दाखल कराप्रांताधिकारी चिंचकर यांनी या जमिनी शासन जमा करण्याची प्रक्रिया केल्यानंतर जिल्हाधिकाºयांकडे अपील करा, अशी सूचना केली आहे. अपील करण्यास गावकºयांना तब्बल १५ ते २० लाख रुपये खर्च येणार आहे. अगोदरच गोरगरीब व भटका-विमुक्त समाज एवढा खर्च करणार कुठून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात शासनाने ही कारवाई केल्यामुळे ग्रामस्थांनी जावे कुठे व राहावे कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे .दोघांच्या मृत्यूनंतर गाव झाले भयभीतशासन तब्बल दोन हजार एकर जमीन ताब्यात घेणार असल्यामुळे तिन्ही गावे संपूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. याचा धसका घेऊन रविवारी सोदरीबाई मोरसिंग पवार (वय ५५) यांचा पहाटे चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर ग्रामस्थ गावात येत नाही, तोपर्यंत अजमल सदू पवार (वय ३०) यांचाही मृत्यू झाला. पवार यांचा मुलगा त्यांना घर खाली करण्यासंदर्भात आलेली नोटीस वाचून दाखवत असताना पवार खाली कोसळले व त्याचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अजमल पवार यांच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.जमीन खाली करण्यासंदर्भात हायकोटार्चा निकाल -प्रांताधिकारी चिंचकरमांडवेदिगर येथील जमीन ही देवस्थानाची आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात एक याचिका दाखल होती. यावेळी कोर्टाने ही जमीन खाली करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाप्रमाणे ही जमीन खाली करण्यासंदर्भात मी नोटीस दिली आहे. त्याचप्रमाणे मी संबंधितांना जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल करण्याचेही त्यांनी सुचवले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ