शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
4
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
5
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
6
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
7
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
8
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
9
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
10
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
11
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
12
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
13
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
14
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
15
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
16
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
17
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
18
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
19
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
20
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी

मांडवेदिगरवासीयांना दोन हजार एकर जमीन खाली करण्याच्या मिळाल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:04 IST

भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर या बंजारा वस्तीतील तब्बल दोन हजार एकर जमीन शासन जमा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चांगलाच धसका घेतला आहे. या धसक्यामुळे रविवारी एक महिला व एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांमध्ये उडाली खळबळधसका घेतल्याने दोघांचा मृत्यू : प्रशासन अनभिज्ञ

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील मांडवेदिगर या बंजारा वस्तीतील तब्बल दोन हजार एकर जमीन शासन जमा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चांगलाच धसका घेतला आहे. या धसक्यामुळे रविवारी एक महिला व एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत प्रशासकीय अधिकारी मात्र अद्यापही अनभिज्ञ आहे.मांडवेदिगर, भिलमळी व मुसाळतांडा अशी बंजारा व भिल्ल समाजाची तीन गावांची एक किलोमीटर अंतरात वस्ती आहे. तिन्ही तांड्यांची लोकसंख्या जवळपास पाच हजारावर पोहोचली आहे. गेल्या दीडशे वर्षांपूर्वीची ही वस्ती असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दीडशे वर्षांपासून हा समाज या परिसरातील शेतीवर अवलंबून आहे. बहुतांशी जमीन ही शेतकऱ्यांनी विकत घेतली. त्याचा खरेदी-विक्रीचा टॅक्स व शेतसाराही ग्रामस्थ दीडशे वर्षांपासून भरत आहे. त्यांच्याकडे खरेदी खत आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशाने शासनाने गेल्या काही दिवसांपासून ही जमीन शासन जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी ग्रामस्थांना नुकतीच जमीन व गावातील घरे खाली करण्यासंदर्भात नोटिसा दिल्या आहे.पालकमंत्र्यांकडूनही ग्रामस्थ आले आहे खाली हातग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांच्याकडेही न्यायासाठी प्रयत्न केले. मात्र हा प्रश्न न्यायालयीन व न्यायप्रविष्ट असल्यामुळे ग्रामस्थांना येथूनही खाली हात यावे लागले, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे आता न्याय कुणाकडे मागावाल असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उपस्थित झाला आहे?दरम्यान, ३ रोजी सुमारे शंभर लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जळगाव येथे धाव घेतली होती. मात्र जिल्हाधिकाºयांची भेट झाली नसल्यामुळे ग्रामस्थ परत आले आहे. त्यात दुसºयाच दिवशी धसक्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.प्रांताधिकाºयांनी सांगितले अपील दाखल कराप्रांताधिकारी चिंचकर यांनी या जमिनी शासन जमा करण्याची प्रक्रिया केल्यानंतर जिल्हाधिकाºयांकडे अपील करा, अशी सूचना केली आहे. अपील करण्यास गावकºयांना तब्बल १५ ते २० लाख रुपये खर्च येणार आहे. अगोदरच गोरगरीब व भटका-विमुक्त समाज एवढा खर्च करणार कुठून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात शासनाने ही कारवाई केल्यामुळे ग्रामस्थांनी जावे कुठे व राहावे कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे .दोघांच्या मृत्यूनंतर गाव झाले भयभीतशासन तब्बल दोन हजार एकर जमीन ताब्यात घेणार असल्यामुळे तिन्ही गावे संपूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. याचा धसका घेऊन रविवारी सोदरीबाई मोरसिंग पवार (वय ५५) यांचा पहाटे चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर ग्रामस्थ गावात येत नाही, तोपर्यंत अजमल सदू पवार (वय ३०) यांचाही मृत्यू झाला. पवार यांचा मुलगा त्यांना घर खाली करण्यासंदर्भात आलेली नोटीस वाचून दाखवत असताना पवार खाली कोसळले व त्याचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अजमल पवार यांच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.जमीन खाली करण्यासंदर्भात हायकोटार्चा निकाल -प्रांताधिकारी चिंचकरमांडवेदिगर येथील जमीन ही देवस्थानाची आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात एक याचिका दाखल होती. यावेळी कोर्टाने ही जमीन खाली करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाप्रमाणे ही जमीन खाली करण्यासंदर्भात मी नोटीस दिली आहे. त्याचप्रमाणे मी संबंधितांना जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल करण्याचेही त्यांनी सुचवले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ