शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

नऊ वर्षांपासून गिरणा पुलाची दुरुस्तीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:25 IST

महामार्गावरील पूल वाहतुकीसाठी धोकदायक ; दोन महिन्यांनी तपासणी करणे गरजेचे0

जळगाव : राष्टÑीय महामार्गालगत बांभोरी येथे गिरणा नदीवरील पुलाची ९ वर्षांपासून दुरुस्तीच झाली नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकेदायक झाला आहे. दुरुस्तीअभावी पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी कठडे देखील तुटले आहे. राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या दुर्लक्षामुळे या पुलावर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे.राष्टÑीय महामार्ग क्रमांक ६ लगत गिरणा नदीवर असलेल्या पुलाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ‘नही’ च्या दुर्लक्षामुळे या पुलावर प्रचंड खड्डे तयार झाले आहेत. अनेक ठिकाणी दोन पॅचमधून थेट गिरणेचे पात्र दिसून येत आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती न झाल्यास पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या पुलावरून दररोज दिवसरात्र हजारो वाहने ये-जा करतात. याबाबत अनेक नागरिकांकडून संबधित विभागाकडून पुलाच्या दुरस्तीबाबत निवेदने पत्रव्यवहार झाले आहेत. ‘नही’ प्रशासनाला मात्र या पुलाच्या दुरुस्तीबाबत कोणतेही गांभिर्य दिसून येत नाही.दरम्यान, पुलाच्या गंभीर स्थितीबाबत ‘नही’ च्या अधिकाऱ्यांना विचारले असता पुलाला कोणताही धोका नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.तसेच पंधरा दिवस सलग पाऊस झाल्याने पुलावर खड्डे पडले असून, लवकरच खड्डे दुरुस्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ‘लोकमत’ ने पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली असता पुलाला अनेक खड्डे पडलेले, तसेच कठडे तुटलेले आढळले.२५ टनाचे बंधन असताना ५० टनाची होतेय वाहतूक- या पुलाचे काम १९८० मध्ये करण्यात आले. पुलावरून एकाच वेळी २० ते २५ टन इतका लोड असणे आवश्यक होते. कालांतराने वाहतुकीची संख्या वाढत जात असल्याने सध्यस्थितीस पुलावरून ४० ते ५० टन इतका लोड पडत आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून उपाययोजना होणे अपेक्षीत आहे.- या पुलाची दर दोन महिन्यांनी तपासणी होणे गरजेचे असताना ती तपासणी देखील प्रशासनाकडून केली जात नाही. दरम्यान, मान्सूनच्या आधी समितीकडून पाहणी करण्यात आल्याची माहिती ‘नही’च्या अधिकाऱ्यांनी दिली होती. तसेच पावसाळ्यानंतर पुन्हा समितीकडून पाहणी होणार असल्याचे सांगण्यात आले.२०१० मध्ये झाली शेवटची दुरुस्तीहा पुल आधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्यावेळी २०१० मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. पुलाची दर दोन वर्षात दुरुस्ती करणे गरजेचे होते. चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यानंतर २०१४ मध्ये हा पुल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘नही’कडे हस्तांतर करण्यात आला. ‘नही’कडून एक दाही पुलाची दुरुस्तीतर सोडाच खड्डे देखील दुरुस्त करण्यात आलेले नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव