शहरं
Join us  
Trending Stories
1
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
2
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
3
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
4
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
5
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
6
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
7
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
8
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
9
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
10
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
11
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
12
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
13
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
14
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
15
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
16
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
17
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
18
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
19
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
20
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या

नऊ वर्षांपासून गिरणा पुलाची दुरुस्तीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:25 IST

महामार्गावरील पूल वाहतुकीसाठी धोकदायक ; दोन महिन्यांनी तपासणी करणे गरजेचे0

जळगाव : राष्टÑीय महामार्गालगत बांभोरी येथे गिरणा नदीवरील पुलाची ९ वर्षांपासून दुरुस्तीच झाली नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकेदायक झाला आहे. दुरुस्तीअभावी पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी कठडे देखील तुटले आहे. राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या दुर्लक्षामुळे या पुलावर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे.राष्टÑीय महामार्ग क्रमांक ६ लगत गिरणा नदीवर असलेल्या पुलाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ‘नही’ च्या दुर्लक्षामुळे या पुलावर प्रचंड खड्डे तयार झाले आहेत. अनेक ठिकाणी दोन पॅचमधून थेट गिरणेचे पात्र दिसून येत आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती न झाल्यास पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या पुलावरून दररोज दिवसरात्र हजारो वाहने ये-जा करतात. याबाबत अनेक नागरिकांकडून संबधित विभागाकडून पुलाच्या दुरस्तीबाबत निवेदने पत्रव्यवहार झाले आहेत. ‘नही’ प्रशासनाला मात्र या पुलाच्या दुरुस्तीबाबत कोणतेही गांभिर्य दिसून येत नाही.दरम्यान, पुलाच्या गंभीर स्थितीबाबत ‘नही’ च्या अधिकाऱ्यांना विचारले असता पुलाला कोणताही धोका नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.तसेच पंधरा दिवस सलग पाऊस झाल्याने पुलावर खड्डे पडले असून, लवकरच खड्डे दुरुस्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ‘लोकमत’ ने पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली असता पुलाला अनेक खड्डे पडलेले, तसेच कठडे तुटलेले आढळले.२५ टनाचे बंधन असताना ५० टनाची होतेय वाहतूक- या पुलाचे काम १९८० मध्ये करण्यात आले. पुलावरून एकाच वेळी २० ते २५ टन इतका लोड असणे आवश्यक होते. कालांतराने वाहतुकीची संख्या वाढत जात असल्याने सध्यस्थितीस पुलावरून ४० ते ५० टन इतका लोड पडत आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून उपाययोजना होणे अपेक्षीत आहे.- या पुलाची दर दोन महिन्यांनी तपासणी होणे गरजेचे असताना ती तपासणी देखील प्रशासनाकडून केली जात नाही. दरम्यान, मान्सूनच्या आधी समितीकडून पाहणी करण्यात आल्याची माहिती ‘नही’च्या अधिकाऱ्यांनी दिली होती. तसेच पावसाळ्यानंतर पुन्हा समितीकडून पाहणी होणार असल्याचे सांगण्यात आले.२०१० मध्ये झाली शेवटची दुरुस्तीहा पुल आधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्यावेळी २०१० मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. पुलाची दर दोन वर्षात दुरुस्ती करणे गरजेचे होते. चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यानंतर २०१४ मध्ये हा पुल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘नही’कडे हस्तांतर करण्यात आला. ‘नही’कडून एक दाही पुलाची दुरुस्तीतर सोडाच खड्डे देखील दुरुस्त करण्यात आलेले नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव