शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड नाही, भिकाऱ्यांना लस कशी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 20:51 IST

शहरातील रात्र निवारा केंद्रात ५९ भिकाऱ्यांची नोंद

जळगाव : शासनातर्फे आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करून, कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. सध्या बहुतांश नागरिकांकडे आधार कार्ड असले तरी रस्त्यांवर राहणाऱ्या बेघर नागरिकांकडे, भिकाऱ्यांकडे आधार कार्डसह इतर कुठलेही ओळखपत्र म्हणून ठोस पुरावा नाही. त्यामुळे या भिकाऱ्यांना कोरोनापासून बचावासाठी कोरोना लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी कशा पद्धतीने करणार? आणि लस कशी देणार? हे आव्हान आहे.कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला आहे. या टप्प्यामध्ये ६० वर्षांवरील नागरिकांना आणि अन्य व्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्यात येणार आहे. या लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. लसीकरणाच्या नोंदणीसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर करण्यात येत आहे. याद्वारे नागरिकांची आरोग्यविषयक माहिती भरून, लसीकरणाची तारीख, वेळ व ठिकाण सांगण्यात येत आहे. ही सर्व प्रक्रिया लसीकरणासाठी असताना, ज्यांच्याकडे कुठलेही ओळखपत्र नाही, त्यांची जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने नोंदणी करणार? आणि त्यांना कधी लस मिळणार? याबाबत शासनातर्फे कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. शहरातील मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात एका खाजगी संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत महिला व पुरुषांसह ५९ बेघर आढळून आले आहेत. यातील एकाही व्यक्तीकडे आधार कार्डसह इतर कुठलेही ओळखपत्र नसल्याचे मनपाच्या शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील यांनी सांगितले.

शहरातील भिकारी५९बेघर निवाऱ्यात राहणाऱ्यांची संख्या

५९महिला - ३७पुरुष - २२मनपा प्रशासनाने आधार कार्ड काढले तर होणार लसीकरण- केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी सक्तीची केली आहे. यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. मात्र, मनपा प्रशासनाने ठरविले, तर या निवारा केंद्रातील नागरिकांचे आधार कार्ड काढून लसीकरण करता येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले.- मनपा प्रशासनाने एकाचवेळी सर्व नागरिकांचे आधार कार्ड काढून, त्या नंबरद्वारे कोरोना लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी करता येईल.- नोंदणी केल्यानंतर शासनाच्या निकषामध्ये पात्र ठरत असलेल्या येथील सर्व नागरिकांचे एकाच दिवशी लसीकरण केले जाणार असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.बेघर नागरिकांची स्टेशन परिसरात सर्वाधिक संख्या- मनपाच्या रात्र निवारा केंद्रातर्फे गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात सर्वाधिक बेघर नागरिकांची संख्या जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आली आहे.- तसेच नवीन बस स्टॅण्ड, जिल्हा रुग्णालय, टॉवर चौक, गोलाणी मार्केट परिसर व शहरातील विविध व्यापारी संकुलांमध्ये बेघर नागरिकांचे वास्तव्य आढळून आले. हे बेघर नागरिक दिवसा शहरातील विविध भागांत फिरून उदरनिर्वाह करतात व रात्री पुन्हा याच ठिकाणी मुक्काम करीत असल्याचे सांगण्यात आले.- तसेच या सर्वेक्षणात जळगाव शहरात स्वत:चे घर, नातलग असतानाही काही नागरिक घर सोडून कधी बस स्टॅण्डवर तर कधी रेल्वे स्टेशनवर राहत असल्याचे आढळून आले. यातील काही नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना घरी पाठविण्यात आले असल्याचे रात्र निवारा केंद्र प्रशासनातर्फे सांगण्यात आले.केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे शहरात संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रात शहरातील विविध भागातील बेघरांचा शोध घेऊन, त्यांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यांना घराप्रमाणे चहा, नाष्टा, जेवण व इतर सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येत असून, सध्या या ठिकाणी ५९ बेघर आहेत.- दिलीप चोपडा, प्रकल्प प्रमुख, केशव स्मृती प्रतिष्ठान

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डJalgaonजळगाव