शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ना शाळा, ना परीक्षा; साडेआठ लाख विद्यार्थी पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने हे शैक्षणिक वर्ष सुध्दा वाया जाते की काय? ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने हे शैक्षणिक वर्ष सुध्दा वाया जाते की काय? अशी भीती मनामध्ये असताना, शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी दहावी व बारावीची परीक्षा सुध्दा रद्द झाली. परिणामी, जळगाव जिल्ह्यातील सुमारे ८ लाख ५३ हजार विद्यार्थी विनापरीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. कोरोना पावल्याने मुले खूश आहेत, पण, मुलांचा पुरेसा अभ्यास न झाल्यामुळे पालक चिंतेत आहेत.

कोरोना विषाणूने हाहाकार माजविल्यानंतर गतवर्षी मार्च महिन्यात शाळा, महाविद्यालये बंद झाली. कोरोनाचा संसर्ग कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बोलविणे शक्य नसल्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर ही परीक्षा होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. कालांतराने या परीक्षा सुध्दा पुढे ढकलण्यात आल्या. परंतु, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची व मृत्यू होणाऱ्यांची संख्या पाहता, या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या. आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. नववी व अकरावीची देखील काही शाळा, महाविद्यालयांकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली.

शहरी व ग्रामीण

शहरी भागात ऑनलाइन शिक्षणाला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र वर्षभरात पाहायला मिळाले. मात्र, याच्या उलट ग्रामीण भागात पाहायला मिळाले. अपुऱ्या सुविधांमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागले. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा नाही, अशा सुमारे लाखाच्या वर विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिल्याची बाब शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आली होती..

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे

ऑफलाइन शिक्षणासाठी शाळा आणि महाविद्यालयात जाणे आवश्यक आहे. दररोज घराबाहेर जाण्यात वेळ, ऊर्जा आणि पैशाचे नुकसान देखील होते. घरी ऑनलाइन शिक्षण मिळवल्याने संसाधनांचा खर्च वाचतो आणि वेळ व शक्तीही वाचते. जर ऑनलाइन वर्गाच्या वेळी विद्यार्थ्याला एखादा मुद्दा स्पष्टपणे समजला नसेल, तर तो शिक्षकांना पुन्हा तो मुद्दा सांगण्यास सांगू शकतो. याशिवाय विद्यार्थ्याला कोणताही टॉपिक जर समजत नसेल, तर तो रेकॉर्ड केलेल्या लेक्चरला पुन्हा पाहू शकतो. ऑनलाईन शिक्षणाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, विद्यार्थी देशातील व परदेशातील कोणत्याही संस्थेचे शिक्षण मिळवू शकेल. ऑनलाईन शिक्षणाद्वारेच विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास पूर्ण केला. घरातच शिक्षण मिळवून ती कोरोनाच्या धोक्यातूनही वाचली आणि शाळा व महाविद्यालयात जाण्याचा त्रास व खर्च वाचला. शहरात मिळणारे दर्जेदार शिक्षण गावातील मुलांना देखील मिळत आहे.

ऑनलाईन शिक्षणाचे तोटे...

ऑनलाईन शिक्षणाचे एक नुकसान असे आहे की, देशात बऱ्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असते आणि म्हणून ते एवढा महाग मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊ शकत नाहीत आणि म्हणून मागासलेल्या क्षेत्रात विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहतात़. तसेच असे बरेच भाग असतात, जिथे नेटवर्कला अडचण येते, अशा वेळेस विद्यार्थ्यांना अडचण येत असते. मोबाइल किंवा संगणकासमोर जास्त बसल्याने मुलांना डोळ्याला आणि कानाला त्रास होऊ शकतो. मोबाईलवर अभ्यास असल्यामुळे मुलांचे मन विचलित होऊ शकते. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची कमतरता निर्माण होते. घरी बसून शिक्षण होत असल्याने ते मित्र-मैत्रिणींना भेटू शकत नाहीत आणि यामुळे एकलकोंडे होण्याची भीती वाढते.

------------

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा : १८२८

खासगी अनुदानित शाळा : ९६२

खासगी विनाअनुदानित शाळा : १५६

०००००००००००००

एकूण विद्यार्थी

पहिली : ७६५१४

दुसरी : ७९३१३

तिसरी : ७७९१८

चौथी : ८००५०

पाचवी : ७८८२८

सहावी : ७७३११

सातवी : ७७६७७

आठवी : ७६३८५

नववी : ७६३५८

दहावी : ५८३१७

अकरावी : ४५८९४

बारावी : ४९४०३