शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

धक्कादायक; रात्री मुलीला 'सॉरी' म्हणाले आणि दुसऱ्या दिवशी आई-वडिलांचा मृतदेहच दिसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याचा दोरी किंवा साडीने गळा आवळून खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली. तत्पूर्वी बुधवारी मयत मुरलीधर यांनी मुलीला साॅरी म्हणत मद्य प्राशन न करण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी थेट आई - वडिलांचा मृतदेहच दिसल्याने मुलीने एकच आक्रोश केला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुंबा येथील ओम साई नगरात मुरलीधर पाटील व त्यांच्या पत्नी आशाबाई असे दोघेच राहात होते. मोठी मुलगी शीतल हिरालाल पाटील (२४, रा. वेले, ता. चोपडा) ही कुसुंबा येथे, तर लहान मुलगी स्वाती उमेश पाटील (२२, रा. सावखेडा, ता. यावल) ही नंदुरबार येथे वास्तव्याला आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता स्वाती ही आई वडिलांना फोन करत होती. परंतु त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे तिने याच परिसरात राहणारी आजी रुक्माबाई लक्ष्मण पाटील हिला फोन करून आई, वडिलांशी संपर्क होत नाही, काय झाले आहे ते जाऊन बघ, असे सांगितले. त्यानुसार रुक्माबाई यांनी जावई संतोष पाटील (रा. कुसुंबा) यांना सोबत घेऊन मुरलीधर पाटील यांचे घर गाठले. यावेळी घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता, तर किचनकडील मागील दरवाजा उघडा होता. बाजूच्या खोलीत आशाबाई मृतावस्थेत पडलेले होती हे दृश्य पाहून रुक्माबाई व संतोष पाटील यांना धक्का बसला. त्यांनी घराची पाहणी केली असता कपाट उघडे होते, तर गच्चीवर मुरलीधर पाटील हेदेखील मृतावस्थेत दिसून आले. पती - पत्नीचा खून झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

रिक्षाचालकाशी दोन वेळा वाद

घटनास्थळावर आलेले मुरलीधर पाटील यांचे भाऊ विलास राजाराम पाटील व साडू संतोष पुंडलिक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मुरलीधर पाटील यांचा बुधवारी दुपारी आणि रात्री रिक्षाचालकाशी दोन वेळा वाद झाला होता. त्यामुळे या वादाचा आणि घटनेचा काही संबंध आहे का? याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.

दोन वर्षांपूर्वी चोरी अन् वाद

मुरलीधर पाटील यांची मुलगी शीतल यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी जुन्या घरात वास्तव्याला असताना शेजारी राहणाऱ्या एका जणाने त्यांच्या घरात ४० हजार रुपये रोख व दागिन्यांची चोरी केली होती. तेव्हा त्याच्याशी वडिलांचा वाद झाला होता. त्यावेळी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. त्या वादाचाही या घटनेशी संबंध आहे का? याची माहिती पोलिसांकडून काढली जात आहे.

ब्रोकरकडे कामाला होते पाटील

मुरलीधर पाटील हे महाबळमधील दिलीप कांबळे या ब्रोकरकडे कामाला होते. शेती, प्लॉट यांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून त्यांना कमिशन मिळत होते. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या भागात नवीन घराचे बांधकाम हाती घेतले होते. जुलै महिन्यात ते येथे वास्तव्याला आले होते. दोन मजली आलिशान घर त्यांनी या ठिकाणी बांधलेले आहे. या घरात फक्त पती-पत्नी असे दोघेच राहात होते.

अंगावरील पाच लाखांचे दागिने गायब

आशाबाई यांच्या अंगावर पाच लाखांचे दागिने होते. त्याशिवाय घरातील कपाटातदेखील काही रक्कम होती. हे दागिने व रक्कम गायब झाल्याची माहिती मुरलीधर पाटील यांचे साडू संतोष पाटील यांनी दिली.

मुलीचा आईशी वाद

सुप्रीम कॉलनीत राहणारी मुलगी शीतल हिचा आईशी आठ दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याचा राग आल्याने आठ दिवसांपासून आई शीतलशी बोलत नव्हती. बुधवारी वडिलांनी मद्य प्राशन केल्यामुळे नंदुरबारला राहणाऱ्या बहिणीने शीतलला फोन केला व वडिलांना समजावून सांग, असे सांगितले होते. त्यानुसार शीतल हिने घरी येऊन वडिलांना दारु न पिण्याबाबत समजावून सांगितले, तेव्हा साॅरी म्हणून यापुढे दारु पिणार नाही, असे सांगितले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता वडिलांना संपर्क केला असता तो झालाच नसल्याची माहिती शीतल हिने दिली. आईचाही मोबाईल बंद येत होता.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक प्रताप शिकारे, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, विशाल वाठोरे, रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले व सहकारी दाखल झाले. फाॅरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. सर्वात आधी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व गोविंदा पाटील यांनी घटनास्थळ गाठून वरिष्ठांना माहिती कळविली.