शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

घोषणा नको, अंमलबजावणी व्हावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 23:52 IST

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी  असोदा येथील बहिणाबाई चौधरी यांच्या जुन्या घराची खरेदी करुन, त्यांच्या घराला स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्दे विश्लेषणबहिणाबाईंचे स्मारक खान्देशात आनंद

सचिन देवजळगाव : पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी  असोदा येथील बहिणाबाई चौधरी यांच्या जुन्या घराची खरेदी करुन, त्यांच्या घराला स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घरामुळे बहिणाबाईच्या आठवणी कायम स्वरुपी जिवंत राहणार असून,स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केली असली तरी, त्याची अंमलबजावणीदेखील लवकर करण्याची मागणी जोर धरु लागलीअहे. इतकेच नव्हे तर सध्या बहिणाबाईंच्या घरात राहत असलेल्या सरोदे कुटुंबियांनीदेखील स्मारकासाठी घर देण्यासाठी राजी झाले असून, लवकरात लवकर शासनाने घर खरेदी करण्याची मागणी केली आहे.आपल्या कवितांमधुन जीवनाचे तत्वज्ञान शिकविणाºया व खान्देशचे नाव जगाच्या कानाकोपºयात नेणाºया कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिल्यानंतर पुन्हा एकदा बहिणाबाईच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. विद्यापीठाला त्यांचे नाव मिळाल्यानंतर सर्वत्र फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यानंतर पुन्हा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी असोदा येथील बहिणाबाईच्या जन्मघर खरेदी करुन, त्या घराला स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर, पुन्हा एकदा खान्देशवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने आता हे घर लवकर खरेदी करुन, स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी खान्देशवासियांतर्फे करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर  बहिणाबाई चौधरी यांचे  घर खरेदी केलेल्या गावातील नागरिक सिताराम राजाराम सरोदे यांनीदेखील  बहिणाबाईच्या स्मारकासाठी घर विक्री करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यांनी१९६२ मध्ये कवयित्री  बहिणाबाई यांच्या नातलगांपासूनअवघ्या ६ हजार रुपयांत घर खरेदी केले होते.  काळानुरुप रस्त्यांची उंची वाढल्याने,  घरदेखील रस्त्याच्या समान आले आहे. मात्र, दीडशे वर्षानंतरही घराची स्थिती जैसे थे मजबूत आहे. संपूर्ण घर सागवानी लाकडाने सागवानाने उभारले असून,  घराचे बांधकाम दुमजली आहे. खाली तीन खोल्या आणि वरच्या मजल्यावर दोन खोल्या आहेत. घरातील सºयांच्या लाकडी भीमवर आकर्षक कलाकृती साकारली आहे. घराच्या भीतींदेखील मजबूत आहेत. विशेष म्हणजे घरात पावसाळ््यात कुठेही  एक थेंबदेखील पाझरत नसल्याचे या घरात राहणाºया सरोदे कुटुंबियांनी सांगितले.  बहिणाबाईचा या घरात   १८८० मध्ये जन्म झाला असून, या आधीहीं या घराची उभारणी  करण्यात आली आहे.जाता जाता पर्यटन मंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे सर्वत्र स्वागत होत असून, आता स्थानिक नेत्यांनी याचा पाठपुरावा करुन, अंमलबजावणी करण्याची मागणी जिल्हावासियांतर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव